
Bacchu Kadu : अमरावतीच्या अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी पोलीस अधीक्षकांना एक खळबळजनक पत्र लिहलं आहे. या पत्रात त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोप केला आहे. सध्याचे राजकीय वातावरण लक्षात घेता माझ्यावर जीवघेणा हल्ला करण्याचं कटकारस्थान रचले जात आहे. जर माझ्या जीवास काही झाले, तर याची जबाबदारी आपली राहील, असं बच्चू कडू यांनी पत्रात म्हटलं आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबधितांवर गुन्हा दाखल करून त्यांना जेरबंद करावे, अशी मागणी देखील बच्चू कडू यांनी पत्रात केली आहे. त्यांच्या या पत्रामुळे अमरावती जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. आमदार बच्चू कडू यांचा घातपात करण्याचा कोणाचा प्लँन? अशा चर्चा शहरात सुरू झाल्या आहेत.
|
|
बच्चू कडू यांनी पत्रात काय म्हटलंय?
अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना लिहलेल्या पत्रात बच्चू कडू म्हणतात, "आज सकाळी गोपनीय माहितीनुसार मला २ संदेश प्राप्त झाले आहे. त्यामधून पहिल्या संदेशामध्ये दि.०४/०५/२०२४ रोजी रात्रीच्या सुमारास विदर्भ मिल स्टॉप अचलपूर परिसरातील भाजीपाला विक्रेत्याजवळ दुचाकीवरून तोंडाला रुमाल बांधून एक माणूस आला".
"भाजीपाला विक्रेत्यासबोत चर्चा करताना म्हणाला की, मी शिंदे साहेबांचा कट्टर कार्यकर्ता आहे. मी गडचिरोली येथे राहत असून नक्षलवाद्यांशी माझे नजिकचे संबंध आहे. बच्चू कडूला पाहून घेऊ. जसे बाळासाहेब ठाकरे यांनी दिघेला संपविले तसेच शिंदे साहेब बच्चू कडूला संपवणार. नाहीतर मीच स्वतः बच्चू कडूला संपवणार. बच्चू कडू म्हणजे काहीच नाही".
"यानंतर त्याने खिशातून मोबाईल काढून मुख्यमंत्री शिंदे आणि मंत्र्यांचे फोटो दाखवले. माझ्या डोक्यावर सर्वांचा हात असून मला कुणी काहीच करू शकत नाही. बच्चू कडूला पाहून घेऊ, असं या व्यक्तीने म्हटले". दुसऱ्या संदेशामध्ये चांदूर बाजार शहरामधील एका हॉटेलमध्ये ३ इसमांकडून माझ्या नावाचा वाकप्रचार करीत आज मौका देख के कडू का चौका मारेंगे असा संवाद करीत असल्याबाबत संदेशामध्ये नमूद आहे, असं कडू यांनी पोलिसांनी लिहलेल्या पत्रात म्हटलं.
इतकंच नाही, तर माझा अपघात झाला असल्याबाबतचे मला २ ते ३ दिवसापासून माझ्या मतदार संघातील कार्यकर्त्यांचे, नागरिकांचे फोन येत आहे. माझा अपघात झाला असल्याची अफवा पसरविण्याचे काम सुरू आहे. तरी प्राप्त झालेल्या गोपनिय माहीतीच्या अनुषंगाने उपरोक्त दोन्ही प्रकरणांची सखोल चौकशी करून संबधित व्यतीवर गुन्हा दाखल करून त्यांना जेरबंद करण्यात यावे. जर माझ्या जिवितेला धोका उद्भवल्यास याची जबाबदारी आपलेवर राहील, असं आमदार कडू यांनी पत्रात म्हटलंय.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



