
Kedarnath : केदारनाथहून चार धाम यात्रेसाठी निघालेल्या यात्रेकरूंना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर रविवारी पहाटे रुद्रप्रयागच्या गौरीकुंडजवळ कोसळून सात जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. मृतांमध्ये पायलट आणि एका दोन वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. गौरीकुंडपासून सुमारे ५ किमी अंतरावर असलेल्या गौरी माई खार्क येथे हे हेलिकॉप्टर कोसळले.
या घटनेबद्दल माहिती देताना, कायदा आणि सुव्यवस्था महानिरीक्षक नीलेश भरणे म्हणाले, “रविवारी पहाटे ५.२० वाजताच्या सुमारास, केदारनाथहून गुप्तकाशीला जाणाऱ्या प्रवाशांना घेऊन हेलिकॉप्टर बेपत्ता झाले. ते गौरीकुंडमध्ये कोसळले, ज्यामुळे ७ जणांचा मृत्यू झाला. आम्ही अपघाताचे कारण शोधत आहोत.”
|
|
दरम्यान या अपघातात पायलट कॅप्टन राजबीर सिंग चौहान, विक्रम रावत, विनोद देवी, त्रिशती सिंग, राजकुमार सुरेश जयस्वाल, श्रद्धा राजकुमार जयस्वाल आणि दोन वर्षांची काशी यांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व मृत पीडित जयपूर, उत्तर प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातील आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, खराब हवामान या अपघाताचे संभाव्य कारण मानले जात आहे. एसडीआरएफ आणि एनडीआरएफ पथके घटनास्थळी पोहोचली असून, मदत कार्य सुरू करण्यात आले आहे. घटनास्थळ कठीण आणि दुर्गम जंगल क्षेत्रात असल्याने बचाव कार्य आव्हानात्मक आहे, असे सडीआरएफ ने सांगितले आहे.
उत्तराखंड नागरी विमान वाहतूक विकास प्राधिकरणाकडून याबाबत अधिकृत निवेदन जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार, १५ जून रोजी सकाळी ५:२० वाजता आर्यन एव्हिएशनचे हेलिकॉप्टर VTBKA/BELL ४०७ गौरीकुंडजवळ कोसळले. हेलिकॉप्टर केदारनाथ धामहून गुप्तकाशीला जात होते. हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह एकूण ६ प्रवासी होते. यामध्ये एका दोन वर्षांच्या मुलीचाही समावेश होता. हेलिकॉप्टरमधील प्रवासी उत्तराखंड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमधील आहेत.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी रुद्रप्रयाग जिल्ह्याजवळ झालेल्या या हेलिकॉप्टर अपघाताला दुजोरा दिला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार “एसडीआरएफ, स्थानिक प्रशासन आणि इतर बचाव पथकांना मदत आणि बचाव कार्याला सुरूवात केली आहे.”
यापूर्वी ८ मे रोजी गंगोत्रीला जाताना एका हेलिकॉप्टर दरीत कोसळून पाच प्रवासी आणि एका पायलटचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ७ जून रोजी केदारनाथला पाच प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचे उत्तराखंडमधील महामार्गावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले होते. उड्डाणादरम्यान हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता, ज्यामुळे खबरदारी म्हणून त्याचे रस्त्यावर लँडिंग करण्यात आले होते.
गढवालचे आयजी राजीव स्वरूप यांनी सांगितले की, “अपघातग्रस्त हेलिकॉप्टर केदारनाथला यात्रेकरूंना घेऊन गेल्यानंतर गौरीकुंडला गेले होते. ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली ते अतिशय दुर्गम ठिकाण आहे. पोलीस आणि एसडीआरएफ पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



