हे ही खरंच आहे, माणूस हा इतर कशाच्या आधारावर जगत नसून केवळ आशेवर जगतो. आयुष्यात सतत आशेचे नवीन किरण उगवत राहतात आणि पुढे जगायला भाग पडतात. ते त्याला जगण्याची एक दिशा देतात. जगायला लावणारी आशा कधी उत्कर्ष वाढवणारी तर मात्र कधी केवळ लोभस अशी असते. आता उन्हाळा ओसरत आला. परत एकदा गतवर्षाप्रमाणे माणूस धरतीकडे एका आशेने पाहतो आहे. धरती मात्र कधी निरभ्र तर कधी ढगाळलेल्या आकाशाकडे सतत टक लावून पाहत आहे. तिलाही आशा आहे, आस आहे. धरती आकाशाकडे आशेने पाहत असताना माणूस मात्र तिच्याकडे स्वार्थाने पाहतो आणि धरतीच्या मनाचा त्याने कधी विचारही केला नाही. तर या धरतीला कशाची बरी आशा असेल? तिला हिरवा शालू चुडे नेसवणाऱ्या वरुणराजाची तर आशा नक्कीच असणार! यात तिळमात्र शंका नाही. पावसाच्या आगमनासाठी आसक्त झालेली धरती पाहिली की मनात काहूर माजतं. वरूणराजाच्या आगमनाच्या आशेने धरती मनातून फुललेली, आठवणीने बेहोश होऊन आतून भिजून चिंब झालेली दिसते तर तो आल्यानंतर त्याच्या मस्तीने धुंद झालेली माती डोळ्यातून सुटते थोडीच. हा पाऊस प्रणयानं, भुकेने, प्रेमानं कोसळताना भोळ्या मातीत एक प्रकारचा सुगंध पेरून सुरुवात करतो. या सुगंधाने धरतीचं, निसर्गाचं, वाऱ्याचं निसर्गात असलेल्या साऱ्यांचं मन अगदी फुलून येतं, देहभान विसरून जातं. आणि हा मातीचा सुगंध! ही तर निसर्गाची अनमोल देणगी. या सुगंधी वाऱ्याच्या गंध लहरी तुझ्यापर्यंत, माझ्यापर्यंत, त्याच्यापर्यंत, तिच्यापर्यंत मनात खोलवर भिडल्या म्हणजे सर्व काही विसरून वेगळ्या जगात गेल्याचा भास होतो. यावेळी या धरतीला किती आनंद वाटत असेल? त्या भावना आपल्याला तिच्या मनात शिरून विचार केल्याशिवाय कळणार तरी कशा? तेही खरंच आहे. ज्याचा विचार केला, मनाच्या भोवती अल्हाद विळखा घातला, काळजात शिरायचा प्रयत्न केला त्याच्याच भावना कळत असतात. पाऊस चालू झाला म्हणजे थुई थुई नाचणाऱ्या थेंबांच्या कोमल स्वरांनी तर उडणाऱ्या लाख लाख तृषारांनी धरती आपला आनंद व्यक्त करत असते. आनंद व्यक्त करणे हे मनाच्या पावित्र्याचं लक्षण असतं. पावसाच्या थेंबांची गर्दी कधी कधी तिला सहनही होत नसेल. कारण गर्दी आणि आवाज कोमल भावनांच्या मारक असतात. हा मातीचा सुगंध निर्माण होतो खरा अन् आवश्यक ही असतो. पण त्याला निर्माण करण्यासाठी धरतीला किती कष्ट सोसावे लागतात? आपण कधी हा विचारही केला नाही. चार एक महिनाभर उन्हाळ्याचा दाह सहन केलेला. पुढे रात्रभर वारे पन्नास बावन्न मैलाच्या वेगाने वाहतात. कधी ते ढगांना पळवून लावून आसक्त धरतीला हिरमुसले करतात. हा सुरवातीला येणारा पाऊस माडाची झाडं उलटी सुलटी करतो तर कधी झिंज्या पसरून अंगात आलेल्या माणसांसारखी बेभान होऊन नाचणारी, पिंगा घालणारी जंगलं ही दाखवतो. मात्र या सुगंधानं वातावरण चांगलंच उत्साहवर्धक होतं. याच वेळी क्षणात रागात असलेली विध्वंस बनलेली मनं पार बदलूनही जातात. मात्र एखाद्याला हा मातीचा सुगंध कोणाच्यातरी आठवणीने हैराण व्याकुळ करून सोडतो. ही तगमग ज्याच्या त्याच्या मनाला हेलावून सोडून काळजाला भिडलेली असते. हे नैसर्गिक सुगंधाचं सामर्थ्य आजकालच्या धुरकट, रोगट, भौतिक गंधात कुठलं असणार? कधी व्याकुळ झालेली धरती कदाचित म्हणतही असेल, धुसरं धुक्यातून लहरी वरती निरोप दे तु वायु संगे व्याकुळले तव आगमनाला स्वप्न असे नयनी रंगे खरंच मानवी स्वभावाचं अनुरागात रूपांतर करणाऱ्या, जगण्याचा उल्हास वाढवणाऱ्या या मातीच्या सुगंधाला जपून, टिकवून, हृदयात साठवून ठेवण्याची क्षमता धरतीत मातीत यावी अशी प्रार्थना करायला काय हरकत आहे? कधी कधी असाच हा मातीचा सुगंध मनाला हेलावणी देऊन जातो अन् देह फुलून येतो. वेडे झालेले मन धरतीकडे पाहून म्हणू लागते, जललहरी अन् पाऊस धारा फुलवी मज हा सुगंध सारा सुगंध मातीचा मन मोही वेडी झाले रे तुझं सह मी ही ------------ (संपर्क- 9420015108)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
महाराष्ट्र
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
- पुणे: के. बी. जोशी इन्स्टिट्यूटमध्ये एस.एन.डी.टी.चा पश्चिम महाराष्ट्र विभागीय युवा महोत्सव उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न.
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पुण्यात NCP कार्यालयाबाहेर तरुणांच्या दोन गटांत राडा; एकमेकांना मारहाण
मुंबई लोकलच्या छतावर चढला तरुण; ओव्हरहेड वायरच्या संपर्कात येऊन 45% भाजला
वादळाआधीच मेक्सिकोत जोरदार वाऱ्यांचा तडाखा; मैदानातून खेळाडूंची धावपळ!
देश विदेश
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
























Subscribe to my channel


