गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेत घडलेल्या दुर्दैवी सर्पदंश प्रकरणानंतर आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आश्रमशाळेत झोपेत असताना विषारी सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण राज्यभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या मनातील भीती अजूनही कायम असून, पालकांनी आपल्या मुलांच्या सुरक्षिततेच्या चिंतेपोटी त्यांना थेट घरी नेले आहे. जोपर्यंत प्रशासनाकडून सुरक्षिततेची ठोस हमी आणि योग्य उपाययोजना मिळत नाहीत, तोपर्यंत मुलांना शाळेत पाठवणार नाही, अशी आक्रमक भूमिका पालकांनी घेतली आहे.
शैक्षणिक नुकसानीची भीती आणि पालकांची चिंता: जपतलाई आश्रमशाळेतील या भयंकर दुर्घटनेनंतर पालकांमध्ये कमालीचा धसका बसला आहे. आपल्या पाल्यांचा जीव धोक्यात घालून त्यांना शाळेत पाठवायचे कसे, असा गंभीर सवाल पालक विचारत आहेत. घटनेनंतर अनेक पालकांनी घाबरून आपल्या मुलांना तातडीने घरी परत आणले आहे. मात्र, या विद्यार्थ्यांचे अजूनही इतर कोणत्याही नवीन शाळेत किंवा वसतिगृहात पुनर्वसन किंवा प्रवेश झालेला नाही. यामुळे या विद्यार्थ्यांचे नियमित शिक्षण पूर्णपणे खंडित झाले असून, त्यांचे चालू शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे मुलांचा जीव धोक्यात आहे, तर दुसरीकडे त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न अधांतरी असल्याने पालक वर्ग चिंतेत सापडला आहे.
प्रशासन आणि शासनाची कठोर पावले: या दुर्घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जपतलाई येथील संबंधित अनुदानित आश्रमशाळेची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्याचे कठोर आदेश दिले आहेत. तसेच शाळेत कोणतीही योग्य व्यवस्था किंवा मूलभूत सुविधा नसतानाही शाळेला पात्र ठरविणाऱ्या दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. याप्रकरणी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि दोन्ही वसतिगृह अधीक्षकांविरुद्ध धानोरा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय, नागपूर विभागीय आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या सर्व अनुदानित आश्रमशाळांची अचानक तपासणी करून तेथील सुरक्षितता आणि सुविधा तपासण्याचे आदेशही प्रशासनाला देण्यात आले आहेत.
सुरक्षेचा मुद्दा आणि पालकांची भूमिका: आदिवासी विकास मंत्री आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून विद्यार्थ्यांचे अन्यत्र सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, केवळ आश्वासनांवर न जुमानता प्रत्यक्षात शाळांमध्ये ठोस सुरक्षा उपाययोजना (उदा. पक्क्या इमारती, स्वच्छता, सर्प प्रतिबंधक उपाय, वैद्यकीय सुविधा आणि योग्य देखरेख) राबवाव्यात, अशी पालकांची आग्रही मागणी आहे. जोपर्यंत विद्यार्थ्यांना पूर्णपणे सुरक्षित वातावरण आणि दर्जेदार शिक्षणाची खात्री मिळत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही, असा इशारा पालकांनी दिला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे आदिवासी आश्रमशाळांच्या कारभारातील अनास्था पुन्हा एकदा उघड झाली असून प्रशासनासमोर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
शहर
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पाण्याची तीव्र टंचाई! सर्व धरणसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित; विभागीय आयुक्तांचे वीजपंप जप्त करण्याचे कठोर आदेश
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
महाराष्ट्र
- नागपूर: ऑपरेशन टायगर' ते डीजे बंदी; राजकीय घडामोडींवर सचिन अहिर यांचे विविध मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य!
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- नंदुरबार: गावोगावी उभे राहिलेत दोन गट, पक्षात गटबाजीचा आजार..; शिंदेंच्या आमदारानेच उघड केली स्वतःच्या पक्षाची पोलखोल!
गुन्हा
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला


























Subscribe to my channel




