
Ratnagiri : कोकण रेल्वे मार्गावर धावणारी दादर रत्नागिरी पॅसेंजर ही गाडी कायमची बंद करून त्या ठिकाणी आता उत्तर प्रदेशात जाणारी दादर गोरखपुर एक्सप्रेस सोडण्यात आल्याने कोकणवासियांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कोरोना कालावधीत 'दादर-रत्नागिरी' ही गाडी बंद करून ती 'दिवा-रत्नागिरी पॅसेंजर' म्हणून सोडण्यास सुरुवात केली. त्यानंतर ही गाडी सुरू करण्यासाठी कोकणातील प्रवाशांकडून सातत्याने पाठपुरावा सुरू होता मात्र कोकणवासियांच्या या मागणीला केराची टोपली दाखवण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका खासदारांना दिलेल्या पत्रात दादर-गोरखपुर गाडी नियमित स्वरूपात करण्यात आल्याची बाब स्पष्ट झाली आहे.
कोरोना काळात एक्सप्रेस बंद
मुंबईतील दादरवरून रत्नागिरी मध्ये येण्यासाठी ही एकमेव गाडी सुरू होती ती कोरोना कालावधीत बंद करण्यात आली तेव्हापासून ती गाडी आजवर सुरू करण्यासाठी अनेकदा पाठपुरावा करण्यात आला. मात्र दादर रत्नागिरी गाडी अद्याप सुरू होऊ शकलेली नाही. दादर-रत्नागिरी गाडीला मोठी मागणी आहे मात्र या मागणीची दखल अद्याप रेल्वे प्रशासनाने घेतलेले नाही. सध्या त्याऐवजी दिवा-रत्नागिरी पॅसेंजर एक्सप्रेस सोडण्यात येते. पण दादर हे मुंबईच्या केंद्रस्थानी असून या स्थानकावर पोहोचणे मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांसाठी सोपं आहे.
दादर रत्नागिरी गाडी ज्या वेळेला बंद करण्यात आली त्यावेळेला लोकल गाड्यांना अडथळा होत असल्याचे प्राथमिक कारण देण्यात आलं होतं. खासदार रविशंकर शुक्ला यांना दिलेल्या पत्रात दादर गोरखपुर ही गाडी आता नियमित स्वरूपात करण्यात आल्याचे स्पष्ट झाल आहे. यापूर्वी ही गाडी हंगामी स्वरूपात चालवली जात होती. महाराष्ट्रातील गाड्यांना दादर रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म उपलब्ध नाही किंवा कोणत्याही तांत्रिक कारण देत कोकणात येणारी गाडी बंद करण्यात आली मात्र महाराष्ट्र बाहेर उत्तर प्रदेशात जाणाऱ्या गाडीला वाट करून देण्यात येत असल्याने कोकणवासियांमध्ये नाराजी असल्याचं मत रेल्वेचे अभ्यासक अक्षय महाबदी यांनी व्यक्त केल.
दादर-रत्नागिरी सेवा बंद करण्यामागचं कारण काय?
मिड डमधील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र अक्लेकर यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये या मागील कारण स्पष्ट केलं आहे. मध्ये रेल्वेवर दादर-रत्नागिरी एक्सप्रेस चालवताना एक ऑपरेशनल अडचण येते. कोकणातून येणारी ही एक्सप्रेस जेव्हा दिवा आणि विद्याविहार स्थानकांजवळ मुंबईतील उपनगरिय रेल्वे मार्गांवर प्रवेश करते तेव्हा एकाच वेळी सुमारे सहा लोकल थांबतात. अप आणि डॉऊन या दोन्ही मार्गांवर प्रत्येकी तीन लोकल थांबवल्या जातात. यामुळे लोकलचं वेळापत्रक विसकळीत होतं. यामुळे हा निर्णय घेण्यात आला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे.
शहर
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
महाराष्ट्र
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! अघोरी पूजा आणि मृत्यूची भीती दाखवून 'भोंदू कमलेश'ने राज्यभरातील भाविकांना लुटले; पोलिसांची दोन पथके रवाना!
गुन्हा
- मलबार हिल पोलिसांत गुन्हा! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ लिपिकाकडून विवाहितेची १५ लाखांना फसवणूक!
- अमरावती: "तू आम्हाला दारू पाजतो का?"; नकार देताच वाद झाला अन् दगडाने ठेचून तरुणाचा खून;
- पुण्यात रक्तरंजित थरार! आयटीआयच्या विद्यार्थ्याची झोपेत असताना वर्गमित्राकडून निर्घृण हत्या
- रायगड: दागिन्यांच्या हव्यासापोटी वृद्धेचा जीव घेतला! अलिबागमध्ये ८५ वर्षीय महिलेची हत्या; मृतदेह आंबेनळी घाटात फेकला
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
इतर
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
- अन्न व औषध प्रशासनाचा बीडमध्ये धडाका: तुकाराम मुंढेंच्या आदेशानुसार भेसळयुक्त पदार्थ आणि गुटखा जप्त
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा

























Subscribe to my channel


