बांगलादेशमध्ये अलिकडेच निवडणुका पार पडल्या. यात बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने बहुमत मिळवले आहे. आता 17 तारखेला बांगलादेशचे नवनिर्वाचित पंतप्रधान तारिक रहमान यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या समारंभाला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आहे. या सोहळ्यासाठी भारताकडून लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना बांगलादेशला पाठवले जाणार आहे. त्यांच्यासोबत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री देखील असणार आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
ओम बिर्ला बांगलादेशला जाणार
बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे नेते तारिक रहमान यांचा शपथविधी सोहळा 17 फेब्रुवारी रोजी ढाका येथील राष्ट्रीय संसद भवनाच्या दक्षिण प्लाझा येथे पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात आले होते, मात्र याच काळात मुंबईत फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा आणि दिल्लीत AI शिखर परिषदेच्या तयारीमुळे पंतप्रधान मोदी बांगलादेशला जाऊ शकणार नाहीत. त्यांचा जागी ओम बिर्ला बांगलादेशला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचा दणदणीत विजय
बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने बांगलादेशच्या 13 व्या संसदीय निवडणुकीत दमदार विजय मिळवला आहे. तारिक रहमान आता पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहोत. त्यांचे वडील झियाउर रहमान बीएनपीचे संस्थापक होते आणि त्यांची आई खालिदा झिया माजी पंतप्रधान होत्या. रहमान यांनी 2008 मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे देश सोडला होता. मात्र अलिकडेच पार पडलेल्या निवडणुकीत रहमान यांनी दोन तृतीयांश बहुमत मिळवून इतिहास रचला. आता पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर लोकशाही, कायदा आणि सुव्यवस्था आणि आर्थिक स्थिरता मजबूत करण्याचे आवाहन त्यांच्यासमोर असणार आहे.
दोन्ही देशांमधील संबंध आणखी सुधारणार
तारिक रहमान यांच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 फेब्रुवारी रोजी फोनवरून रहमान यांचे अभिनंदन केले आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी त्यांनी केलेल्या सर्व बलिदानांची आठवण केली. त्यांच्या शपथविधीला जगभरातील अनेक नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. आता भारतही आपले प्रतिनिधी पाठवणार आहे. हे दोन्ही देशांमधील नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे. बीएनपीने नेहमीच भारतासोबत संबंध सुधारण्यावर भर दिला आहे. त्यामुळे आगामी काळात दोन्ही देशांमधील संबंध आणखी सुधारण्याची शक्यता आहे.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल

























Subscribe to my channel



