
Gujarat : गुजरात पोलिसांनी शनिवारी पहाटे ३ वाजता सुरू केलेल्या कारवाईत अहमदाबाद आणि सुरत या दोन प्रमुख शहरांमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या १,०२४ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले. अहमदाबादमध्ये ८९० तर सुरतमध्ये १३४ लोकांना ताब्यात घेण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
गुजरातचे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी मध्यरात्री झालेल्या या कारवाईला गुजरात पोलिसांसाठी “ऐतिहासिक विजय” म्हटले. काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. या दहशतवादी हल्ल्याला भारताने पाकिस्तानला जबाबदार धरले आहे. परंतु, शनिवारी गुजरातमध्ये ताब्यात घेण्यात आलेले नागरीक बांगलादेशी असल्याचा दावा करण्यात येत आहे. अहमदाबादमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शनिवारी पहाटे सांगितले की, “आज सकाळी ३ वाजल्यापासून अहमदाबाद गुन्हे शाखेने एसओजी, ईओडब्ल्यू, झोन ६ आणि मुख्यालयातील पथकांसह अहमदाबाद शहरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या परदेशी स्थलांतरितांना पकडण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन केले. या कारवाईदरम्यान, ४०० हून अधिक संशयास्पद स्थलांतरितांना ताब्यात घेण्यात आले आहे.” तर, दुपारपर्यंत ही संख्या ८९० पर्यंत पोहोचली. अहमदाबाद शहरातील चांदोला तलाव परिसरातून बहुतेक लोकांना ताब्यात घेण्यात आले.
|
|
अटक केलेल्यांना प्रथम कांकरिया फुटबॉल ग्राउंडवर ठेवण्यात आले आणि नंतर शहरातील रस्त्यांवरून गुन्हे शाखेच्या गायकवाड हवेली मुख्यालयात परेड करून नेण्यात आले, पोलिसांनी लाँग मार्चचे ड्रोन व्हिडिओ प्रसारित केले. नंतर सकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यव्यापी पोलीस बैठक आयोजित करण्यात आली. यामध्ये गुजरातचे पोलीस महासंचालक (डीजीपी) विकास सहाय अहमदाबादहून तर गृहराज्यमंत्री हर्ष संघवी सुरतहून सामील झाले.
बैठकीनंतर बोलताना मंत्री संघवी म्हणाले, “गुजरात पोलिसांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. अहमदाबाद पोलिसांनी ८९० बेकायदेशीर बांगलादेशींना ताब्यात घेतले आहे आणि सुरत पोलिसांनी १३४ जणांना ताब्यात घेतले आहे. गुजरात पोलिसांची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. हे बांगलादेशी बनावट कागदपत्रे बनवून (पश्चिम) बंगालमधून बेकायदेशीरपणे येतात आणि गुजरात आणि भारतातील इतर राज्यांमध्ये पोहोचतात. त्यापैकी बरेच जण ड्रग्ज कार्टेल, मानवी तस्करीमध्ये सहभागी आहेत. तसंच, अल कायदासाठी स्लीपर सेल म्हणून काम करताना दोन बांगलादेशींना पकडण्यात आले होते.”
संघवी यांनी इतर सर्व बेकायदेशीर स्थलांतरितांना स्थानिक पोलीस ठाण्यात शरण जाण्याचा करण्याचा इशारा दिला. ते म्हणाले, “या सर्व बांगलादेशींच्या पार्श्वभूमी कारवायांची चौकशी सुरू आहे आणि मी त्यांना एक स्पष्ट संदेश देऊ इच्छितो. एकतर स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जा आणि २ दिवसांच्या आत बेकायदेशीर बांगलादेशी म्हणून आत्मसमर्पण करा, अन्यथा गुजरात पोलिस “ना भूतो ना भविष्य” प्रकारची कठोर कारवाई करतील.
बांगलादेशी नागरिकांना बेकायदेशीर वास्तव्यासाठी मदत करणाऱ्यांना इशारा देताना संघवी म्हणाले, “जर एकाही घुसखोराला आश्रय दिला तर त्यांचीही अवस्था वाईट होईल. त्यांना आश्रय देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.” बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांसाठी बनावट कागदपत्रे बनवणाऱ्यांची पोलीस चौकशी करतील असेही त्यांनी सांगितले.
शहर
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
महाराष्ट्र
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- जळगाव: रक्षाबंधनादिवशी स्टेटस ठेवून भावाने संपवले जीवन, सणाचा आनंद शोकात बदलला
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!


























Subscribe to my channel


