
Mumbai : लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी मतदान केंद्रांवर संध्याकाळपर्यंत झालेली गर्दी टाळण्यासाठी यंदा मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात आली असून प्रायोगिक तत्वावर गृहनिर्माण सोसायट्यांमध्येही मतदान केंद्र सुरू करण्यात आला आहे. संपूर्ण मुंबईत तब्बल साडेसहाशे गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे मतदान केंद्रावरील मतदारांची गैरसोयही टळणार आहेच, पण मुंबईतील मतदानाचा टक्काही वाढण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदान केंद्राबाहेर लागलेल्या रांगांमुळे मतदारांना उन्हात ताटकळत उभे राहावे लागले होते. एकेका मतदान केंद्रावर जास्त संख्येने मतदार असल्यामुळे मतदानाची वेळही वाढवावी लागली होती. अनेक मतदार मतदान न करताच घरी परतले होते. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या नियोजनावर खूप टीका झाली होती. यावेळी खबरदारी घेऊन विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात येणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्राच्या ठिकाणी पूर्वी असणारी सरासरी दीड हजार मतदारांची संख्या आता सरासरी एक हजार ते १२०० पर्यंत असेल. त्यामुळे लोकसभेच्या तुलनेत मतदान केंद्रांची संख्याही वाढली आहे. यावेळी मुंबईतील मतदान केंद्रांची संख्या १० हजार १११ इतकी आहे. तसेच यावेळी मुंबईतील गृहनिर्माण सोसायट्यांमध्येही मतदान केंद्रे सुरू करण्यात येणार आहे. यावेळी तब्बल साडेसहाशे गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहे.
|
Pune : मुख्यमंत्री कोण, याचा अंदाज बांधणे अशक्य; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मत |
निवडणूक आयोगाला मतदान केंद्रासाठी जागा ताब्यात घेण्याचे पूर्ण अधिकार आहेत. मात्र तरीही ज्या गृहनिर्माण संस्थांनी ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे त्याच ठिकाणी मतदान केंद्रे उभारले आहे. अन्यथा मुंबईत अनेक शाळा असून त्यात मतदान केंद्रे उभारली आहेत. मात्र लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी सोसाव्या लागलेल्या उन्हाच्या झळा यावेळी टळतील. त्यामुळे मतदारांच्या सोयीसाठी सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहे. याकरीता सूक्ष्म नियोजन केले असून त्याचा मतदान वाढीसाठी चांगला फायदा होईल, अशी शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
५०० पेक्षा जास्त सदस्य असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये केंद्र
मोठ्या गृहनिर्माण संस्था किंवा गृहनिर्माण संकुलांमध्ये मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. पाचशेपेक्षा जास्त सदस्य संख्या असलेल्या गृहनिर्माण संकुलांमध्ये ही केंद्रे आहेत. ज्या गृहनिर्माण संस्थांंनी ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे अशा संस्थांमध्येच ही केंद्रे सुरू करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी, निवडणूक समन्वयक फरोग मुकादम यांनी दिली. अशा सोसायट्यांमधील मोकळ्या जागेत किंवा वाहनतळाच्या ठिकाणी ही केंद्रे तयार करण्यात येणार आहेत. अशा सोसायट्यांमध्ये शक्यतो ९० टक्के मतदार हे त्या सोसायटीतील असतील.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



