
Pune Vishrantwadi Youth Killed : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच पुण्यात पुन्हा एकदा हत्येची घटना समोर आली आहे. जुन्या वादातून या तरुणाला संपवलं आहे.
पुणे : पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात काल मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास एक भीषण हत्येची घटना घडली. पूर्वीच्या वादातून १८ वर्षीय तरुणाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना विश्रांतवाडीतील कॉमर्स झोन परिसरात रात्री साडेअकरा ते साडेबारा वाजण्याच्या दरम्यान घडली. मृत तरुणाचं नाव गौरव गणेश तेलंगी (वय १८, रा. सिंहगड रोड, नवले हॉस्पिटलजवळ) असं आहे.
गोळी लागली नाही म्हणून दगडाने ठेचलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तौफिक शेख आणि त्याच्या साथीदारांनी गौरववर हल्ला केला. सुरुवातीला गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, गोळी लागली नाही. त्यानंतर आरोपींनी कोयता, दगड आणि विटांचा वापर करत गौरववर जोरदार हल्ला चढवला. डोक्यावर वार करत त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. हा संपूर्ण प्रकार पूर्वीच्या वादातून घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
याप्रकरणी पुणे पोलीस यांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध सुरू आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, एवढ्या निर्घृण पद्धतीने झालेल्या हत्येमुळे पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मध्यरात्री झालेल्या या हत्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
पुण्यासारख्या शहरामध्ये वाढणारी गुन्हेगारी कमी कधी होणार? सुसंस्कृत शहरामध्ये आपणही सुरक्षित आहोत का? असे प्रश्न आता पुणेकरांच्या मानत निर्माण होत आहेत.
सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
पुण्यातल्या कात्रज परिसरात घडलेली एक हृदय पिळवटून टाकणारी घटना सध्या सगळ्यांच्याच मनाला अस्वस्थ करून जातेय. सासरी घरात सुरू असलेल्या सततच्या छळाला कंटाळून एका विवाहित महिलेनं थेट स्वतःलाच पेटवून घेतलं, आणि काही दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
शहर
- पुणे: आळंदीत इंद्रायणी नदीला पूर; वारकऱ्यांना सुरक्षित राहण्याचे प्रशासनाचे आवाहन!
- मुंबई: धोकादायक चाळ रिकामी करतानाच मृत्यूचा सापळा, मानखुर्द दुर्घटनेत ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू
- पुणे: चिंचवडमध्ये विक्रमी २०६ मिमी पाऊस; पवना धरणातील पाणीसाठा ४० टक्क्यांवर!
- सोलापूर: कुर्नूर धरणात फक्त २५% पाणीसाठा! अक्कलकोटच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाची धडपड
महाराष्ट्र
- पुणे: आळंदीत इंद्रायणी नदीला पूर; वारकऱ्यांना सुरक्षित राहण्याचे प्रशासनाचे आवाहन!
- मुंबई: धोकादायक चाळ रिकामी करतानाच मृत्यूचा सापळा, मानखुर्द दुर्घटनेत ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू
- पुणे: चिंचवडमध्ये विक्रमी २०६ मिमी पाऊस; पवना धरणातील पाणीसाठा ४० टक्क्यांवर!
- सोलापूर: कुर्नूर धरणात फक्त २५% पाणीसाठा! अक्कलकोटच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाची धडपड
गुन्हा
- थरारक! कर्जात बुडालेल्या कॉलेज विद्यार्थ्याने लुटून विहिरीत ढकलले; दोरीला धरून ५५ वर्षीय महिलेचा विहिरीत २१ तासांचा मृत्यूशी संघर्ष! अखेर चमत्कारीक बचाव
- सरपंचपदासाठी काय पण! मराठा असूनही मिळवले 'पारधी' जातीचे बोगस प्रमाणपत्र; बीड जिल्हा जात पडताळणी समितीने दाखला ठरवला रद्द!
- भ्रष्टाचाराचा कुबेर! देवळाली कॅन्टोन्मेंटचे माजी सीईओ अजय कुमार यांच्यावर सीबीआयचा गुन्हा; १० वर्षांत ५२ हजारांची संपत्ती झाली थेट पाऊणेसहा कोटी!
- "जे लग्न कधी होणारच नाहीये, त्यासाठी आधार कशाला?" केतन अगरवाल हत्या प्रकरणात आरोपी सियाचे खळबळजनक व्हॉट्सॲप चॅट व्हायरल!
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- मराठवाड्यात जुलैच्या सुरुवातीलाही पावसाची ओढ! पहिल्या आठवड्यात केवळ २३.२ मिमी पाऊस; धरणे कोरडी, पेरण्या रखडल्याने बळीराजा हवालदिल!
- धाराशिवच्या जमिनीचा पोत खालावला! मृद आरोग्य पत्रिकेच्या अहवालात 'नत्र' कमतरतेची गंभीर नोंद; खरिपासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याचे आवाहन.
- शनीच्या दृष्टीचा राशींवर होणार परिणाम, जाणून घ्या ४ जुलै २०२६ चा दिवस कसा असेल!
- ३ जुलै २०२६ आजचे राशीभविष्य: संकष्टीच्या शुभ मुहूर्तावर या ४ राशींवर होणार बाप्पाची विशेष कृपा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- फिफा विश्वचषक २०२६ मध्ये थरार! बेलिंगहॅम चमकला, १० खेळाडूंसह खेळणाऱ्या इंग्लंडने मेक्सिकोला नमवून गाठली उपांत्यपूर्व फेरी
- पाशवी कृत्य! दारुड्या पतीने पत्नीला जिवंत जाळले, अपघाताचा बनाव रचला; फतेहपूर पोलिसांच्या तपासात अखेर सत्य उघड!
- बाप रे, भामट्यांचा नवा कारनामा! चालती ई-रिक्षा ब्लूटूथने बंद करून थेट पैशांची मागणी; सायबर गुंडांचा नवा हायटेक स्कॅम उघड!
- इराणमध्ये युद्धाच्या छायेत सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यसंस्काराला सुरुवात! तेहरानमध्ये लाखो जनसमुदाय रस्त्यावर, डोनाल्ड ट्रम्प विरोधात संतापाचा उद्रेक!

























Subscribe to my channel



