सृष्टीने, निसर्गाने किंवा ईश्वराने म्हणा जगात अस्तित्वात असलेले कोणतेही दोन जीव दोन प्राणी एक सारखे बनवले नाहीत. दिसण्यामध्ये कोणतेही दोन प्राणी हुबेहूब सारखे नसतात किंवा त्यांच्या प्रवृत्ती, सवयी, स्वभाव गुण देखील सारखे नसतात. या प्रकारच्या विषमता निसर्गकृत आहेत. आत्म्याच्या किंवा जीवाच्या चैतन्याच्या स्तरावर एकत्व म्हणजे सर्व जीव त्या स्तरावर समान आहेत, सर्वांचा आत्मा एकाच गुणवत्तेचा आहे असं वाचलं, ऐकलं, म्हटलं जातं आणि त्यावर श्रद्धा आहे. मात्र विषमता इतर बाबतीत संभवते. व्यावहारिक, भौतिक जगामध्ये आणि मनोवैज्ञानिक दृष्टीने, तसेच उत्क्रांतीच्या सिद्धांताने मनुष्य हा दैनंदिन प्रगतीपथावर जाण्यासाठी प्रयत्न करत असतो. मागचं वर्ष,मागचा महिना,कालचा दिवस गेला तसा आजचा जाऊ नये. त्यामध्ये आज काहीतरी बदल व्हावा आणि कुठेतरी जिथे अडले होते तो अडथळा दूर व्हावा यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत म्हणून मनुष्य एक शोध करत असतो. माणसाच्या आयुष्यातील सारी धडपड ही सुखाच्या प्राप्तीसाठी, दुःखातून मुक्तीसाठी आणि सर्वार्थाने प्रगतीसाठी असते असे मला वाटते. परंतु असे करत असताना काही मानसिक स्वभाव असतात, काही विकार असतात, काही प्रवृत्ती असतात यांच्या प्रभावाने मनुष्य कुठेतरी दुसऱ्याची बरोबरी करायला पाहतो. आपण आपला स्वतःचा उद्देश न ठेवता दुसऱ्याचे अनुकरण करायला पाहतो दुसऱ्याच्या मागे जायला पाहतो. दुसऱ्यासारखे होणं, तसा प्रयत्न करणं म्हणजेच आपलेपणा, आपला वेगळेपणा आणि आपले स्वत्व हरवणे असाच अर्थ आहे. जसे संविधानाने आपणास आचार, विचार आणि उच्चार स्वातंत्र्य बहाल केले आहे, तसेच निसर्गाने आपल्याला आपल्या मनाप्रमाणे, इतरांना त्रास न होईल असे पण स्वच्छंदी जीवन जगण्याचा अधिकार नक्कीच दिलेला आहे. ( याचा निरंकूशता असा कोणीही वेगळा अर्थ घेऊ नये). म्हणून कमीत कमी आपण आपले स्वतःचे छंद, आवडीनिवडी आपल्या पातळीवर तरी जोपासले पाहिजेत ज्याने स्वतःला आनंद होईल. आपल्याकडे दिवस रात्रीचे मिळून चोवीस तास असतात. त्यामध्ये झोप वगळता उरलेले तास आपण कशासाठी खर्च केले आणि त्यामध्ये निव्वळ स्वतःसाठी आपल्या आवडीसाठी, आपल्या आवडीने आपल्या आवडीचे जीवन क्षण जगण्यासाठी किती वेळ खर्च केला, मी स्वतःला किती वेळ दिला हे मात्र तपासले पाहिजे. आपण आपल्या सारखं, आपल्या मनासारखं जगलं पाहिजे याची दुसरी बाजू अशी स्पष्ट होते की आपण दुसऱ्या सारखं जगलं नाही पाहिजे. मी जर इतर कोणा सारखं जगत असेल तर याचा अर्थ मी स्वतःला त्याच्या सारखं बनवू इच्छितो आणि दुसऱ्याला श्रेष्ठ मानून जगत आहे. त्यावेळी मी स्वतःला, आपल्या व्यक्तिमत्त्वाला,आपल्या अस्तित्वाला उच्च श्रेष्ठ असल्यापासून नाकारत असतो. म्हणून अनुकरण नको हेच सांगणं आहे. जे दुसऱ्याचं अनुकरण करतात, दुसऱ्याच्या मागे चालतात, दुसऱ्यासारखं व्हायला पाहतात ते कधीच सर्वात पुढे नसतात कारण ते पुढे जाणाऱ्याला पाहत असतात. समोरचा कुठे चालला आहे, काय करतो आहे कसे करतो आहे हे पाहण्यातच अनुकरण करणाऱ्याचा भरपूर वेळ निघून जातो. त्यामुळे स्वतः काही होण्याचा,काही बनण्याचा काही होऊन दाखवण्याचा बराचसा वेळ तर आपण गमावलेला असतो आणि उरलेल्या वेळात मग त्याच्यासारखं होता येत नाही. लोकं करत आहेत तेच तुम्ही करत असाल तर लोका सारखेच व्हाल. पूर्ण पण नाही, अर्धवटच. तुम्ही स्वतंत्र विचार करा. आपला उद्देश आपण निश्चित करा. गर्दीच्या मागे जाण्यात अर्थ नसतो कारण गर्दी महान असत नाही. स्वतः स्वतंत्र विचार करुन धैर्य पूर्वक चालणारा माणूसच महान बनतो. अनुकरण करु नका. स्वतः जळणाराच दीपक बनतो व स्वयं प्रकाशमान होतो. गर्दीतून चालत असताना सुद्धा आपण वेगळं असलं पाहिजे, आपण आपला विचार घेऊन चाललं पाहिजे. सर्वात आधी आपण स्वतः आपल्यावर, आपली बुद्धी आणि विचार, क्षमता यावर दृढ विश्वास ठेवला पाहिजे. सतत असे चिंतन केले पाहिजे की जे कोणी ज्या कोणत्या क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ट बनले आहेत ते एक निश्चित उद्देश घेऊन प्रामाणिकपणे कष्ट करून ध्येय प्राप्तीला पोहोचले आहेत. आपणही आपल्या जीवनाचा उद्देश निश्चितच केला आणि स्व कष्टाने त्या ध्येयाकडे या प्रकारे वाटचाल केली तर आपणही निश्चितच सर्वोत्कृष्ट होणारच. उच्च व्यक्तिमत्त्वाचा आदर्श असावा, सन्मान करावा पण आपण मात्र आपल्या जीवनाचा उद्देश निश्चित करून त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करावा. बाजारामध्ये एका वस्तूचे अनेक उत्पादन असतात, परंतु ब्रँड म्हणावली जाणारी अशी एकच वस्तू असते एखाद्या कंपनीची. गळ्यात हार असतो परंतु लक्ष हारातल्या मुख्यपदक किंवा त्यात जडलेल्या माणिक, मोती,हिऱ्याकडे असते. हेच असते विशेषत्व. असेच चिंतन-मनन करत ध्येय प्राप्तीकडे स्वतःला मूल्यांकन करत जात राहिल्याने एक दिवस नक्कीच आपणही सर्वोत्कृष्ट असू याबाबत शंका नसावी. बलराज संघई, लेखक कवी गितकार 9420015108 वाळूज औद्योगिक परिसर छत्रपती संभाजीनगर
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: बीड बायपासवरील जाबिंदा ग्राउंडजवळ तरुणाला चाकूचा धाक दाखवून सोन्याची साखळी लूटली
- रायगड: रामधरणेश्वर येथील तलावात बुडून २६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू!
- 'क्राईम पेट्रोल' फेम अभिनेता सतीश नायकोडी यांची फसवणूक; एसआरए इमारतीत स्वस्त फ्लॅट मिळवून देण्याच्या नावाखाली लाखांची लुबाडणूक
- छत्रपती संभाजीनगर हादरलं! सामान पॅक करण्याच्या बहाण्याने बोलावून ३१ वर्षीय पीएचडीच्या विद्यार्थिनीवर रात्री अत्याचार; डिलिव्हरी बॉयच्या कृत्याने खळबळ!
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: बीड बायपासवरील जाबिंदा ग्राउंडजवळ तरुणाला चाकूचा धाक दाखवून सोन्याची साखळी लूटली
- ईएमआय एक-दोन दिवस उशिरा भरल्यास सीबीआयएल स्कोअर खराब होतो का; जाणून घ्या नियम आणि परिणाम
- बीड: आष्टीत अमृता फडणवीस यांच्या हस्ते महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन; बीडमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयसाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन
- कोल्हापूर: जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील अपहार प्रकरणात मोठी घडामोड; १५ दिवसांपूर्वी जमा झाले आणखी २८ लाख
गुन्हा
- नागपुर: फ्रेंडशिप डे दिवशी थरार; लग्न आणि गिफ्टच्या वादातून तरुणीला नदीत ढकलून केली हत्या, खळबळजनक घटना उघड
- महाडमध्ये महिला डॉक्टरचा अमानुष छळ; १८ वर्षांत तब्बल १० वेळा सक्तीने गर्भपात केल्याप्रकरणी पतीवर गंभीर आरोप
- पुणे: ६ वर्षांनंतर अखेर न्याय मिळाला; पुण्याच्या बुधवार पेठेत २२ वर्षीय प्रेयसीच्या खून प्रकरणात नराधम प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा
- चंद्रपूर: प्रेमाच्या लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच संपला तरुणीचा संसार; चंद्रपूरमधील दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तर प्रदेश: 'बायकोने मृतदेहाला स्पर्शही करायचा नाही, माझा आत्मा…', भाचीला सुसाइड नोट पाठवत जिम संचालक व कॉलेज लिपिकाने स्वतःला संपवले
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज




























Subscribe to my channel




