
Alandi : संत ज्ञानेश्वर महाराजांचा १९३ वा पालखी सोहळा अवघ्या काही दिवसांवर आला आहे. मात्र लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी मात्र अद्यापाही फेसाळलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यभरातून येणाऱ्या लाखो वारकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या दहा वर्षपासून इंद्रायणी नदी प्रदूषणाचा प्रश्न प्रलंबित आहे.
इंद्रायणी प्रदूषणावर अनेकदा उपोषण झाले, आंदोलने झाली. मात्र त्याचा काही उपयोग होत नाही. आजूबाजूला असणाऱ्या औद्योगिक वसाहतीतील कंपन्या, त्यातून नदीत सोडले जाणारे सांडपाणी यामुळे नदीच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होताना पहायला मिळत आहे. वारीच्या वेळी लाखो वारकरी या इंद्रयणीत आंघोळ करतात, यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. केमिकलं युक्त पाण्याने इंद्रायणी फेसाळली आहे. त्यामुळे तिच्या संवर्धानाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
|
Pimpri-Chinchwad : तासाभरात पाणीच पाणी; चिंचवडमध्ये ११४ मिलिमीटर पावसाची नोंद |
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी याठिकाणी आले, त्यांनी पाहणी केली. नदीच्या पाण्याचे नमुने देखील तपासणे आणि नदीतील पाणी हे प्रदूषित असल्याचे त्यांनी जाहीर देखील केले. मात्र याबाबत काही ठोस पाऊले उचलली जात नाहीत. या इंद्रायणी नदी काठी असलेल्या औद्योगिक कारखान्यांमध्ये रसायन मिश्रित पाणी नदीपात्रात सोडले जाते. त्या रसायनामुळेच या नदीपात्रामध्ये फेस निर्माण होतो. नदीतील बायोकेमिकल ऑक्सिजनची (BOD) मात्रा ही ३० पेक्षा अधिक असल्याचं निदर्शनात आले आहे. मात्र तरीही कोणतीही ठोस पाऊले उचालली गेलेली नाहीत.
पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याच्या कुरवंडे नावाच्या उंच डोंगरावर असलेल्या नागफणी कठड्याजवळ इंद्रायणी नदीचा उगम होतो. त्यात पुढे टाटा धरण असल्याने इंद्रायणी नदी लुप्त पावते. त्यामुळे या नदीचा प्रवाह लोणावळा, कामशेत, कान्हे फाटा, वडगाव मावळ, तळेगाव आणि पुढे तीर्थक्षेत्र देहू, निघोजे, तळवडे, टाळगाव चिखली, मोई, मोशी, चिंबळी, श्री क्षेत्र आळंदी असा वाहतो आणि पुढे भीमा नदीला जाऊन मिळतो.
राज्याच्या कानकोपर्यातून लाखोच्या संख्येने भाविक देहू आणि आळंदित वारीसाठी येतात. या ठिकाणी मुकामी येताना जेवण इंद्रायणीत आंघोळ केल्यावर आपल्याला पुण्य मिळेल अशी सर्वसाधरण भावना वारकऱ्यांची असते. पण इंद्रायणीची ही अवस्था पाहून स्नान करन्याची इच्छा देखील होत नसल्याचे वारकर्यंकडून सांगण्यात येते. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. जर पालखी सोहळ्याच्या आधीच या प्रदूषित नदीची स्थिती सुधारले नाही तर वारकऱ्यांच्या आरोग्य प्रश्न निर्माण झाल्यास त्याला कारणीभूत असलेल्या कारखान्यांवरती सरकार काय कारवाई करणार हे पाहणं देखील महत्त्वाचा असणार आहे.
शहर
- नागपूर: 'स्वयम्' योजनेचा मोठा दिलासा! आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट २०० कोटी; शिक्षणाला मिळाले नवे बळ
- अमरावती: उत्पन्न दाखल्यांसाठी नागरिकांची दमछाक; सेतू केंद्रांचा सर्व्हर डाऊन आणि तलाठ्यांच्या अनुपस्थितीमुळे कामांचा खोळंबा
- हिंगोली: जनावरे घरी परतली, पण दोन जिवलग मित्र कायमचे हरवले, कायाधू नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू
- सातारा: आदरकी फाटा येथील 'वैद्यनाथ ऑईल स्टोअर'मध्ये १२.७४ लाखांची अफरातफर; बहीण-भावावर गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- नागपूर: 'स्वयम्' योजनेचा मोठा दिलासा! आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट २०० कोटी; शिक्षणाला मिळाले नवे बळ
- अमरावती: उत्पन्न दाखल्यांसाठी नागरिकांची दमछाक; सेतू केंद्रांचा सर्व्हर डाऊन आणि तलाठ्यांच्या अनुपस्थितीमुळे कामांचा खोळंबा
- हिंगोली: जनावरे घरी परतली, पण दोन जिवलग मित्र कायमचे हरवले, कायाधू नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू
- सातारा: आदरकी फाटा येथील 'वैद्यनाथ ऑईल स्टोअर'मध्ये १२.७४ लाखांची अफरातफर; बहीण-भावावर गुन्हा दाखल
गुन्हा
- महाराष्ट्र: 'कलम १५५'चा गैरवापर केल्याप्रकरणी १५ अधिकारी निलंबित; जमीन घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई.
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ई-२० (E20) पेट्रोलबाबत केंद्र सरकारची झोप उडवणारा सर्व्हे; मायलेजमधील घट आणि इंजिन खराब होण्याच्या भीतीने जनता चिंतेत, एनडीए समर्थकही विरोधात
- हरमुझ सामुद्रधुनीत इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; भारतीय नाविक ठार, भारताने इराणच्या राजदूताला बजावले समन्स
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल! आसाममधील २७ जणांना 'परदेशी' ठरवणारे उच्च न्यायालयाचे निर्णय रद्द; नागरिकत्वाचा निर्णय निष्पक्ष प्रक्रियेने घेण्याचे आदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू


























Subscribe to my channel




