
Political News : माजी खासदार तथा ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या संभाजीनगर लोकसभा उमेदवारीवरून झालेल्या 'तू तू मैं मैं' नंतर छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर आढावा घेतला आहे. या आढावा बैठकीत संभाजीनगरमधील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली. विशेष म्हणजे अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांना न बोलवता उद्धव ठाकरे यांनी ही बैठक घेतली आहे. तर, लोकसभा उमेदवारीवरून दानवे आणि खैरे यांच्यात सुरु असलेल्या 'तू तू मैं मैं' ची बातमी सर्वात आधी 'एबीपी माझा'ने दाखवली होती.
अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे दोघेही आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. यावरूनच दोन्ही नेत्यांकडून एकमेकांना चिमटे काढण्यात आल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान, या दोन्ही नेत्यांमधील 'तू तू मैं मैं' ची दखल घेत उद्धव ठाकरे यांनी तात्काळ मंगळवारी मातोश्रीवर छत्रपती संभाजीनगरमधील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. बैठकीत आलेल्या पदाधिकाऱ्यांना लोकसभेचा उमेदवार कोण हवा? खैरे की दानवे? यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी वैयक्तिक विचारणा केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात उमेदवार म्हणून बहुतांश पदाधिकाऱ्यांचा कल चंद्रकांत खैरे यांच्या नावावर असल्याची सूत्रांची माहितीआहे.
|
|
अशीही चर्चा झाली?
दरम्यान, याच बैठकीत मागील लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची कारणे, संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील जातीय समीकरण आणि उमेदवार निवडी संदर्भात संभाजीनगरमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांशी उद्धव ठाकरेंनी चर्चा केली आहे. त्यामुळे खैरे आणि दानवेंच्या लोकसभा उमेदवारीच्या दाव्यानंतर उद्धव ठाकरे नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
कोण काय म्हणाले होते?
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बोलतांना अंबादास दानवे म्हणाले होते की, "मी शिवसैनिक आहे. पक्षप्रमुख जिथे सांगतील तिथे लढण्याची माझी तयारी आहे. कुठेही लढायला सांगितलं तरी, केवळ निवडणूक नाही, इतर कोणतीही लढाई लढायला सांगितली तरी ती लढाई लढण्याची माझी 100 टक्के तयारी आहे. तसेच, मी मागच्या 10 वर्षांपासून निवडणूक लढण्यास इच्छुक आहे." असे अंबादास दानवे म्हणाले आहे.
खैरेंची दानवेंवर टीका...
"अंबादास दानवेंना निवडणूक लढवण्याची इच्छा होती. त्यामुळे गेल्या निवडणुकीत माझा पराभव झाला आहे.छत्रपती संभाजीनगर ची निवडणूक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सांगतील ते लढवणार. होईन ना चांगलं. कशाला काळजी करायची. जनतेची जी इच्छा आहे, ती उद्धव ठाकरे मान्य करतील." असे खैरे म्हणाले.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



