नवी दिल्ली: 'चलो संसद' मोर्चावर सोमवारी झालेला पोलिसांचा लाठीमार आणि अश्रुधुराच्या कारवाईनंतर मंगळवारी पुन्हा शेकडो विद्यार्थी आणि कॉक्रोच जनता पक्षाचे (सीजेपी) समर्थक जंतरमंतरवर तेवढ्याच उत्साहाने परतले आहेत. निःशस्त्र विद्यार्थ्यांवर केलेल्या बळाच्या वापरामुळे सीजेपीचे आंदोलन अधिकच मजबूत झाल्याचे चित्र आहे.
पोलिसांनी सोमवारी सायंकाळी जंतरमंतरवरील तंबू व व्यासपीठ उखडून टाकून उर्वरित विद्यार्थ्यांना हटवले होते. त्यानंतर दीपके यांच्यासह कार्यकर्ते रात्रभर जवळच्याच केरळ हाऊस परिसरात थांबून होते. मात्र, मंगळवारी दिवसाच्या सुरुवातीलाच सीजेपीने पुन्हा जंतरमंतरवरच आंदोलनाचा निर्धार व्यक्त केला. समाज माध्यमांवरून हे वृत्त पसरताच विद्यार्थी जंतरमंतरवर जमा होऊ लागले. सकाळी साडेऊनच्या सुमारास आंदोलनस्थळ भरून गेले. पोलिसांनी हटवलेले तंबू पूर्ववत करण्यात आले. ज्या व्यासपीठावर वांगचुक उपोषणाला होते, तिथे आंदोलकांनी ठाण मांडले आहे. एकीकडे या आंदोलनाला पाठिंबा वाढत असताना आता आंदोलकांचे संदेश दिल्ली पोलिसांच्या रडारवर आल्याचे पाहायला मिळत आहे.
विद्यार्थ्यांच्या चॅट्समध्ये नेमकं काय आढळलं?
मिळालेल्या माहितीनुसार, सीजेपीच्या मोर्चाप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आंदोलकांमध्ये झालेला कथित संवाद उघडकीस आला आहे. संदेशांतून असे दिसून येते की, इंटरनेट सेवा बंद पडल्यास संपर्क कायम राखण्याची तयारी केली जात होती; तसेच या उद्देशासाठी जीव देण्याची तयारीही दर्शवली जात होती. कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी तपास अधिकारी त्या 'चॅट्स'ची सत्यता आणि त्यात सहभागी असलेल्या व्यक्तींची ओळख पडताळून पाहत असल्याचे सूत्रांनी सांगितले. आंदोलकांनी ब्लूटूथ सिग्नल वापरून काम करू शकणाऱ्या काही ॲप्लिकेशन्सचीही सूचना केली होती, असेही तपासात समोर आले आहे.
दिल्ली पोलिसांचा खुलासा
सीजेपीने आयोजित केलेल्या 'चलो संसद' मोर्चा रोखल्यानंतर पोलिसांनी लाठीमार केला आणि अश्रुधुराचा मारा केला. मात्र, रोखलेल्या आंदोलकांपैकी एकही जण ताब्यात नाही, असा खुलासा दिल्ली पोलिसांनी केला आहे. शेकडो आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा सीजेपीने दावा केला होता. मात्र, नंतर सर्व समर्थकांची सुटका झाल्याचे स्पष्ट करून, सीजेपीने दिल्ली पोलिसांच्या मुख्यालयासमोर होणारे आंदोलन मागे घेतले. तत्पूर्वी, सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी 'एक्स'वर पोस्ट करून आरोप केला होता की, पोलिसांनी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांवर बळाचा वापर करून शेकडो लोकांना ताब्यात घेतले आहे आणि वकिलांनाही त्यांची भेट घेऊ दिली जात नाही. यावर दिल्ली पोलिसांनी खुलासा करताना नागरिकांनी कोणत्याही पडताळणीशिवाय अफवा किंवा अपमाहिती पसरवू नये, असे आवाहन केले.
अभिजीत दीपके यांचे गंभीर आरोप
अभिजीत दीपके म्हणाले की, "सुरक्षा कर्मचाऱ्यांशी झालेल्या संघर्षाने आम्ही घाबरलेलो नाही. उलट या घटनेमुळे आंदोलनात अधिक लोक सामील झाले आहेत. सरकारने आमचा वेळ वाया घालवला. त्यांनी आमच्या शिष्टमंडळाला बोलावून त्यांचे मोबाइल फोन जप्त केले. आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी अक्षरशः नजरकैदेत ठेवण्यात आले होते. आमच्या टीमला पांगवण्याची सरकारची संपूर्ण योजना होती जेणेकरून गोंधळ उडल्यावर तिथे कोणीही उपस्थित राहणार नाही. म्हणूनच त्यांना पाच तास थांबवून आमचा वेळ वाया घालवला. एकीकडे तुम्ही चर्चेचे आवाहन करता, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांवर लाठीमार करता, हे योग्य नाही. आमचे आंदोलन सुरूच राहणार आहे." दरम्यान, दीपके यांच्या आरोपांवर केंद्र सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
शहर
- कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला, तरी धरणांमधील पाणीसाठा वाढla; राधानगरी धरण ८० टक्के भरले!"
- मराठवाड्यात ढगाळ वातावरण आणि केवळ रिमझिम पावसावर बोळवण; दमदार पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजाची चिंता कायम!"
- नागपूर: विदर्भात पुलावर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प, पिकांना जीवदान; हवामान विभागाकडून आगामी ३ दिवस पावसाचा इशारा
- छत्रपती संभाजीनगर: रिक्षातून जाताना उचचललं, वाळूचं कमिशन न दिल्यानं 'गुड्डू भैय्या'च्या थारमध्ये डांबून अपहरण; संतापजनक प्रकार उघड
महाराष्ट्र
- कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला, तरी धरणांमधील पाणीसाठा वाढla; राधानगरी धरण ८० टक्के भरले!"
- मराठवाड्यात ढगाळ वातावरण आणि केवळ रिमझिम पावसावर बोळवण; दमदार पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजाची चिंता कायम!"
- नागपूर: विदर्भात पुलावर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प, पिकांना जीवदान; हवामान विभागाकडून आगामी ३ दिवस पावसाचा इशारा
- छत्रपती संभाजीनगर: रिक्षातून जाताना उचचललं, वाळूचं कमिशन न दिल्यानं 'गुड्डू भैय्या'च्या थारमध्ये डांबून अपहरण; संतापजनक प्रकार उघड
गुन्हा
- कर्नाटक: आर्थिक विवंचनेतून व्यापाऱ्याने पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून संपवले स्वतःचे जीवन; सुसाईड नोटमुळे धक्कादायक उलगडा
- बदलापूर: साडीच्या वादातून पत्नीने केली अपंग पतीची निर्घृण हत्या; ७ वर्षांच्या चिमुकल्याच्या जबाबानूड पोलखोल
- मध्य प्रदेश: दिवसाढवळ्या थरारक हत्याकांड! हॉटेलबाहेर ६० वर्षीय वकीलाची गोली झाडून निर्घृण हत्या, ३ हल्लेखोर फरार
- सांगली: पेठनाका येथे भीषण अपघात, डंपरच्या धडकेत पतीचा जागीच मृत्यू, पत्नी गंभीर जखमी; परिसरात शोककळा
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- कर्नाटक: आर्थिक विवंचनेतून व्यापाऱ्याने पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून संपवले स्वतःचे जीवन; सुसाईड नोटमुळे धक्कादायक उलगडा
- हरियाणा: बहिणीच्या लग्नाच्या शॉपिंगसाठी घराबाहेर पडली, दुसऱ्या दिवशी सकाळी कालव्यात आढळला तरुणीचा अर्धनग्न मृतदेह; हरियाणात खळबळ
- सिक्कीम: बोगद्यात मिथेन गॅसचा भीषण स्फोट, दरड कोसळून ९ कामगारांचा मृत्यू; अनेक जण अडकल्याने खळबळ
- दिल्ली: प्रसिद्ध मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमीत मुलांसह जंतरमंतरवरील आंदोलनात सहभागी, व्हिडीओ व्हायरल























Subscribe to my channel



