
India vs Sri Lanka : चेन्नईपासून सुरू झालेला विश्वकरंडकातील भारताचा विजयरथ आता क्रिकेटच्या पंढरीत आलाय आणि आज त्याची वानखेडे स्टेडियमवर थाटात सवारी होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र श्रीलंकेला कमजोर न समजता आपला बलशाली खेळ साकार केला तर एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरी निश्चित होईल आणि याच मैदानावर होणाऱ्या उपांत्य सामन्याची तयारीही करता येईल.
एका तपापूर्वी याच वानखेडे स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यात अंतिम सामना झाला होता. धोनीच्या त्या ऐतिहासिक षटकारानंतर भारतासाठी इतिहास घडला होता. आता उद्याच्या सामन्यातही श्रीलंकाच प्रतिस्पर्धी आहे, मात्र परिस्थिती बदललेली आहे. भारत सर्व सामने जिंकून पहिल्या स्थानावर आहे, तर श्रीलंका दोन विजयांसह सातव्या क्रमांकावर आहे.
|
|
भारतीय संघ कमालीचा फॉर्मात आहे. हा विजयरथ रोखणे श्रीलंकेसाठी सोपे नसेल. दोन दिवसांपूर्वीच पुण्यात त्यांचा अफगाणिस्तानने पराभव केला होता. त्यामुळे मानसिकतेत बदल करून भारताला टक्कर देण्यासाठी श्रीलंकेला फार मेहनत घ्यावी लागेल. ही विश्वकरंडक स्पर्धा सुरू होण्याअगोदर झालेल्या आशिया करंडक स्पर्धेत भारताने श्रीलंकेचा धुव्वा उडवून विजेतेपद मिळवले होते, तेथून सुरू झालेला हा विजयरथ कायम आहे.
आजचा सामना जिंकून भारताने उपांत्य फेरी निश्चित केली तर याच वानखेडे स्टेडियमवर भारताचा उपांत्य सामना होईल. त्यामुळे हा सामना सरावाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा ठरणार आहे, पण पुढचा विचार करण्यापेक्षा रोहित शर्माचा संघ आजच्या सामन्यावरच लक्ष केंद्रीत करेल.
वानखेडेवर धावांचा पाऊस
या विश्वकरंडक स्पर्धेत वानखेडेवर दोन सामने झाले आहेत. हे दोन्ही सामने दक्षिण आफ्रिकेचे होते. त्यांनी बांगलादेशविरुद्ध ५ बाद ३८३, तर इंग्लंडविरुद्ध ७ बाद ३९९ धावांचा पाऊस पाडला होता. खेळपट्टी आणि जवळ असलेली सीमारेषा पाहता उद्या भारतीय संघाकडूनही तीनशेच्या पलीकडे धावा अपेक्षित आहेत.
खेळपट्टीचा फायदा घेण्यासाठी श्रीलंकेकडेही नावाजलेले फलंदाज असले तरी भारतीय गोलंदाजी फॉर्मात आहे. जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमी यांचा मारा खेळणे सर्वांनाच अवघड गेले आहे.
घरच्या मैदानावर चार मुंबईकर
कर्णधार रोहित शर्मासह सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकूर या चार मुंबईकरांसाठी हे घरचे मैदान आहे. यातील शार्दुलला पुन्हा एकदा राखीव खेळाडूतच राहावे लागेल; तर हार्दिक पंड्या अजून तंदुरुस्त न झाल्यामुळे श्रेयस अय्यरला आणखी एक संधी मिळेल, पण श्रेयसला आपला कच्चा दुवा बाजूला ठेवून आपली निवड सार्थ ठरवण्यासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागतील.
मोहम्मद सिराजचीही परीक्षा
याच श्रीलंकेविरुद्ध आशिया करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वादळी गोलंदाजी करून सहा विकेट मिळवणारा मोहम्मद सिराज त्यानंतर मात्र प्रभावहीन ठरत आहे. आता श्रेयस अय्यरप्रमाणे त्यालाही आपली जागा निश्चित ठेवण्यासाठी प्रभाव पाडावा लागणार आहे.
डेंगीच्या आजारातून परतणाऱ्या शुभमन गिलला स्पर्धेत एकच अर्धशतक करता आले आहे. त्यामुळे श्रेयस, सिराज आणि गिलसाठी हा सामना लय मिळवण्यासाठी महत्त्वाचा आहे.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल


























Subscribe to my channel



