पुणे: शिरूरमध्ये ५ वर्षांच्या चिमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू; ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप

पुणे: शिरूर तालुक्यातील पूर्व भागातील पिंपळसूटी गावात बुधवारी पहाटे घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे आणि रोषाचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाग्यश्री संदीप वारे (वय ५) ही आपल्या आई-वडिलांसह ऊसतोडीच्या कामासाठी पिंपळसूटी येथे वास्तव्यास होती. कुटुंब शेतातील गोठ्याजवळ झोपले असताना पहाटे सुमारे पावणेतीनच्या सुमारास बिबट्याने अचानक चिमुकलीवर हल्ला केला. मुलीच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून आई-वडील जागे झाले, परंतु तोपर्यंत बिबट्याने तिला ऊसाच्या शेतात ओढून नेले होते. घटनेनंतर ग्रामस्थांनी तातडीने शोधमोहीम राबवली असता, ऊसाच्या शेतात चिमुकलीचा मृतदेह आढळून आला.

माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला. परिसरातील बिबट्याच्या हल्ल्याची ही दुसरी तर शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील पाचवी घटना असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. वारंवार अशा घटना घडूनही बिबट्यांच्या हालचाली रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना होत नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी वनविभागाविरोधात संताप व्यक्त केला आहे. परिसरात पिंजरे उभारणे आणि बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.



महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *