नवी दिल्ली: 'चलो संसद' मोर्चावर सोमवारी झालेला पोलिसांचा लाठीमार आणि अश्रुधुराच्या कारवाईनंतर मंगळवारी पुन्हा शेकडो विद्यार्थी आणि कॉक्रोच जनता पक्षाचे (सीजेपी) समर्थक जंतरमंतरवर तेवढ्याच उत्साहाने परतले आहेत. निःशस्त्र विद्यार्थ्यांवर केलेल्या बळाच्या वापरामुळे सीजेपीचे आंदोलन अधिकच मजबूत झाल्याचे चित्र आहे.
पोलिसांनी सोमवारी सायंकाळी जंतरमंतरवरील तंबू व व्यासपीठ उखडून टाकून उर्वरित विद्यार्थ्यांना हटवले होते. त्यानंतर दीपके यांच्यासह कार्यकर्ते रात्रभर जवळच्याच केरळ हाऊस परिसरात थांबून होते. मात्र, मंगळवारी दिवसाच्या सुरुवातीलाच सीजेपीने पुन्हा जंतरमंतरवरच आंदोलनाचा निर्धार व्यक्त केला. समाज माध्यमांवरून हे वृत्त पसरताच विद्यार्थी जंतरमंतरवर जमा होऊ लागले. सकाळी साडेऊनच्या सुमारास आंदोलनस्थळ भरून गेले. पोलिसांनी हटवलेले तंबू पूर्ववत करण्यात आले. ज्या व्यासपीठावर वांगचुक उपोषणाला होते, तिथे आंदोलकांनी ठाण मांडले आहे. एकीकडे या आंदोलनाला पाठिंबा वाढत असताना आता आंदोलकांचे संदेश दिल्ली पोलिसांच्या रडारवर आल्याचे पाहायला मिळत आहे.
विद्यार्थ्यांच्या चॅट्समध्ये नेमकं काय आढळलं?
मिळालेल्या माहितीनुसार, सीजेपीच्या मोर्चाप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आंदोलकांमध्ये झालेला कथित संवाद उघडकीस आला आहे. संदेशांतून असे दिसून येते की, इंटरनेट सेवा बंद पडल्यास संपर्क कायम राखण्याची तयारी केली जात होती; तसेच या उद्देशासाठी जीव देण्याची तयारीही दर्शवली जात होती. कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी तपास अधिकारी त्या 'चॅट्स'ची सत्यता आणि त्यात सहभागी असलेल्या व्यक्तींची ओळख पडताळून पाहत असल्याचे सूत्रांनी सांगितले. आंदोलकांनी ब्लूटूथ सिग्नल वापरून काम करू शकणाऱ्या काही ॲप्लिकेशन्सचीही सूचना केली होती, असेही तपासात समोर आले आहे.
दिल्ली पोलिसांचा खुलासा
सीजेपीने आयोजित केलेल्या 'चलो संसद' मोर्चा रोखल्यानंतर पोलिसांनी लाठीमार केला आणि अश्रुधुराचा मारा केला. मात्र, रोखलेल्या आंदोलकांपैकी एकही जण ताब्यात नाही, असा खुलासा दिल्ली पोलिसांनी केला आहे. शेकडो आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा सीजेपीने दावा केला होता. मात्र, नंतर सर्व समर्थकांची सुटका झाल्याचे स्पष्ट करून, सीजेपीने दिल्ली पोलिसांच्या मुख्यालयासमोर होणारे आंदोलन मागे घेतले. तत्पूर्वी, सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी 'एक्स'वर पोस्ट करून आरोप केला होता की, पोलिसांनी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांवर बळाचा वापर करून शेकडो लोकांना ताब्यात घेतले आहे आणि वकिलांनाही त्यांची भेट घेऊ दिली जात नाही. यावर दिल्ली पोलिसांनी खुलासा करताना नागरिकांनी कोणत्याही पडताळणीशिवाय अफवा किंवा अपमाहिती पसरवू नये, असे आवाहन केले.
अभिजीत दीपके यांचे गंभीर आरोप
अभिजीत दीपके म्हणाले की, "सुरक्षा कर्मचाऱ्यांशी झालेल्या संघर्षाने आम्ही घाबरलेलो नाही. उलट या घटनेमुळे आंदोलनात अधिक लोक सामील झाले आहेत. सरकारने आमचा वेळ वाया घालवला. त्यांनी आमच्या शिष्टमंडळाला बोलावून त्यांचे मोबाइल फोन जप्त केले. आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी अक्षरशः नजरकैदेत ठेवण्यात आले होते. आमच्या टीमला पांगवण्याची सरकारची संपूर्ण योजना होती जेणेकरून गोंधळ उडल्यावर तिथे कोणीही उपस्थित राहणार नाही. म्हणूनच त्यांना पाच तास थांबवून आमचा वेळ वाया घालवला. एकीकडे तुम्ही चर्चेचे आवाहन करता, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांवर लाठीमार करता, हे योग्य नाही. आमचे आंदोलन सुरूच राहणार आहे." दरम्यान, दीपके यांच्या आरोपांवर केंद्र सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
शहर
- पुणे: नीरा शहरात एटीएम फसवणुकीचा सुळसुळाट; बँका आणि यंत्रणेच्या ढिम्म कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक भरडले
- अमरावती: स्वतःच्याच घरावर गोळीबार घडवून आणला; निलंबित तलाठ्याचा धक्कादायक डाव पोलिसांच्या तपासात उघड
- चंद्रपूर: बिबट्याचा थरार; कुत्र्याचा पाठलाग करत घरात शिरला आणि झोपलेल्या पती-पत्नीवर केला हल्ला
- मुंबई: ओव्हरटेक करण्याच्या वादातून फिटनेस ट्रेनरच्या गाडीची तोडफोड; वांद्रे तलाव परिसरात हाणामारी
महाराष्ट्र
- सातारा: रात्रगस्तीवर असलेल्या पोलिसांवर जीवघेणा हल्ला; सातारा जिल्ह्यात खळबळ
- पुणे: नीरा शहरात एटीएम फसवणुकीचा सुळसुळाट; बँका आणि यंत्रणेच्या ढिम्म कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक भरडले
- अमरावती: स्वतःच्याच घरावर गोळीबार घडवून आणला; निलंबित तलाठ्याचा धक्कादायक डाव पोलिसांच्या तपासात उघड
- चंद्रपूर: बिबट्याचा थरार; कुत्र्याचा पाठलाग करत घरात शिरला आणि झोपलेल्या पती-पत्नीवर केला हल्ला
गुन्हा
- अमरावती: स्वतःच्याच घरावर गोळीबार घडवून आणला; निलंबित तलाठ्याचा धक्कादायक डाव पोलिसांच्या तपासात उघड
- उत्तर प्रदेश: रसमलाईचा वाद अंगलट! धाकट्या भावाकडून दादा-वहिनीवर कात्रीने जीवघेणा हल्ला
- पुणे: रक्ताचा नातेसंबंध सरला: कौटुंबिक वादातून चुलत्याने केला पुतण्या आणि सासऱ्याचा खून, महंमदवाडीत खळबळ
- पुणे: पोलीस भरतीचे स्वप्न भंगले, अकॅडमीतील शिक्षकाच्या मानसिक छळाला कंटाळून २५ वर्षीय तरुणीची आत्महत्या
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: डेंग्यूचा हाहाकार अवघ्या १० दिवसांत ७१ रुग्ण, आरोग्य यंत्रणेत खळबळ
- राजस्थान: बायकोपासून पैसे लपवण्यासाठी शेतकऱ्याने शेतात पुरले ५ लाख रुपये; वर्षभरानंतर नोटा वाळवीने खाल्ल्याचे पाहून बसला धक्का!
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
























Subscribe to my channel



