
India vs Sri Lanka : चेन्नईपासून सुरू झालेला विश्वकरंडकातील भारताचा विजयरथ आता क्रिकेटच्या पंढरीत आलाय आणि आज त्याची वानखेडे स्टेडियमवर थाटात सवारी होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र श्रीलंकेला कमजोर न समजता आपला बलशाली खेळ साकार केला तर एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरी निश्चित होईल आणि याच मैदानावर होणाऱ्या उपांत्य सामन्याची तयारीही करता येईल.
एका तपापूर्वी याच वानखेडे स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यात अंतिम सामना झाला होता. धोनीच्या त्या ऐतिहासिक षटकारानंतर भारतासाठी इतिहास घडला होता. आता उद्याच्या सामन्यातही श्रीलंकाच प्रतिस्पर्धी आहे, मात्र परिस्थिती बदललेली आहे. भारत सर्व सामने जिंकून पहिल्या स्थानावर आहे, तर श्रीलंका दोन विजयांसह सातव्या क्रमांकावर आहे.
|
|
भारतीय संघ कमालीचा फॉर्मात आहे. हा विजयरथ रोखणे श्रीलंकेसाठी सोपे नसेल. दोन दिवसांपूर्वीच पुण्यात त्यांचा अफगाणिस्तानने पराभव केला होता. त्यामुळे मानसिकतेत बदल करून भारताला टक्कर देण्यासाठी श्रीलंकेला फार मेहनत घ्यावी लागेल. ही विश्वकरंडक स्पर्धा सुरू होण्याअगोदर झालेल्या आशिया करंडक स्पर्धेत भारताने श्रीलंकेचा धुव्वा उडवून विजेतेपद मिळवले होते, तेथून सुरू झालेला हा विजयरथ कायम आहे.
आजचा सामना जिंकून भारताने उपांत्य फेरी निश्चित केली तर याच वानखेडे स्टेडियमवर भारताचा उपांत्य सामना होईल. त्यामुळे हा सामना सरावाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा ठरणार आहे, पण पुढचा विचार करण्यापेक्षा रोहित शर्माचा संघ आजच्या सामन्यावरच लक्ष केंद्रीत करेल.
वानखेडेवर धावांचा पाऊस
या विश्वकरंडक स्पर्धेत वानखेडेवर दोन सामने झाले आहेत. हे दोन्ही सामने दक्षिण आफ्रिकेचे होते. त्यांनी बांगलादेशविरुद्ध ५ बाद ३८३, तर इंग्लंडविरुद्ध ७ बाद ३९९ धावांचा पाऊस पाडला होता. खेळपट्टी आणि जवळ असलेली सीमारेषा पाहता उद्या भारतीय संघाकडूनही तीनशेच्या पलीकडे धावा अपेक्षित आहेत.
खेळपट्टीचा फायदा घेण्यासाठी श्रीलंकेकडेही नावाजलेले फलंदाज असले तरी भारतीय गोलंदाजी फॉर्मात आहे. जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमी यांचा मारा खेळणे सर्वांनाच अवघड गेले आहे.
घरच्या मैदानावर चार मुंबईकर
कर्णधार रोहित शर्मासह सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकूर या चार मुंबईकरांसाठी हे घरचे मैदान आहे. यातील शार्दुलला पुन्हा एकदा राखीव खेळाडूतच राहावे लागेल; तर हार्दिक पंड्या अजून तंदुरुस्त न झाल्यामुळे श्रेयस अय्यरला आणखी एक संधी मिळेल, पण श्रेयसला आपला कच्चा दुवा बाजूला ठेवून आपली निवड सार्थ ठरवण्यासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागतील.
मोहम्मद सिराजचीही परीक्षा
याच श्रीलंकेविरुद्ध आशिया करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वादळी गोलंदाजी करून सहा विकेट मिळवणारा मोहम्मद सिराज त्यानंतर मात्र प्रभावहीन ठरत आहे. आता श्रेयस अय्यरप्रमाणे त्यालाही आपली जागा निश्चित ठेवण्यासाठी प्रभाव पाडावा लागणार आहे.
डेंगीच्या आजारातून परतणाऱ्या शुभमन गिलला स्पर्धेत एकच अर्धशतक करता आले आहे. त्यामुळे श्रेयस, सिराज आणि गिलसाठी हा सामना लय मिळवण्यासाठी महत्त्वाचा आहे.
शहर
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
महाराष्ट्र
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- पुणे: सरकारी कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने शेकडो महिलांची फसवणूक; मुख्य आरोपीला अटक
- पुणे: व्हिडिओ रेकॉर्ड करून कंत्राटदाराची आत्महत्या; आर्थिक वादातील गंभीर आरोपांमुळे खळबळ
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
गुन्हा
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
- यवतमाळ: कौटुंबिक वादातून सासऱ्याने जावयाची हत्या केल्याचा आरोप; परिसरात खळबळ
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.
- गोवा: सात खाण कंपन्यांना मोठा दिलासा; बेकायदा खाणकामप्रकरणी दाखल FIR मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून रद्द
- उत्तर प्रदेश: ४९ वर्षांनंतर न्याय; १९७७ च्या हत्याकांडातील पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
- जागतिक तेल संकट अटळ? होर्मुझमधील तणावामुळे 'सेफ्टी बफर' झाले रिकामे; IMF चा गंभीर इशारा.
























Subscribe to my channel




