
Maharashtra : राज्यात विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाले आणि महायुतीनं न भूतो... असं तगडं यश मिळवलं. आता निकालानंतर राजकारण ढवळून निघालं आहे. महायुतीमधील मित्रपक्षांच्या बैठकांवर बैठका होत आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्रिपदासाठीची शर्यत अत्यंत चुरशीची झाली आहे. त्यात मागच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळालेले, तसेच विद्यमान मंत्र्यांकडूनही मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू झाल्याचे चित्र सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात दिसत आहे.
महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक कधी नव्हे ती अत्यंत प्रतिष्ठेची झाली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षफुटीनंतर सहा प्रमुख पक्ष आखाड्यात उतरले होते. भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांची महायुती विरुद्ध काँग्रेस-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अशी महाविकास आघाडी असा 'सामना' रंगला.
यात महायुतीनं बाजी मारली. भाजप १३२ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यापाठोपाठ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेनं जोरदार मुसंडी मारली. तर अजित पवारांनीही चांगलं यश मिळवलं. महाविकास आघाडीचा या निवडणुकीत सुपडासाफ झाला. काँग्रेस १६, ठाकरे गट २० आणि शरद पवार गट १० अशा एकूण फक्त ४६ जागाच जिंकता आल्या.
|
|
गाठीभेटी आणि लॉबिंग सुरू
येत्या काही दिवसांत महायुतीचं सरकार स्थापन होईल. या सरकारमध्ये कोण मंत्री असेल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. पण हे नवं सरकार स्थापन होण्याआधीच मंत्रिपद मिळवण्यासाठी विद्यमान मंत्री आणि इच्छुक नेत्यांमध्ये अहमहमिका लागली आहे. मंत्रिपद मिळावं म्हणून वरिष्ठ पातळीवर लॉबिंग सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. संजय शिरसाट, भरत गोगावले आणि अब्दुल सत्तार हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहचले. तर इतर इच्छुक नवनिर्वाचित आमदारही शिंदेंची भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शिवसेनेचे नेते सागर बंगल्यावर
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे नेते सागर बंगल्यावर पोहोचले. मंत्री दादा भुसे, शंभुराज देसाई आणि ज्येष्ठ नेत्या नीलम गोऱ्हे या सागर बंगल्यावर पोहोचल्या. मुख्यमंत्रिपदाची शर्यत काट्याची झाल्याने आता या पदावरून दोन्ही पक्षांत दावे-प्रतिदावे सुरू झाल्याचे वृत्त आहे.
शिवसेना आमदारांचा हॉटेलमधील मुक्काम वाढणार
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेनं विधानसभा निवडणुकीत जबरदस्त मुसंडी मारली. निकालानंतर शिवसेना आमदार मुंबईतील आलीशान हॉटेलमध्ये थांबले आहेत. आता हा मुक्काम आणखी वाढण्याची शक्यता आहे. आणखी दोन दिवस या आमदारांना थांबण्याचे आदेश दिल्याची सूत्रांची माहिती आहे. येत्या २८ किंवा २९ नोव्हेंबरला शपथविधी होण्याची शक्यता असून, त्याबाबतचा निर्णय आज अंतिम होऊ शकतो.
भाजप नेते म्हणतात, मुख्यमंत्री फडणवीसच!
या राज्यात मुख्यमंत्री म्हणून भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले पाहिजेत अशी आमची इच्छा आहे, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली. महाराष्ट्राचे सरकार चालवण्याचे कौशल्य फडणवीसांमध्ये आहे. राज्यातील जनतेचीही इच्छा आहे. महाराष्ट्र हितासाठी फडणवीस हेच मुख्यमंत्री पाहिजेत. तिन्ही पक्ष चर्चा करूनच मुख्यमंत्री ठरवला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
शहर
- पुणे: मेट्रो भरतीच्या नावाने फसवणुकीचा सापळा,बनावट जाहिरातींनी नोकरीच्या शोधातील तरुणांना लक्ष्य
- पुणे: स्टिंग ऑपरेशनचा धक्कादायक खुलासा! शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाढतेय एनर्जी ड्रिंकचे व्यसन; आरोग्य तज्ज्ञांकडून इशारा
- मोशी कचरा डेपो दुर्घटना: 'इस्रो' आणि 'एमपीसीबी'चे इशारे धाब्यावर; प्रशासकीय दुर्लक्षामुळे ९ जणांचा बळी
- छत्रपती संभाजीनगर: BAMU आणि एस.बी. हायस्कूल कर्मचाऱ्यांचा आरोप; निवडणूक ड्युटीदरम्यान अधिकारी-पोलिसांकडून दबाव
महाराष्ट्र
- पुणे: मेट्रो भरतीच्या नावाने फसवणुकीचा सापळा,बनावट जाहिरातींनी नोकरीच्या शोधातील तरुणांना लक्ष्य
- पुणे: स्टिंग ऑपरेशनचा धक्कादायक खुलासा! शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाढतेय एनर्जी ड्रिंकचे व्यसन; आरोग्य तज्ज्ञांकडून इशारा
- मोशी कचरा डेपो दुर्घटना: 'इस्रो' आणि 'एमपीसीबी'चे इशारे धाब्यावर; प्रशासकीय दुर्लक्षामुळे ९ जणांचा बळी
- छत्रपती संभाजीनगर: BAMU आणि एस.बी. हायस्कूल कर्मचाऱ्यांचा आरोप; निवडणूक ड्युटीदरम्यान अधिकारी-पोलिसांकडून दबाव
गुन्हा
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
- कर्नाटक :लग्नाला चार महिने, अन् संशयास्पद मृत्यू! नवविवाहितेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचे गंभीर आरोप; तपासाला वेग
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू
- कर्नाटक पर्यटन विकासाला मोठी चालना; सौंदत्ती यल्लम्मा मंदिर आणि गोकाक धबधब्यासह १३ ठिकाणी होणार हायटेक रोप-वे
- तेलंगणात भीषण हत्याकांड! पोक्सो कायद्यातील आरोपीने पत्नी, मुलांसह सहा जणांची केली हत्या; स्वतःही संपवले आयुष्य
- ९०० वर्षांचे रहस्य उलगडले! धारमधील मूर्ती सरस्वती नव्हे, तर 'देवी गायत्री'ची; आधुनिक तंत्रज्ञानातून स्पष्ट


























Subscribe to my channel




