
Chhatrapati Sambhajinagar : फेब्रुवारी महिना सुरु असून आतापासून उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरवात झाली आहे. अर्थात उन्हाळ्याची चाहूल लागताच मराठवाड्यात टँकरची मागणी सुरु झाली आहे. आतापर्यंत जवळपास ४० गाव-वस्तीवर टँकरने पाणीपुरवठा करावा; अशी मागणी आल्याची सांगितले जात आहे. मात्र अद्याप एकही टँकर मंजूर झालेले नाही. आगामी काही दिवसात हे टँकर सुरु करावे लागणार आहेत.
मागील वर्षी कमी पावसाळा झाल्यामुळे सर्वत्र भीषण पाण्याची टंचाई जाणवली होती. यामुळे गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांत २१६ टँकरने पाणी पुरवठा केला जात होता. त्यात सर्वाधिक १०५ टँकर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होते. मात्र यंदाची परिस्थिती वेगळी असून पाऊस चांगला झाल्यामुळे फारसा तुटवडा जाणवणार नाही अशी शक्यता वर्तविली जात आहे. तरी देखील मराठवाड्यातील काही भागात आतापासून टंचाईचा सामना करावा लागत आहे
|
Maharashtra Politics : राज-उद्धव टाळी देणार? अस्तित्वाच्या लढाईत ठाकरे बंधू एकत्र? |
तरीही टँकरसाठी प्रस्ताव
मागील वर्षी काही जिल्ह्यात जास्त पाऊस, तर काही जिल्ह्यात कमी पाऊस पडला होता. मात्र, सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाल्याने मराठवाड्यात पाणीच पाणी झाले होते. या अतिवृष्टीत ३० लाख हेक्टरपेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाले होते. या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला बसला होता. एकीकडे ही स्थिती असताना दुसऱ्या बाजूला जानेवारीपासूनच अनेक भागात पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे टँकरच्या मागणीचे अर्ज येऊ लागले आहेत.
पाण्यासाठी सुरु झाली भटकंती
दरम्यान उन्हाचा पारा वाढल्यानंतर टँकर सुरू होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यात विभागातील सरासरी कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास जात आहे. काही गावांमधून पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर



























Subscribe to my channel




