बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून काही शाळांचे खाजगीकरण करण्यात आल्याचे बोलले जात होते. मात्र आता यावर पालिकेने उत्तर दिले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून कोणत्याही माध्यमांच्या शाळांचे खासगीकरण करण्यात आलेले नाही असं पालिकेने बजावून सांगितले आहे. तसेच मुंबईतील मराठी माध्यमांच्या शाळांच्या मुद्द्यांवर महानगरपालिका प्रशासन संवेदनशील आहे. मुंबईतील मराठीसह इतरही माध्यमांच्या शाळा आणि विद्यार्थी संख्या वाढावी, शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी महानगरपालिका प्रशासन साततत्याने विविध उपक्रम, योजना राबवित असते असंही पालिकेने म्हटले आहे.
कोणत्याही माध्यमांच्या शाळांचे खासगीकरण नाही
मुंबई महापालिकेने स्पष्ट केले की, पालिका प्रशासनाकडून कोणत्याही माध्यमांच्या शाळांचे खासगीकरण करण्यात आलेले नाही. महानगरपालिका शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढावी यासाठी महानगरपालिका प्रशासन सातत्याने प्रयत्न करीत असते. एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये हेच आमचं ध्येय आहे. यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून पालकांचेही समुपदेशन करण्यात येत असते.
विद्यार्थ्यांनी मिळवले घवघवीत यश
गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांमुळे मार्च 2025 मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत महानगरपालिकेच्या मराठी शाळांचा 95 टक्के इतका निकाल लागला. महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीत 97 टक्के इतके गुण पटकावले आहेत. यासोबतच गुणवत्ता वाढ, सराव परीक्षा असे उपक्रम राबविण्यात येतात. महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांकडून कोणत्याही स्वरूपाचे फी घेतली जात नाही. विद्यार्थ्यांना 27 प्रकारच्या शैक्षणिक वस्तूंचे मोफत वाटप केले जाते. महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांमध्ये शालेय गुणवत्तेसोबत क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळविण्यासाठी उपलब्ध जागेमध्ये क्रीडा प्रशिक्षण दिले जाते.
खान अकॅडमीच्या माध्यमातून गणित व विज्ञान विषयाचा अतिरिक्त सराव विद्यार्थ्यांसाठी नि:शुल्क उपलब्ध करुन दिले जाते. यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीत उत्तम परिणाम दिसून येत आहे. महानगरपालिचा विद्यार्थी खासगी शाळेपेक्षाही अधिक गुणसंपन्न आणि त्याच्याकडे विविध शैक्षणिक सुविधा असाव्यात, यासाठी महानगरपालिका प्रयत्न करत असते. महानगरपालिकेने फाऊंडेशनल लिटरसी व न्यूमरसी (एफएलएन) निपूण भारत अंतर्गत महानगरपालिकेने केलेल्या प्रयत्नांमुळे तिसऱ्या इयत्तेतील प्रत्येक माध्यमाचा विद्यार्थी उत्तमप्रकारे वाचू शकतो. तसेच, त्या-त्या स्तरावरील गणिताचे ज्ञानही त्याला उत्तमरित्या अवगत होत आहे. यासाठी महानगरपालिकेने विशेष प्रयत्न केले असून याच चांगले परिणाम दिसून येत आहे.
शाळेबाबत प्रशासनाचे योग्य नियोजन
मुंबईतील मराठी शाळा आणि शिक्षण हा सामजिक आणि शैक्षणिक मुद्दा आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून कोणत्याही माध्यमांच्या शाळांचे खासगीकरण करण्यात आलेले नाही. बृहन्मुंबई महानगरपालिका मराठी शाळांबाबत चुकीचे धोरण राबवित असल्याचे जे आभासी चित्र निर्माण केले जात आहे, ते पूर्णपणे चुकीचे असल्याचे महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मराठी माध्यमांच्या सर्व शाळा प्रभावीपणे चालविण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन पूर्वीपासूनच गांभीर्याने नियोजन व कार्यवाही करीत आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मराठी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होऊ नये, किंबहुना ही संख्या वाढावी यासाठी महानगरपालिकेच्या वतीने मागील 10 ते 15 वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. एवढेच नव्हे तर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये अभिनव उपक्रम देखील राबवले जातात अशी माहिती पालिकेने दिली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेचा मुंबई पब्लिक स्कूल प्रकल्प
मुंबईच्या प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षण मिळावे, हीच बृहन्मुंबई महानगरपालिकेची (BMC) संकल्पना आहे. म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिकेने आपल्या शाळांना नवे रूप दिले ज्याचे नाव आहे मुंबई पब्लिक स्कूल (MPS) आहे. मुंबई पब्लिक स्कूल ही एक क्रांती आहे. BMC मुंबई पब्लिक स्कूल प्रकल्पांतर्गत, शहरातील अनेक शाळा आता CBSE, ICSE, IGCSE आणि IB सारख्या आंतरराष्ट्रीय बोर्डशी संलग्न आहेत. ज्यांतर्गत सद्यस्थीतीला
19 सीबीएसई
1 आयजीसीएसई
1 आयसीएसई
1 आयबी
मंडळाच्या शाळा कार्यरत आहेत.
पूर्वी एक भ्रम होता की, बीएमसी शाळांमधील शिक्षण म्हणजे द्रारिद्र्य रेषेखालच्या विद्यार्थ्यासाठीचे शिक्षण आहे. मात्र मुंबई पब्लिक स्कूल प्रकल्पांतर्गत एक गोष्ट आनंदाने सांगवीशी वाटते की, आता त्याच शाळांमध्ये एडमिशन मिळवण्याकरिता विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद लाभतो. काहिवेळेला अशी परिस्थिती उद्भवते की लॉटरी सिस्टम च्या माध्यमातून आपल्याला विद्यार्थ्यांची निवड करावी लागते. बऱ्याच हे प्रमाण एका जागेमागे 10 अर्ज इतक्या स्तरावर पोहोचते.
मुंबई पब्लिक स्कूल अंतर्गत मुलांना खालील विविध सुविधा मिळतात
- पूर्णपणे मोफत शिक्षण – शाळा फी, पुस्तके, युनिफॉर्म, मिड-डे मील!
- आधुनिक डिजिटल क्लासरूम, ऑडिओ-व्हिज्युअल एड्स
- कुशल आणि प्रशिक्षित शिक्षक
- लायब्ररी, लॅबोरेटरी, खेळाचे मैदान
- अतिरिक्त उपक्रम – स्पोर्ट्स, आर्ट्स, स्कॉलरशिप योजना
विविध पालकांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता त्यांचे म्हणणे आहे की, “आधी आम्ही खासगी शाळेसाठी खूप पैसे खर्च करायचो. आता MPS प्रकल्पामध्ये माझं मुलं मोफत शिकतंय आणि दर्जा खूप चांगला आहे!”
BMC ने जुनी शाळांची दुरुस्ती, नवीन इमारती बांधणे, आणि शिक्षकांचे प्रशिक्षण यावर भर दिला आहे. आज 1100+ शाळांमध्ये सुमारे 3 लाख विद्यार्थी मोफत शिक्षण घेत आहेत. यात मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू अशा 8 माध्यमांचा समावेश आहे.
हे प्रकल्प केवळ शिक्षण देत नाही, तर मुंबईच्या प्रत्येक मुलाला स्वप्न पाहण्याची, मोठं होण्याची संधी देत आहे. BMC मुंबई पब्लिक स्कूलमध्ये प्रवेश घेण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी भेट द्या: www.mcgm.gov.in किंवा www.mumbaipublicschools.in किंवा BMC च्या शिक्षण विभागाशी संपर्क साधा.
शहर
- कोल्हापुरात संतापजनक प्रकार! लॉजवर बोलावून सुरू होते बेकायदेशीर गर्भलिंग निदान; पोलिसांचा छापा पडताच तोतया डॉक्टर मशीन घेऊन पसार, महिला व एजंट ताब्यात"
- राष्टकुल खेळ २०२६: महाराष्ट्राच्या तेजस शिर्सेची ऐतिहासिक कामगिरी; पुरुष 110 मीटर हर्डल्सच्या अंतिम फेरीत धडक, भारताला पदकाची मोठी आशा"
- हुडकेश्वर पोलिस ठाण्यातून कुख्यात चोर फरार; शौचालयाच्या बहाण्याने पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून आरोपी पसार, खात्यात एकच खळबळ"
- महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य! महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात राबवणार १० कलमी राष्ट्रीय कृती आराखडा; राष्ट्रीय महिला आयोगाची मोठी घोषणा"
महाराष्ट्र
- नांदेड शहरात तासभर कोसळला मुसळधार पाऊस; मराठवाड्यातील इतर भागांत हलक्या सरी आणि रिमझिम"
- लातूर: स्मार्ट मीटर काढा आणि जुने मीटर पूर्ववत बसवा; महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात आणि स्मार्ट वीज मीटरच्या सक्तीविरुद्ध नागरिकांचा संताप व तीव्र आंदोलन
- कोल्हापुरात संतापजनक प्रकार! लॉजवर बोलावून सुरू होते बेकायदेशीर गर्भलिंग निदान; पोलिसांचा छापा पडताच तोतया डॉक्टर मशीन घेऊन पसार, महिला व एजंट ताब्यात"
- कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाचा अजब कारभार; विद्यार्थ्यांच्या कष्टाच्या पैशातून भरला कर्मचाऱ्यांचा आयकर दंड, शैक्षणिक वर्तुळात तीव्र संताप
गुन्हा
- बीड: आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथे १९ वर्षीय युवकाने संपवले जीवन, सकाळी गायरानात आढळला मृतदेह
- बंगळुरू: पतीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून बाळंतीणीने संपवले जीवन, मृतदेहाशेजारीच शांत झोपलेला होता ७ महिन्यांचा चिमुकला
- मुंबईत सायबर गुन्हेगारीचा मोठा धक्का! दिल्ली पोलिसांच्या नावे आभासी अटकेत ठेवून वृद्ध व्यावसायिकाची तब्बल आठ कोटी रुपयांची फसवणूक"
- चंद्रपुर: हॉटेलमध्ये घुसून एमआयएमच्या एकमेव नगरसेवकावर १५ ते १६ जणांकडून प्राणघातक हल्ला, राजकीय वर्तुळात चिंता
राजकीय
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
इतर
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- चंदीगड: ट्यूशन घेणाऱ्या पत्नीचे २० वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत अफेअर, पतीने रंगेहाथ पकडल्यानंतर उचलले टोकाचे पाऊल
- नवी दिल्ली: झारखंड हायकोर्टाचा मोठा निर्णय: रात्री २ वाजता बायकोने काजळ-लिपस्टिक लावले म्हणजे ती मानसिक रोगी ठरत नाही
- नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- 'हा लोकशाहीचा विजय'
- नवी दिल्ली: 'आताची पिढी प्रश्न विचारतेय, ऐकून घ्यायला हवं'; CJP आंदोलनावर सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य



























Subscribe to my channel



