सृष्टीने, निसर्गाने किंवा ईश्वराने म्हणा जगात अस्तित्वात असलेले कोणतेही दोन जीव दोन प्राणी एक सारखे बनवले नाहीत. दिसण्यामध्ये कोणतेही दोन प्राणी हुबेहूब सारखे नसतात किंवा त्यांच्या प्रवृत्ती, सवयी, स्वभाव गुण देखील सारखे नसतात. या प्रकारच्या विषमता निसर्गकृत आहेत. आत्म्याच्या किंवा जीवाच्या चैतन्याच्या स्तरावर एकत्व म्हणजे सर्व जीव त्या स्तरावर समान आहेत, सर्वांचा आत्मा एकाच गुणवत्तेचा आहे असं वाचलं, ऐकलं, म्हटलं जातं आणि त्यावर श्रद्धा आहे. मात्र विषमता इतर बाबतीत संभवते. व्यावहारिक, भौतिक जगामध्ये आणि मनोवैज्ञानिक दृष्टीने, तसेच उत्क्रांतीच्या सिद्धांताने मनुष्य हा दैनंदिन प्रगतीपथावर जाण्यासाठी प्रयत्न करत असतो. मागचं वर्ष,मागचा महिना,कालचा दिवस गेला तसा आजचा जाऊ नये. त्यामध्ये आज काहीतरी बदल व्हावा आणि कुठेतरी जिथे अडले होते तो अडथळा दूर व्हावा यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत म्हणून मनुष्य एक शोध करत असतो. माणसाच्या आयुष्यातील सारी धडपड ही सुखाच्या प्राप्तीसाठी, दुःखातून मुक्तीसाठी आणि सर्वार्थाने प्रगतीसाठी असते असे मला वाटते. परंतु असे करत असताना काही मानसिक स्वभाव असतात, काही विकार असतात, काही प्रवृत्ती असतात यांच्या प्रभावाने मनुष्य कुठेतरी दुसऱ्याची बरोबरी करायला पाहतो. आपण आपला स्वतःचा उद्देश न ठेवता दुसऱ्याचे अनुकरण करायला पाहतो दुसऱ्याच्या मागे जायला पाहतो. दुसऱ्यासारखे होणं, तसा प्रयत्न करणं म्हणजेच आपलेपणा, आपला वेगळेपणा आणि आपले स्वत्व हरवणे असाच अर्थ आहे. जसे संविधानाने आपणास आचार, विचार आणि उच्चार स्वातंत्र्य बहाल केले आहे, तसेच निसर्गाने आपल्याला आपल्या मनाप्रमाणे, इतरांना त्रास न होईल असे पण स्वच्छंदी जीवन जगण्याचा अधिकार नक्कीच दिलेला आहे. ( याचा निरंकूशता असा कोणीही वेगळा अर्थ घेऊ नये). म्हणून कमीत कमी आपण आपले स्वतःचे छंद, आवडीनिवडी आपल्या पातळीवर तरी जोपासले पाहिजेत ज्याने स्वतःला आनंद होईल. आपल्याकडे दिवस रात्रीचे मिळून चोवीस तास असतात. त्यामध्ये झोप वगळता उरलेले तास आपण कशासाठी खर्च केले आणि त्यामध्ये निव्वळ स्वतःसाठी आपल्या आवडीसाठी, आपल्या आवडीने आपल्या आवडीचे जीवन क्षण जगण्यासाठी किती वेळ खर्च केला, मी स्वतःला किती वेळ दिला हे मात्र तपासले पाहिजे. आपण आपल्या सारखं, आपल्या मनासारखं जगलं पाहिजे याची दुसरी बाजू अशी स्पष्ट होते की आपण दुसऱ्या सारखं जगलं नाही पाहिजे. मी जर इतर कोणा सारखं जगत असेल तर याचा अर्थ मी स्वतःला त्याच्या सारखं बनवू इच्छितो आणि दुसऱ्याला श्रेष्ठ मानून जगत आहे. त्यावेळी मी स्वतःला, आपल्या व्यक्तिमत्त्वाला,आपल्या अस्तित्वाला उच्च श्रेष्ठ असल्यापासून नाकारत असतो. म्हणून अनुकरण नको हेच सांगणं आहे. जे दुसऱ्याचं अनुकरण करतात, दुसऱ्याच्या मागे चालतात, दुसऱ्यासारखं व्हायला पाहतात ते कधीच सर्वात पुढे नसतात कारण ते पुढे जाणाऱ्याला पाहत असतात. समोरचा कुठे चालला आहे, काय करतो आहे कसे करतो आहे हे पाहण्यातच अनुकरण करणाऱ्याचा भरपूर वेळ निघून जातो. त्यामुळे स्वतः काही होण्याचा,काही बनण्याचा काही होऊन दाखवण्याचा बराचसा वेळ तर आपण गमावलेला असतो आणि उरलेल्या वेळात मग त्याच्यासारखं होता येत नाही. लोकं करत आहेत तेच तुम्ही करत असाल तर लोका सारखेच व्हाल. पूर्ण पण नाही, अर्धवटच. तुम्ही स्वतंत्र विचार करा. आपला उद्देश आपण निश्चित करा. गर्दीच्या मागे जाण्यात अर्थ नसतो कारण गर्दी महान असत नाही. स्वतः स्वतंत्र विचार करुन धैर्य पूर्वक चालणारा माणूसच महान बनतो. अनुकरण करु नका. स्वतः जळणाराच दीपक बनतो व स्वयं प्रकाशमान होतो. गर्दीतून चालत असताना सुद्धा आपण वेगळं असलं पाहिजे, आपण आपला विचार घेऊन चाललं पाहिजे. सर्वात आधी आपण स्वतः आपल्यावर, आपली बुद्धी आणि विचार, क्षमता यावर दृढ विश्वास ठेवला पाहिजे. सतत असे चिंतन केले पाहिजे की जे कोणी ज्या कोणत्या क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ट बनले आहेत ते एक निश्चित उद्देश घेऊन प्रामाणिकपणे कष्ट करून ध्येय प्राप्तीला पोहोचले आहेत. आपणही आपल्या जीवनाचा उद्देश निश्चितच केला आणि स्व कष्टाने त्या ध्येयाकडे या प्रकारे वाटचाल केली तर आपणही निश्चितच सर्वोत्कृष्ट होणारच. उच्च व्यक्तिमत्त्वाचा आदर्श असावा, सन्मान करावा पण आपण मात्र आपल्या जीवनाचा उद्देश निश्चित करून त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करावा. बाजारामध्ये एका वस्तूचे अनेक उत्पादन असतात, परंतु ब्रँड म्हणावली जाणारी अशी एकच वस्तू असते एखाद्या कंपनीची. गळ्यात हार असतो परंतु लक्ष हारातल्या मुख्यपदक किंवा त्यात जडलेल्या माणिक, मोती,हिऱ्याकडे असते. हेच असते विशेषत्व. असेच चिंतन-मनन करत ध्येय प्राप्तीकडे स्वतःला मूल्यांकन करत जात राहिल्याने एक दिवस नक्कीच आपणही सर्वोत्कृष्ट असू याबाबत शंका नसावी. बलराज संघई, लेखक कवी गितकार 9420015108 वाळूज औद्योगिक परिसर छत्रपती संभाजीनगर
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
महाराष्ट्र
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! अघोरी पूजा आणि मृत्यूची भीती दाखवून 'भोंदू कमलेश'ने राज्यभरातील भाविकांना लुटले; पोलिसांची दोन पथके रवाना!
गुन्हा
- मलबार हिल पोलिसांत गुन्हा! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ लिपिकाकडून विवाहितेची १५ लाखांना फसवणूक!
- अमरावती: "तू आम्हाला दारू पाजतो का?"; नकार देताच वाद झाला अन् दगडाने ठेचून तरुणाचा खून;
- पुण्यात रक्तरंजित थरार! आयटीआयच्या विद्यार्थ्याची झोपेत असताना वर्गमित्राकडून निर्घृण हत्या
- रायगड: दागिन्यांच्या हव्यासापोटी वृद्धेचा जीव घेतला! अलिबागमध्ये ८५ वर्षीय महिलेची हत्या; मृतदेह आंबेनळी घाटात फेकला
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
इतर
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
- अन्न व औषध प्रशासनाचा बीडमध्ये धडाका: तुकाराम मुंढेंच्या आदेशानुसार भेसळयुक्त पदार्थ आणि गुटखा जप्त
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा

























Subscribe to my channel


