
Eknath Shinde : फेरीवाल्यांची दादागिरी ही कल्याण डोंबिवलीकरांसाठी काही नविन राहीलेली नाही. मात्र ही दादागिरी आता एवढी वाढली आहे की नागरिकांना मारहाण करत गंभीर जखमी करण्यासही हे फेरिवाले मागे पुढे पहात नाहीत.
पालिका कर्मचारी तसेच नागरिकांना फेरिवाल्यांनी मारहाण केल्याच्या चार ते पाच घटना आत्तापर्यंत घडल्या आहेत. फेरिवाल्यांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल होऊन देखील त्यांना त्याचे भय राहीलेले नाही. आपली दहशत फेरिवाले कायम ठेवून असल्याचेच नुकत्याच घडलेल्या आयटी इंजिनिअर मारहाणी प्रकरणावरुन ही बाब स्पष्ट होत आहे.
|
Pune News : पुण्यातील येरवडा पुन्हा एकदा हादरलं, भर दिवसा करण्यात आला कैद्याचा खून |
कल्याण डोंबिवलीतील स्टेशन परिसर, मुख्य रस्ते, पदपथ हे फेरीवाल्यांनी काबीज केले असून नागरिकांना चालण्यासाठी देखील जागा उरत नाही. डोंबिवली स्टेशन बाहेरील परिसरात इंदिरा चौक, कामथ मेडिकल पदपथ, उर्सेकरवाडी, मधुबन टॉकीज गल्ली ही आपल्या मालकीची आहे अशा अविर्भावात ठराविक फेरीवाले हे या भागात वावरत आहेत.
या जागेचे आम्ही भाडे देतो असे उघड सांगत दहशतीचा अवलंब करुन व्यवसाय करतात. अनधिकृत फेरिवाले, फुटपाथ, रस्ते काबीज करणारे फेरिवाले यांच्याविरोधात महापालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत असली तरी ही कारवाई केवळ दिखावेगिरी असते. ठराविक पावती फाडली की फेरीवाल्यांना त्यांचे सामान परत मिळते. पालिकेच्या काही कर्मचाऱ्यांशी फेरिवाल्यांचे लागेबंध निर्माण झाले आहेत. त्यांना ठराविक रक्कम दिली की ते तुमच्या सामानाला हात देखील लावत नाहीत.
कारवाई करुन सामान घेऊन गेले तरी नंतर राजकीय बड्या पदाधिकाऱ्यांच्या एका फोनवर हे सामान त्यांना परत केले जाते. दिवाळीमध्ये याचा सर्वाधिक प्रत्यय आला. रस्त्यांवर फटाके विक्री करण्यास मनाई असताना देखील फेरीवाल्यांनी स्टॉलवर राजकीय बडे नेते, पदाधिकाऱ्यांचे फोटो लावून बिनधास्त आपला व्यवसाय केल्याचे दिसून आले. केडीएमसीत नवनिर्वाचित आयुक्त आले की ते फेरिवाले हटविण्याचे आदेश काढतात, त्यानुसार अतिक्रमण विभाग तात्पुरती कारवाई करते. शहरात राजकीय नेत्यांच्या सभा, दौरे, आयुक्त, प्रभाग अधिकारी यांचा दौरा असल्यास या परिसरातील फेरिवाले त्या त्या वेळेपुरते हटल्याचे आढळून येते. परंतू हे दौरे, सभा पार पडताच पुन्हा फेरिवाले आपला परिसर काबीज करत आहेत.
फेरीवाल्यांची दहशत एवढी का वाढली ? त्यांना कोणी खतपाणी दिले हा मुख्य मुद्दा आहे. यावर आता फेरिवाल्यांनीच बोलण्यास सुरुवात केली आहे. फेरिवाल्यांकडून स्थानिक लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षातील पदाधिकारी, पालिका कर्मचारी, अधिकारी यांना ठराविक हप्ते जातात. स्टेशन परिसरातील दुकानदार आपल्याच दुकानातील माल या फेरिवाल्यांना विक्रीसाठी देत दुकानासमोर जागा ही उपलब्ध करुन देतात. यामध्ये बाहेरुन आलेल्या विक्रेत्यांची संख्या अधिक असून त्यांची मुजोरी वाढत आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



