Tragedy in Godavari: Overcrowded Boat Capsizes During Adhik Maas Pilgrimage, 2 Women Devotees Dead; Massive Rescue Action Underway!

अधिक मास यात्रेला गालबोट! पुरुषोत्तमपुरी येथे गोदावरी नदीत बोट उलटून २ महिला भाविकांचा दुर्दैवी मृत्यू!

Tragedy in Godavari: Overcrowded Boat Capsizes During Adhik Maas Pilgrimage, 2 Women Devotees Dead; Massive Rescue Action Underway!बीड / माजलगाव (Kamlesh Jabras): माजलगाव तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पुरुषोत्तमपुरी येथे चालू असलेल्या अधिक मास (पुरुषोत्तम मास) यात्रेला आज मोठी दुर्घटना घडल्याने गालबोट लागले आहे. बुधवार दि. १० जून २०२६ रोजी सकाळी गोदावरी नदीपात्रात भाविकांनी गच्च भरलेली एक बोट अचानक उलटल्याने दोन महिला भाविकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

सध्या अधिक मासानिमित्त पुरुषोत्तमपुरी येथे दर्शनासाठी आणि पवित्र स्नानासाठी राज्याच्या विविध भागांतून मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत आहे. नदी पार करण्यासाठी भाविक बोटींचा वापर करत आहेत. बुधवारी सकाळी एका बोटीमध्ये तिच्या क्षमतेपेक्षा कितीतरी पटीने जास्त (सुमारे ५० ते ६०) प्रवासी भरण्यात आले होते. नदीच्या पात्रात जात असताना क्षमतेपेक्षा जास्त वजनामुळे बोटीचा तोल गेला आणि ती अचानक असंतुलित होऊन पाण्यात उलटली.

बोट उलटताच नदीपात्रात आणि किनाऱ्यावर एकच गोंधळ आणि आक्रोश निर्माण झाला. मात्र, किनाऱ्यावर उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाच्या बचाव पथकाने दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. स्थानिक तरुणांनी तातडीने नदीत उड्या मारून पाण्यात बुडत असलेल्या २० ते ३० हून अधिक भाविकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. दुर्दैवाने, दोन महिला भाविकांना वाचवण्यात यश आले नाही आणि त्यांचा मृत्यू झाला. या अपघातामुळे प्रशासनाच्या सुरक्षा नियोजनावर आणि बोटी चालवणाऱ्यांच्या निष्काळजीपणावर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *