वूमन्स टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. टीम इंडिया या दौऱ्यात सध्या टी 20i मालिका खेळत आहे. उभयसंघात टी 20i मालिकेनंतर वनडे सीरिज खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर एकमेव कसोटी सामन्याचा थरार रंगणार आहे. सध्या टीम इंडिया या 3 सामन्यांच्या टी 20i मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे भारताला सलग दुसरा सामना जिंकून मालिकेवर नाव कोरण्याची संधी आहे. यजमान संघाची सुरुवात पराभवाने झाली. त्यामुळे आता मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या सामन्यात कोणत्याही स्थितीत विजय मिळवावा लागणार आहे. त्यामुळे दुसर्या सामन्यात कांगारुंचा चांगलाच कस लागणार आहे. त्यामुळे या सामन्यात यजमान पाहुण्या संघासमोर कशी कामगिरी करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
टीम इंडियाची विजयी सलामी
टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात रविवारी 15 फेब्रुवारीला ऑस्ट्रेलियावर डीएलएसनुसार 21 धावांनी विजय मिळवला होता. ऑस्ट्रेलियाने सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये 18 ओव्हरमध्ये ऑलआऊट 133 धावा केल्या होत्या. त्यानंतर टीम इंडियाच्या बॅटिंगदरम्यान पावसाने खोडा घातला. भरताने तोवर 5.1 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 50 धावा केल्या. त्यानंतर पावसामुळे सामन्याचा निकाल डीएलएसनुसार लावण्यात आला. भारताने हा सामना 21 धावांनी जिंकला. भारताने अशाप्रकारे 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी
आता टीम इंडियाला सलग दुसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलिया मालिका वाचवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तर दुसऱ्या बाजूला मालिका गमवायची नसेल तर ऑस्ट्रेलियाला कोणत्याही स्थितीत दुसरा सामना जिंकावा लागणार आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्याच्या निकालाकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
दुसऱ्या सामन्याबाबत महत्त्वाची माहिती
उभयसंघातील दुसरा सामना हा कॅनबेरातील मानुका ओव्हलमध्ये होणार आहे. सोफी मोलिनेक्स ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे. सामन्याला दुपारी 1 वाजून 45 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.
प्रतिका रावलचा समावेश
दरम्यान भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात टी 20i मालिकेनंतर वनडे सीरिजचा थरार रंगणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघात सलामीवीर प्रतिका रावल हीचा समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. उभयसंघात 24 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान ही मालिका होणार आहे.
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




