सृष्टीने, निसर्गाने किंवा ईश्वराने म्हणा जगात अस्तित्वात असलेले कोणतेही दोन जीव दोन प्राणी एक सारखे बनवले नाहीत. दिसण्यामध्ये कोणतेही दोन प्राणी हुबेहूब सारखे नसतात किंवा त्यांच्या प्रवृत्ती, सवयी, स्वभाव गुण देखील सारखे नसतात. या प्रकारच्या विषमता निसर्गकृत आहेत. आत्म्याच्या किंवा जीवाच्या चैतन्याच्या स्तरावर एकत्व म्हणजे सर्व जीव त्या स्तरावर समान आहेत, सर्वांचा आत्मा एकाच गुणवत्तेचा आहे असं वाचलं, ऐकलं, म्हटलं जातं आणि त्यावर श्रद्धा आहे. मात्र विषमता इतर बाबतीत संभवते. व्यावहारिक, भौतिक जगामध्ये आणि मनोवैज्ञानिक दृष्टीने, तसेच उत्क्रांतीच्या सिद्धांताने मनुष्य हा दैनंदिन प्रगतीपथावर जाण्यासाठी प्रयत्न करत असतो. मागचं वर्ष,मागचा महिना,कालचा दिवस गेला तसा आजचा जाऊ नये. त्यामध्ये आज काहीतरी बदल व्हावा आणि कुठेतरी जिथे अडले होते तो अडथळा दूर व्हावा यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत म्हणून मनुष्य एक शोध करत असतो. माणसाच्या आयुष्यातील सारी धडपड ही सुखाच्या प्राप्तीसाठी, दुःखातून मुक्तीसाठी आणि सर्वार्थाने प्रगतीसाठी असते असे मला वाटते. परंतु असे करत असताना काही मानसिक स्वभाव असतात, काही विकार असतात, काही प्रवृत्ती असतात यांच्या प्रभावाने मनुष्य कुठेतरी दुसऱ्याची बरोबरी करायला पाहतो. आपण आपला स्वतःचा उद्देश न ठेवता दुसऱ्याचे अनुकरण करायला पाहतो दुसऱ्याच्या मागे जायला पाहतो. दुसऱ्यासारखे होणं, तसा प्रयत्न करणं म्हणजेच आपलेपणा, आपला वेगळेपणा आणि आपले स्वत्व हरवणे असाच अर्थ आहे. जसे संविधानाने आपणास आचार, विचार आणि उच्चार स्वातंत्र्य बहाल केले आहे, तसेच निसर्गाने आपल्याला आपल्या मनाप्रमाणे, इतरांना त्रास न होईल असे पण स्वच्छंदी जीवन जगण्याचा अधिकार नक्कीच दिलेला आहे. ( याचा निरंकूशता असा कोणीही वेगळा अर्थ घेऊ नये). म्हणून कमीत कमी आपण आपले स्वतःचे छंद, आवडीनिवडी आपल्या पातळीवर तरी जोपासले पाहिजेत ज्याने स्वतःला आनंद होईल. आपल्याकडे दिवस रात्रीचे मिळून चोवीस तास असतात. त्यामध्ये झोप वगळता उरलेले तास आपण कशासाठी खर्च केले आणि त्यामध्ये निव्वळ स्वतःसाठी आपल्या आवडीसाठी, आपल्या आवडीने आपल्या आवडीचे जीवन क्षण जगण्यासाठी किती वेळ खर्च केला, मी स्वतःला किती वेळ दिला हे मात्र तपासले पाहिजे. आपण आपल्या सारखं, आपल्या मनासारखं जगलं पाहिजे याची दुसरी बाजू अशी स्पष्ट होते की आपण दुसऱ्या सारखं जगलं नाही पाहिजे. मी जर इतर कोणा सारखं जगत असेल तर याचा अर्थ मी स्वतःला त्याच्या सारखं बनवू इच्छितो आणि दुसऱ्याला श्रेष्ठ मानून जगत आहे. त्यावेळी मी स्वतःला, आपल्या व्यक्तिमत्त्वाला,आपल्या अस्तित्वाला उच्च श्रेष्ठ असल्यापासून नाकारत असतो. म्हणून अनुकरण नको हेच सांगणं आहे. जे दुसऱ्याचं अनुकरण करतात, दुसऱ्याच्या मागे चालतात, दुसऱ्यासारखं व्हायला पाहतात ते कधीच सर्वात पुढे नसतात कारण ते पुढे जाणाऱ्याला पाहत असतात. समोरचा कुठे चालला आहे, काय करतो आहे कसे करतो आहे हे पाहण्यातच अनुकरण करणाऱ्याचा भरपूर वेळ निघून जातो. त्यामुळे स्वतः काही होण्याचा,काही बनण्याचा काही होऊन दाखवण्याचा बराचसा वेळ तर आपण गमावलेला असतो आणि उरलेल्या वेळात मग त्याच्यासारखं होता येत नाही. लोकं करत आहेत तेच तुम्ही करत असाल तर लोका सारखेच व्हाल. पूर्ण पण नाही, अर्धवटच. तुम्ही स्वतंत्र विचार करा. आपला उद्देश आपण निश्चित करा. गर्दीच्या मागे जाण्यात अर्थ नसतो कारण गर्दी महान असत नाही. स्वतः स्वतंत्र विचार करुन धैर्य पूर्वक चालणारा माणूसच महान बनतो. अनुकरण करु नका. स्वतः जळणाराच दीपक बनतो व स्वयं प्रकाशमान होतो. गर्दीतून चालत असताना सुद्धा आपण वेगळं असलं पाहिजे, आपण आपला विचार घेऊन चाललं पाहिजे. सर्वात आधी आपण स्वतः आपल्यावर, आपली बुद्धी आणि विचार, क्षमता यावर दृढ विश्वास ठेवला पाहिजे. सतत असे चिंतन केले पाहिजे की जे कोणी ज्या कोणत्या क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ट बनले आहेत ते एक निश्चित उद्देश घेऊन प्रामाणिकपणे कष्ट करून ध्येय प्राप्तीला पोहोचले आहेत. आपणही आपल्या जीवनाचा उद्देश निश्चितच केला आणि स्व कष्टाने त्या ध्येयाकडे या प्रकारे वाटचाल केली तर आपणही निश्चितच सर्वोत्कृष्ट होणारच. उच्च व्यक्तिमत्त्वाचा आदर्श असावा, सन्मान करावा पण आपण मात्र आपल्या जीवनाचा उद्देश निश्चित करून त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करावा. बाजारामध्ये एका वस्तूचे अनेक उत्पादन असतात, परंतु ब्रँड म्हणावली जाणारी अशी एकच वस्तू असते एखाद्या कंपनीची. गळ्यात हार असतो परंतु लक्ष हारातल्या मुख्यपदक किंवा त्यात जडलेल्या माणिक, मोती,हिऱ्याकडे असते. हेच असते विशेषत्व. असेच चिंतन-मनन करत ध्येय प्राप्तीकडे स्वतःला मूल्यांकन करत जात राहिल्याने एक दिवस नक्कीच आपणही सर्वोत्कृष्ट असू याबाबत शंका नसावी. बलराज संघई, लेखक कवी गितकार 9420015108 वाळूज औद्योगिक परिसर छत्रपती संभाजीनगर
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

म्हाडाच्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये २९५ सदनिका (FCFS) तत्त्वावर विक्रीसाठी उपलब्ध
मुंबईच्या वरळी परिसरातील भाजप रॅलीदरम्यान झालेल्या प्रचंड ट्रॅफिक जॅममुळे नागरिकांचा संताप उफाळला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सोशल मीडियावरून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




