नवी दिल्ली/मुंबई: भारतीय खाद्यसंस्कृतीतील अविभाज्य घटक असलेल्या पनीरच्या गुणवत्तेबाबत केंद्र सरकारने आता अत्यंत कडक पावले उचलली आहेत. बाजारात आणि हॉटेल्समध्ये पनीरच्या नावाखाली सर्रास विकल्या जाणाऱ्या 'आर्टिफिशियल पनीर' (चीज अॅनालॉग) विरोधात सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. यामुळे आता ग्राहकांना आपण नेमके काय खातोय, याची स्पष्ट माहिती मिळणार आहे.
नेमका निर्णय काय?
फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) आणि राज्य अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) आदेशानुसार, १ मे २०२६ पासून सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्य विक्रेत्यांना त्यांच्या मेनू कार्डमध्ये पनीरबाबत स्पष्ट उल्लेख करणे अनिवार्य केले आहे. जर हॉटेलमध्ये अस्सल दुधापासून बनवलेल्या पनीरऐवजी वनस्पती तेल किंवा सोयाबीनपासून बनवलेले 'अॅनालॉग पनीर' वापरले जात असेल, तर तसा स्पष्ट उल्लेख मेनू कार्डवर करावा लागेल.
का घेतली ही भूमिका?
१. आरोग्याशी खेळ: बनावट पनीरमध्ये पाम ऑइल, स्टार्च आणि घातक रसायनांचा वापर केला जातो. यामुळे कोलेस्ट्रॉल वाढणे आणि पचनाच्या तक्रारी उद्भवतात.
२. ग्राहकांची फसवणूक: खरे पनीर ३५०-४५० रुपये किलो असते, तर बनावट पनीर केवळ १५०-२०० रुपयांत मिळते. तरीही अनेक हॉटेल्स ग्राहकांकडून खऱ्या पनीरचेच पैसे उकळतात.
३. पारदर्शकता: ग्राहकांना आपण शाकाहारी प्रथिने घेतोय की अनहेल्दी फॅट्स, हे निवडण्याचा अधिकार मिळावा, यासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे.
नियम न पाळल्यास कडक कारवाई:
सरकारने स्पष्ट केले आहे की, जर एखाद्या रेस्टॉरंटने बनावट पनीर वापरूनही मेनू कार्डवर 'पनीर' असा उल्लेख केला, तर त्यांच्यावर अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत मोठी दंडात्मक कारवाई केली जाईल. प्रसंगी हॉटेलचा परवानाही रद्द होऊ शकतो. महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच हा निर्णय घेतला होता, आता केंद्रानेही देशभर याची अंमलबजावणी करण्याचे संकेत दिले आहेत.
या निर्णयामुळे बनावट पनीरच्या बाजाराला चाप बसणार असून दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांनाही याचा मोठा फायदा होणार आहे.
शहर
- मुंबई: १ ऑगस्टपासून सरकारी कामकाजात मोठा बदल; आता महत्त्वाची कागदपत्रे मिळणार फक्त डिजिटल स्वाक्षरीनेच!
- चेंबूर दुर्दैवी दुर्घटना: शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळले, तरीही अधिकारी-कंत्राटदारांना 'क्लीन चिट'; सर्व आरोपी निर्दोष
- अहिल्यानगर: श्रीगोंद्यात लग्नानंतर अवघ्या पाच दिवसांत धक्कादायक घडामोड, दोन नववधू रोख रक्कम घेऊन बेपत्ता; पोलिस तपास सुरू
- कोल्हापूर: अंबाबाई मंदिरात मोठी धार्मिक घडामोड! देवतांच्या मूर्तींचे टेंबलाई मंदिरात विधीवत स्थलांतर
महाराष्ट्र
- मुंबई: लाडकी बहीण योजनेवर 'कॅग' चा गंभीर ठपका; 3,541 कोटींच्या अतिरिक्त खर्चावर प्रश्नचिन्ह
- मुंबई: १ ऑगस्टपासून सरकारी कामकाजात मोठा बदल; आता महत्त्वाची कागदपत्रे मिळणार फक्त डिजिटल स्वाक्षरीनेच!
- चेंबूर दुर्दैवी दुर्घटना: शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळले, तरीही अधिकारी-कंत्राटदारांना 'क्लीन चिट'; सर्व आरोपी निर्दोष
- अहिल्यानगर: श्रीगोंद्यात लग्नानंतर अवघ्या पाच दिवसांत धक्कादायक घडामोड, दोन नववधू रोख रक्कम घेऊन बेपत्ता; पोलिस तपास सुरू
गुन्हा
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
- कर्नाटक :लग्नाला चार महिने, अन् संशयास्पद मृत्यू! नवविवाहितेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचे गंभीर आरोप; तपासाला वेग
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू
- कर्नाटक पर्यटन विकासाला मोठी चालना; सौंदत्ती यल्लम्मा मंदिर आणि गोकाक धबधब्यासह १३ ठिकाणी होणार हायटेक रोप-वे
- तेलंगणात भीषण हत्याकांड! पोक्सो कायद्यातील आरोपीने पत्नी, मुलांसह सहा जणांची केली हत्या; स्वतःही संपवले आयुष्य
- ९०० वर्षांचे रहस्य उलगडले! धारमधील मूर्ती सरस्वती नव्हे, तर 'देवी गायत्री'ची; आधुनिक तंत्रज्ञानातून स्पष्ट


























Subscribe to my channel




