
Baramati : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर त्यांच्या मृत्यूबाबत राज्यभरातील जनतेत तसेच कार्यकर्त्यांमध्ये विविध शंका आणि प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेषतः अपघाताच्या दिवशी मुंबई विमानतळावर काय घडले, याबाबत सत्य परिस्थिती समोर यावी, या मागणीसाठी माहिती अधिकाराच्या माध्यमातून सीसीटीव्ही फुटेज मागविण्यात आले होते. मात्र केंद्रीय नागरी सुरक्षा व विमान वाहतूक विभागाने संबंधित माहिती देण्यास नकार दिल्याचा दावा आरटीआय कार्यकर्ता नितीन यादव यांनी केला आहे.
अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्रकरणात विविध तपास यंत्रणांकडून तपास सुरु आहेत. त्यामुळे हे प्रकरण अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाचं मानलं जात आहे. आमदार रोहित पवार, आमदार अमोल मिटकरी यांनी या घटनेवर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी याबाबतचं निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. तसेच राज्य सरकारकडूनही यासाठी महत्त्वाचे पावलं उचलण्यात आली आहेत.
राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार हे प्रचाराच्या निमित्ताने बारामतीला जात असताना विमान अपघाताची दुर्दैवी घटना घडली होती. गेल्या महिन्यात 28 जानेवारीला पहाटे 8.46 वाजेच्या सुमारास या अपघाताची घटना घडली होती. या अपघातात अजित पवार यांचं निधन झालं होतं. अजित पवार यांच्या निधन झाल्याच्या वृत्ताने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला होता. अजित पवार यांच्यासारख्या एका दिग्गज नेत्याचं अशाप्रकारे निधन होईल, असं कुणालाही वाटलं नव्हतं.
अजित पवार यांच्या निधनानंतर अनेकांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. रोहित पवार यांनी तर पत्रकार परिषद घेऊन थेट शंका उपस्थित केली होती. रोहित पवार यांनी अजित पवार हे अपघाताच्या आधी म्हणजेच 27 जानेवारीलाच रस्ते मार्गाने बारामतीला जाणार होते. पण पूर्व विदर्भातील एका बड्या नेत्याचा फोन आला. त्या नेत्याने सांगितलेल्या एका फाईलवर स्वाक्षरी करायची होती. ती फाईल मंत्रालयात होती. त्यामुळे ती फाईल मंत्रालयाच्या कार्यालयातून देवगिरी बंगल्यावर आणण्यास उशिर झाला. यामुळे अजित पवार यांचा उशिर झाल्याने रस्ते मार्गाने बारामतीला जाण्याचा निर्णय बदलला, असा दावा रोहित पवार यांनी केला होता.
या प्रकरणात राजकारण तापलेलं असताना एका आरटीआय कार्यकर्त्याने केंद्रीय नागरी सुरक्षा व विमान वाहतूक विभागाकडे अजित पवारांच्या अपघाताच्या दिवसाचं विमानतळाचं सीसीटीव्ही फुटेज मागवलं. पण काही तांत्रिक कारणास्तव केंद्रीय नागरी सुरक्षा व विमान वाहतूक विभागाने त्यास नकार दिला आहे. त्यामुळे या मुद्द्यावरुन आणखी राजकारण तापण्याची शक्यता आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षण न्यायालयीन लढाई: कायदेशीर लढा आणखी तीव्र करण्यासाठी विनोद पाटील यांची नवी रणनीती समोर!
- पुणे: युट्यूबर्स संतोष पंडीत यांनी सांगितला तुरुंगात गेल्याचा थरारक आणि भयानक अनुभव; म्हणाले, त्या दिवसांत...
- पुणे: वेळप्रसंगी स्वतःला विकेन, पण पैशांसाठी 'छत्रपती' कारखाना बंद पडू देणार नाही; अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांची अत्यंत भावनिक साद
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
महाराष्ट्र
- नांदेड: अनोखी परंपरा! मातीच्या मूर्तीऐवजी चक्क ३ सनांकच मानले साक्षात महालक्ष्मी; कंधारमधील येइलवाड कुटुंबाचा कौतुकास्पद सोहळा
- पुणे: हायप्रोफाइल 'द न्यू पूना क्लब'च्या किचनमध्ये जिवंत झुरळे अन् उंदराची विष्ठा; FDA च्या धडक कारवाईत परवाना तत्काळ रद्द!
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षण न्यायालयीन लढाई: कायदेशीर लढा आणखी तीव्र करण्यासाठी विनोद पाटील यांची नवी रणनीती समोर!
- पुणे: युट्यूबर्स संतोष पंडीत यांनी सांगितला तुरुंगात गेल्याचा थरारक आणि भयानक अनुभव; म्हणाले, त्या दिवसांत...
गुन्हा
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!
- बिहार: गोड खाण्याचा आनंद ठरला शेवटचा! घशात रसगुल्ला अडकल्याने ८ वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू; हळहळ व्यक्त!
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!


























Subscribe to my channel




