
Ahmednagar News : एकीकडे राज्यातील महत्वाच्या शहरात प्रदूषणाचा विळखा वाढत असताना अनेक शहरातील कचाट्यात सापडल्याचे चित्र आहे. अहमदनगरच्या सीना नदीची देखील अशीच अवस्था झाली असून नदी पात्रात केमिकलयुक्त पाणी सोडल्याने पेट्रोल आणि गॅस सारखा उग्रवास सुटला आहे. या पार्श्वभूमीवर आजुबाजुंच्या नागरिकांनी रस्त्यावर उतरत प्रशासनाला धारेवर धरले आहे.
शहरातून वाहणारी सीना नदी शहराची ओळख आहे. मात्र गेल्या काही वर्षात या नदीला बकाल स्वरूप आले असून, आजूबाजूला असलेल्या कंपनीचे केमिकल पाणी थेट नदीत सोडण्यात येत आहे. यामुळे मागील वर्षी अनेक मृत माशांचा खच नदीच्या काठावर आढळून आला होता. आता याच नदीत केमिकलयुक्त पाणी, मेडिकल वेस्ट, कचरा आदी टाकण्यात येत असल्याने नदीच्या पाण्याला उग्र वास येऊ लागला आहे. यामुळे, आजुबाजुंच्या नागरिकांना त्रास होऊ लागल्याने मध्यरात्री शेकडो नागरिक रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले.
|
Tirumala Suresh Kute : आयकर छापेमारी, कुटेंचा भाजप प्रवेश; बावनकुळे म्हणतात आमचा पक्ष 'ओपन' |
अहमदनगर शहरातून वाहणाऱ्या सीना नदी पात्रात अज्ञातांने कसले तरी केमिकल सोडले. त्यामुळे धर्माधिकारी मळा परीसरात दुर्गंधी सुटून नागरिकांच्या डोळ्याला जळजळ होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे नागरिक रस्त्यावर उतरले. त्यावेळी नदीपात्रातील पाण्यावर तेलकट थर नागरिकांच्या नजरेस पडला. नागरिकांनी तात्काळ आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधला. महापालिकेची अग्निशमन विभागाची गाडी घटनास्थळी दाखल झाली, तर नायब तहसीलदार तसेच स्थानिक नगरसेवक देखील घटनास्थळी आले. नगर एमआयडीसी परिसरातील एखाद्या कंपनीने नदीपात्रात नदी पात्रात सोडले असावे असा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला आहे.
पाण्याचे नमुने घेणं अपेक्षित मात्र....
दरम्यान, महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सकाळी पुन्हा नदीपात्राच्या परिसरात पाहणी केली. नदीपात्रात नेमकं कुणी काय आणून टाकले? याबाबत चौकशी सुरू असल्याचे महसूल कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. या घटनेबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सक्षम अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी करून पाण्याचे नमुने घेणं अपेक्षित असताना तशी कोणतेही करावाई झालेली नाही. याबाबत कागदोपत्री कोणतेही करावाई होत नसून केवळ तोंडी सूचना दिल्या जात आहेत. त्यातच केवळ महसूल विभागाचे कर्मचारी, महापालिकेचे कर्मचारी आणि पोलीस विभाग यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यामुळे मुख्य प्रश्न मार्गी लागणार का? हा देखील प्रश्नचं आहे. संबंधित प्रशासनाने त्वरित या घटनेबाबत चौकशी करून दोषींवर कारवाईची करण्याची मागणी धर्माधिकारी मळ्यातील नागरिकांनी केली आहे. तसेच भविष्यात पुन्हा अशा घटना होणार नाही, याची काळजी घेणं गरजेचं असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
शहर
- मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! मतदार यादीतून तब्बल २ कोटी नावे वगळल्याचा रोहित पवार यांचा गंभीर दावा, निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर खळबळ
- मुंबई: महायुतीमधील पालकमंत्री पदाचा तिढा सुटला! रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले तर नाशिकची धुरा गिरीश महाजन यांच्याकडे
- मुंबई: मिरा रोडमध्ये धावत्या स्कूल बसजवळ कोसळला मेट्रोचा स्लॅब, शाळकरी मुलं थोडक्यात बचावली
- पुणे: वाकड बनले कचऱ्याचे हब; चौधरी पार्क आणि यमुनानगर रोड परिसरातील नागरिक अस्वच्छतेमुळे त्रस्त
महाराष्ट्र
- गोवा: ‘लगे रहो मुन्नाभाई’ फेम अभिनेता अश्विन मुशरनच्या कारने बाप-लेकाला उडवले; गोव्यातील अपघातानंतर मदतीऐवजी स्थानिकांसोबत घातला वाद
- मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ! मतदार यादीतून तब्बल २ कोटी नावे वगळल्याचा रोहित पवार यांचा गंभीर दावा, निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर खळबळ
- मुंबई: महायुतीमधील पालकमंत्री पदाचा तिढा सुटला! रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले तर नाशिकची धुरा गिरीश महाजन यांच्याकडे
- बीड: पहिल्या श्रावण सोमवारी व नागपंचमीच्या दुर्मिळ योगावर परळीच्या वैद्यनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; ३ हजार किलो फुलांची सजावट
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोंदिया: स्वातंत्र्यदिनी काळाचा घाला! अंघोळीची हौस बेतली जिवावर, गोंदियातील ढासगड येथे दोन तरुण वाहून गेले
- लखनऊ: शिक्षणाचा खेळ; जेन-झीनंतर आता जेन-अल्फा आक्रमक; लखनऊमध्ये विद्यार्थ्यांचे रस्त्यावर उतरून आंदोलन
- नवी दिल्ली: नितीन नबीन यांच्या टीममध्ये 'जेन झी'ची एन्ट्री; भाजपात मोठे बदल, महाराष्ट्रातून कुणाला संधी?
- अरुणाचल प्रदेश: मुसळधार पावसामुळे निसर्गाचा कोप; अचानक आलेल्या पुरात लष्कराचे ५ जवान बेपत्ता, तर भूस्खलनात ४ मजुरांचा मृत्यू




























Subscribe to my channel




