पुणे/नवी दिल्ली: जगभरात हंताव्हायरसच्या (Hantavirus) चर्चेमुळे भीतीचे वातावरण असताना, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचे (ICMR-NIV) संचालक डॉ. नवीन कुमार यांनी भारतीयांना मोठा दिलासा दिला आहे.
हंताव्हायरस हा भारतासाठी सध्या कोणताही तात्काळ सार्वजनिक आरोग्य धोका निर्माण करत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. एका क्रूझ शिपवर दोन भारतीय नागरिकांना हंताव्हायरसची लागण झाल्याच्या वृत्तानंतर चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, डॉ. कुमार यांनी स्पष्ट केले की, ही प्रकरणे वैयक्तिक स्वरूपाची असून भारतात या विषाणूचा सामाजिक प्रसार (Community Spread) झाल्याचा कोणताही पुरावा नाही.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कोरोना विषाणूच्या तुलनेत हंताव्हायरस हा मानवाकडून मानवाकडे सहजासहजी पसरत नाही. कसा पसरतो हा विषाणू? हंताव्हायरस प्रामुख्याने उंदीर किंवा तत्सम प्राण्यांच्या विष्ठा, लघवी किंवा लाळेच्या संपर्कात आल्याने पसरतो. बंदिस्त जागा, गोदामे किंवा जिथे उंदरांचा वावर जास्त आहे, अशा ठिकाणी हवेतील कणांवाटे हा संसर्ग होऊ शकतो. दक्षिण अमेरिकेतील 'अँडीज' सारख्या काही मोजक्या जाती वगळता, आशियाई देशांमध्ये मानवाकडून मानवाकडे हा संसर्ग होण्याचे प्रमाण अत्यंत दुर्मिळ आहे. लक्षणे आणि तपासणी:हंताव्हायरसची लक्षणे सामान्यतः ५ आठवड्यांपर्यंत दिसू शकतात.
यामध्ये ताप, तीव्र अंगदुखी, डोकेदुखी, थकवा आणि उलट्या यांचा समावेश होतो. गंभीर प्रकरणांमध्ये श्वसनास त्रास किंवा मूत्रपिंडावर परिणाम होऊ शकतो. डॉ. कुमार यांनी सांगितले की, भारतात आयसीएमआर-एनआयव्ही आणि १६५ प्रयोगशाळांचे जाळे संशयित रुग्णांची तपासणी करण्यासाठी सज्ज असून आरटी-पीसीआर (RT-PCR) चाचणीद्वारे या विषाणूचे निदान होऊ शकते. नागरिकांनी घाबरून न जाता स्वच्छता पाळावी आणि उंदीर असलेल्या ठिकाणांपासून सावध राहावे, असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
शहर
- नागपुर: विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या संघात निवड न झाल्याने १७ वर्षीय महिला क्रिकेटपटूचे टोकाचे पाऊल
- मुंबई: शाळांच्या परिसरातील जंक फूड विक्रीबाबत टोलवाटोलवी खपवून घेणार नाही; एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांचा सज्जड इशारा
- पुणे: खडकवासला आणि पानशेत धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढणार, चारही धरणांमध्ये ९५.२२ टक्के पाणीसाठा
- पुणे: धरणासाठी सर्वस्व दिले, पण अंत्यसंस्कारासाठी जागाच नाही; मृतदेह रात्रभर घरात ठेवावा लागल्याने पवनानगरमध्ये संतापाची लाट
महाराष्ट्र
- नागपुर: विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या संघात निवड न झाल्याने १७ वर्षीय महिला क्रिकेटपटूचे टोकाचे पाऊल
- मुंबई: शाळांच्या परिसरातील जंक फूड विक्रीबाबत टोलवाटोलवी खपवून घेणार नाही; एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांचा सज्जड इशारा
- पुणे: खडकवासला आणि पानशेत धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढणार, चारही धरणांमध्ये ९५.२२ टक्के पाणीसाठा
- पुणे: धरणासाठी सर्वस्व दिले, पण अंत्यसंस्कारासाठी जागाच नाही; मृतदेह रात्रभर घरात ठेवावा लागल्याने पवनानगरमध्ये संतापाची लाट
गुन्हा
- यवतमाळ: झोपेत असलेल्या महिलेची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या; खळबळजनक घटनेने परिसर हादरला
- अहिल्यानगर: एका क्लिकमध्ये बँक खाते रिकामे! अहिल्यानगरमध्ये सायबर भामट्यांचा सुळसुळाट, अवघ्या सात महिन्यांत नागरिकांचे १८ कोटी लाटले
- पुणे: पत्नी घर सोडून गेली, दोन दिवसांनी पतीने संपवले आयुष्य; हातावरील मजकूर आणि सुसाईड नोट पाहून पोलीसही झाले अवाक
- सांगली: कामावरून झालेल्या वादातून झोपलेल्या तरुणाच्या डोक्यात लाकडी दांडके घालून निर्घृण खून; आरोपी पसार
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
- आजचे राशिभविष्य २७ जुलै २०२६ : या राशींना नोकरीत प्रमोशन तर काही राशींना व्यवहारात सतर्क राहण्याचा इशारा, जाणून घ्या आजचे भविष्य
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तर प्रदेश: डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या ६५ वर्षीय महिलेची अंत्यविधीची तयारी सुरू असताना १७ तासांनी पुन्हा परतली प्राणांतून सुटका;
- मध्य प्रदेश: लग्नास नकार दिल्यामुळे तरुणाने बँक कर्मचारी प्रेयसीची केली हत्या; मृतदेह पेट्रोल टाकून जाळल्याने मोठी खळबळ
- उत्तर प्रदेश: कानपूर हादरले! चहात विष कालवून हळूहळू मारण्याचा प्रयत्न; चार्टर्ड अकाउंटंट पतीने पत्नीचा पोलखोल करणारा 'हिडन कॅमेरा' व्हिडिओ आणला समोर
- उत्तर प्रदेश: मथुरा बनले देशाचे नवे 'मिनी जामताडा'! १८ गावांमधील गल्लीबोळांतून तब्बल ३१२ सायबर ठगांना बेड्या; उत्तर प्रदेश पोलिसांची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक कारवाई
























Subscribe to my channel




