अलिबागमध्ये विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मालमत्ता मोजणीवरून वाद झाल्याचा आरोप होत आहे. रमेश पाटील यांच्या जागेत प्रवेश केल्यानं वाद झाला असा देखील आरोप होत आहे. याच वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एक व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला होता, या व्हिडीओसोबत ‘विधानसभा अध्यक्षांसोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला आहे! तुम्ही सांगताय की मी सांगू?’ असा सवाल करत त्यांनी नार्वेकर यांना डिवचलं होतं, दरम्यान त्यानंतर आता संजय राऊत यांच्या या व्हिडीओवर राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, त्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले राहुल नार्वेकर?
संजय राऊत यांच्या आरोपावर यापूर्वी पण बोललो नाही, आणि बोलणार पण नाही. मी एवढेच सांगू इच्छितो हे त्यांच्या सर्व मनातल्या कल्पना आहेत. हे त्यांचे जुने दुखणे आहे, ते आता उफाळून आले आहे. म्हणून संजय राऊत का बोलतात कशाला बोलतात हे सर्वांना माहीत आहे. त्यांनी जे आरोप केले आहे ते बिनबुडाचे आहेत. अलिबागला मी वारंवार जात असतो. माझ गाव आहे, तिथे माझी शेती आहे. तीथे मी माझी शेती बघायला गेलो होतो. दोन लोकांमध्ये वाद होताना दिसला त्यावेळेला तिकडे मारामारी होत होती. म्हणून मी तिकडे सांगितलं की तुम्ही मारामारी करू नका आणि शांतपणे बसून वाद मिटवा, त्या जागेशी माझं काही देणं घेण नाही, असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, त्यामुळे अशाप्रकारे बिनबुडाचे आरोप करून केवळ राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न करण्याची संजय राऊत यांची जुनीच सवय आहे. त्यांच्याकडे जे व्हिडिओ असतील ते समोर आणू द्या, त्यांना चोख उत्तर दिलं जाईल. संजय राऊत यांना कदाचित कल्पना आहे की माहीत नाही, पण दिडशे वर्षांपासून आमचं अलिबागमध्ये वास्तव्य आहे, आमची तिथे जमीन आहे , त्यांना खोट्या अफवा पसरवायला आवडतात, त्यांना लखलाभ, असं नार्वेकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान संजय राऊत स्वतः जमीन घोटाळ्यात जेलमध्ये राहून आलेले आहेत, ते लोकांना काय शिकवण देणार? संजय राऊत जेलची हवा विसरलेले आहेत, आसा टोलाही यावेळी राहुल नार्वेकर यांनी लगावला आहे.
शहर
- पुणे: मेसमधील निकृष्ट जेवण अन् पंतप्रधान मोदींच्या फोटोवरून पुण्याचे शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज आले चर्चेत
- मुंबई: राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! नवरात्रीपूर्वी उद्धव ठाकरेंचे १४ आमदार शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता, राजकीय सूत्रांची माहिती
- मुंबई: एसटीचा मोठा निर्णय! महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून NCMC कार्ड अनिवार्य
- नाशिक: महागाईचं विघ्न! आंतरराष्ट्रीय युद्ध अन् एफडीएच्या कारवाईमुळे गणेशमूर्तींच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ
महाराष्ट्र
- सांगली: चालकाला अचानक चक्कर आल्याने एसटी बस थेट चहाच्या टपरीवर धडकली; टळला मोठा अनर्थ, सर्व प्रवासी सुखरूप
- जालना: उपोषणाचा चौथा दिवस! मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, मळमळ अन् उलट्यांचा त्रास; वैद्यकीय तपासणीस स्पष्ट नकार
- पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाइन फ्लूचा विळखा! एका महिन्यात २३ रुग्ण पॉझिटिव्ह; आरोग्य विभागाकडून तातडीने वैद्यकीय तपासणी करण्याचे आवाहन
- पुणे: मेसमधील निकृष्ट जेवण अन् पंतप्रधान मोदींच्या फोटोवरून पुण्याचे शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज आले चर्चेत
गुन्हा
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: जग चौफेर संकटात, पण भारताची वेगाने प्रगती पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला 'झूठ की गुंज' म्हणत टोला
- उत्तर प्रदेश: कौशांबीत पटाखा कारखान्यात भीषण स्फोट; महिला व बालकांसह ७ ते ८ जणांचा मृत्यू, परिसर हादरला
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- चेन्नई: २०२९ला राहुल गांधीच पंतप्रधान, विजय यांनी समर्थन न दिल्यास मंत्रिपदाचे राजीनामे देऊ ;काँग्रेसचा तामिळनाडू सरकारला थेट इशारा




























Subscribe to my channel



