‘काजवा’ या आत्मकथनात मराठवाड्यातील आडबाजूच्या, कसल्या सोयीसुविधा नसणाऱ्या खेड्यातील उसतोड कामागारांचा मुलगा ते माध्यमिक व तांत्रिक शिक्षणाधिकारी असा लेखकाचा संघर्षमय प्रवास प्रवाहीपणे उलगडत जातो. त्यांचा हा प्रवास अर्थातच काटेरी मार्गावर चालत, अनंत अडचणींवर मात करून झाला आहे. या कथनाला कोठेही आत्मकेंद्री प्रौढीचा दर्प नाही, कसलेही कडवट मतप्रदर्शन नाही किंवा दु:खाचा बाजार मांडणे नाही. एकाच वेळी स्वीकारशील व संघर्षतत्पर आयुष्याचे हे बेमालूम मिश्रण आहे. जन्माचा दाखला नसल्याच्या कारणावरून ज्या शाळेने प्रवेश नाकारला, शिक्षणाधिकारी झाल्यावर त्याच शाळेच्या तपासणीचे काम लेखकाकडे येते व या प्रसंगातून आत्मकथनास सुरुवात होते. कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना शिक्षणाचे महत्त्व ओळखून आईवडील मुलाला शाळेत दाखल करतात, परगावी ठेवतात. खस्ता खाऊन उधारउसनवाऱ्या करून, अपमान-अवहेलना सहन करून पैसे पाठवत राहतात. पिढ्यानपिढ्या ऊस तोडता तोडता, आपल्याप्रमाणेच मुलाच्याही आयुष्याचे चिपाड होऊ नये, हा यामागे विचार असतो. नात्यांतही गरीब-श्रीमंत असते, हा धडा बालवयातच लेखकाला मिळतो. परिस्थितीच्या रेट्यामुळे जगण्यासाठी लागणारी ‘सॅाफ्ट स्किल्स’(स्वयंपाक, शिवणकाम,इ.) लहान वयातच शिकणे लेखकाला भाग पडते. चुकून धक्का लागून गुंडाच्या बाटलीतील दारूची सांडलवंड झाल्याने कष्टाने कमावलेले पीठ त्याला भरून द्यावे लागते आणि त्यामुळे तिसरी-चौथी इयत्तेतील लेखकला उपाशी झोपावे लागते. हा प्रसंग अत्यंत हेलावणारा आहे. तो सहजपणे सांगितला जातो. शिक्षक - मुख्याध्यापक - उपशिक्षणाधिकारी - प्राचार्य - गटशिक्षणाधिकारी - शिक्षणाधिकारी असा लेखकाचा चढत्या क्रमाने झालेला प्रवास अनुभवसंपन्न आहे. शिक्षण घेत असतानापर्यंतचे आयुष्य अभावग्रस्ततेने व्यापले असले, तरी लेखकावर झालेल्या खोल मूल्यसंस्कारांचा पाया याच काळात पक्का झाला आहे. नोकरीच्या काळात अवडंबर न माजवता, मूल्ये जपण्याचा अट्टाहास त्याच पायावर उभा आहे. ‘खोटी कागदपत्रे दाखवून बोगस शिक्षकभरती’ची सत्यकथा वाचताना ‘निशाणी डावा अंगठा’ आठवत राहतो. भ्रष्टाचाराने पोखरलेल्या व्यवस्थेत प्रामाणिकपणाचा दिवा सांभाळण्याबाबत मराठे नावाच्या अधिकाऱ्याने लिहिलेल्या चिठ्ठीचा प्रसंग किंवा जिल्हा परिषदेतील राजकारणापायी भ्रष्टाचाराच्या खोट्या आरोपांमध्ये गोवण्याचा प्रयत्न - या घटनांमधून लेखकाच्या सचोटीवर शिक्कामोर्तब होते. सडलेल्या व्यवस्थेवर अंत:स्थ व्यक्तीकडून सूक्ष्मपणे केले जाणारे भाष्य वर्मावर अचूक बोट ठेवणारे आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करणारे प्रयोगशील अभिनव उपक्रम सातत्याने राबवत राहणे, हे लेखकाच्या कारकिर्दीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य. ते लेखकाच्या समाजाभिमुख वैचारिक प्रगल्भतेचे लक्षण आहे. वेगवेगळ्या गावांत लेखकाच्या संकल्पनेतून राबवल्या गेलेल्या ‘बिनपैशाचा उपक्रम’, ‘कृतियुक्त अध्ययन’, ‘शाळाबाह्य मुलींचे शिक्षण’, ‘शाळा तिथे संगणक’, ‘विद्यार्थी अपघात विमा’, ‘चावडीवाचन’, ‘निसर्गशाळा’, ‘गुणवत्ता विकास कार्यक्रम’ अशा अनेक उपक्रमांतून विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय रितीने वाढली, तसेच शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी मदत झाली. अनेकदा अल्पवयीन मुलामुलींच्या लग्नासाठी सामाजिक, आर्थिक कारणांसाठी कित्येकदा पालकांकडून दबाव आणला जातो. त्यामुळे अनेक मुलांचे शिक्षण कायमचे बंद होते. या बहुपदरी समस्येचे निराकरण करणेही लेखकाला आवश्यक वाटते. लेखकाची ‘माणूस’ म्हणून झालेली जडणघडण दर्शवणारे अनेक प्रसंग पुस्तकात येतात. साठवलेल्या पैशांची रूम पार्टनर चोरी करतो, पण ते पैसे त्याला सैन्यात भरती होण्यासाठी उपयोगी पडल्याचे कळल्यावर लेखकाची तगमग शांतावते. लग्नानंतर एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या लेखकाची एकंदर परिस्थिती पाहून सुरुवातीला सासरच्या मंडळींना काही शंका असणे स्वाभाविक होते. त्यावेळी त्यांचे मेहुणे शहाजी यांचा लेखकाला पाठिंबा होता. लेखकाचे बंधूही न्यायाधीशपदावर विराजमान झाले. वयोवृद्ध पित्याला स्वप्नातील विमान प्रवास घडवताना आणि हवाईसुंदरीच्या हातचा ‘पाणी फुळूक’ चहा पाजतानाचा प्रसंग एकाचवेळी गमतीशीर आणि हृदयस्पर्शी झाला आहे. माणसं कशीही असली, तरी शेवटी त्यांच्या चांगुलपणावर लेखकाचा विश्वास आहे. ‘थोडा है थोडे की जरूरत है, जिंदगी फिरभी यहा, खूबसूरत है’ यावर लेखकाचा गाढ विश्वास आहे. गुरुवर्य एल. के. कुलकर्णींच्या काव्यपक्तींमध्ये लेखकाच्या आत्मकथनाचे सार सामावले आहे... ‘कबूल आम्ही असू काजवे, प्रकाश इवला आमचे भूषण उधार घेऊन प्रकाश कृत्रिम मग चमचमणे कधी न जमले शिड्या भिकेच्या हातात घेऊन वरती चढणे कधी न जमले’ काजवा स्वयंप्रकाशित असतो आणि अंधाऱ्या रात्री स्वतःच्या प्रकाशात वाट शोधतो. त्याचा प्रकाश डोळे दिपवून टाकणारा लखलखीत नसला, तरी इतरांनाही वाट दाखवणारा आश्वासक दिलासा त्यात नक्कीच असतो. निराशेच्या अंधारवाण्या रात्री उजळून टाकण्यासाठी लेखकासारख्या काजव्यांचे थवे निरंतर कार्यरत असतात - स्वतःला आणि कळतनकळत समाजाला वाट दाखवण्यासाठी. पुस्तकाचे नावः काजवा
लेखकः पोपट श्रीराम काळे
प्रकाशकः मनोविकास प्रकाशन
मूल्यः ₹ ३५०/-
पृष्ठसंख्याः २७२
प्रथम आवृत्तीः १८ जून २०२२ संबंधित वृत्त बुक रिव्ह्यू:'पुस्तके साद आणि दाद'मध्ये मुखापासून उगमाकडे जाणारा प्रवास; मूळ साहित्यकृती वाचायला येतो हुरूप! 'वसुंधरेचे शोधयात्री':साहसी दर्यावर्दींचा चित्तथरारक इतिहास मांडणारे लेखक डॉ. अनुराग लव्हेकर यांची मुलाखत, ऐका आणि पाहा VIDEO https://link.divyamarathi.com/lHdELfz6JPb
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: ३२ वर्षे पूर्ण, तरीही लग्न जमेना; नैराश्यातून मावळमधील तरुणाचे टोकाचे पाऊल
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
- एसटी कर्मचाऱ्यांचा एल्गार! १५ जूनपासून 'घंटा नाद' आंदोलन, तर २९ जूनपासून राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलन
- मोबाईलचे नेटवर्क अचानक गायब झालेय का? 'सिम स्वॅप फ्रॉड'चे असू शकते हे लक्षण; वेळीच व्हा सावध!
महाराष्ट्र
- पुणे: ३२ वर्षे पूर्ण, तरीही लग्न जमेना; नैराश्यातून मावळमधील तरुणाचे टोकाचे पाऊल
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
- नांदेड: सक्षम ताटेच्या मृतदेहाशी लग्न करणारी आंचल सासर सोडून निघून गेली; ताटे कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त
- एसटी कर्मचाऱ्यांचा एल्गार! १५ जूनपासून 'घंटा नाद' आंदोलन, तर २९ जूनपासून राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलन
गुन्हा
- सिंधुदुर्ग: प्रेमात डर्टी गेम! लग्नात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीची प्रियकर शिक्षकाकडून निर्घृण हत्या
- मुंबई: पोलीस दाम्पत्याचा वाद पोहोचला पोलीस ठाण्यात; मानसिक छळ करणाऱ्या पतीविरुद्ध अखेर गुन्हा दाखल!
- बार्शी हादरले! शेअर मार्केटच्या नादात उद्ध्वस्त झाला संसार; १.८० कोटींच्या कर्जापायी मुख्याध्यापकाने पत्नी आणि दोन मुलांचा जीव घेतला; त्यानंतर स्वतःही संपवले आयुष्य.
- पुण्यात 'फेक' कॉल सेंटरचा पर्दाफाश! ऑनलाइन गेमिंगच्या नावाखाली दररोज शेकडो लोकांची लाखो रुपयांची लूट; टोळी गजाआड.
राजकीय
- ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ! प्रक्षोभक भाषण आणि गृह मंत्रालयावर केलेल्या टिप्पणीवरून कोलकातामध्ये एफआयआर दाखल.
- स्मृती इराणींचे नाव मतदार यादीतून गायब! अमेठीत स्थानिक पंचायत निवडणुकीच्या यादीत नाव नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
- राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचे विलीनीकरण होणार? नाना पटोलेंच्या दिल्ली दौऱ्याने राजकीय वर्तुळात खळबळ; मोठ्या निर्णयाचे संकेत!
इतर
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
मनोरंजन
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
विडियो गॅलेरी

पुणे आणि पिंपरी-चिंचवडला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारूकांडाचा थरारक खुलासा
नसरापूर हादरलंय… आणि प्रत्येक आई-बापाच्या काळजात भीतीचं सावट दाटलंय! @punebatamya
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक दिशा देणारे महामानव…
देश विदेश
- सिंधुदुर्ग: प्रेमात डर्टी गेम! लग्नात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीची प्रियकर शिक्षकाकडून निर्घृण हत्या
- NEET-UG २०२६ परीक्षेसाठी NTA चा महत्त्वाचा निर्णय; वेळ आणि प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यात दिलासा!
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
- गोरखपूर: माणुसकीला काळीमा! आईच्या तेराव्याच्या खर्चावरून मोठ्या भावाने लहान भावावर झाडल्या गोळ्या; तरुणाचा मृत्यू.
























Subscribe to my channel


