माणसाच्या जीवनामध्ये गुरुचे स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या दृष्टीने गुरुला ईश्वराहून मोठं म्हटलं तरी चालेल. ईश्वर प्रत्येक ठिकाणी असतो परंतु तो तितक्या जीवांना समजतो? प्रत्येक जीवातला सृष्टीतला, निसर्गाच्या प्रत्येक कणाकणात वसलेला ईश्वर समजून देण्याचं आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वाचं कार्य गुरु करत असतात. जो आपल्याहून अधिक बुद्धिमान, अनुभवी, समजदार, काहीतरी जास्त येणारा असा जो कोणीतरी सतत आपल्या कृतीतून वक्तव्यातून, कळकळीची विनंती करतो व इतरांना त्या बाबतीत सुधारण्याचा प्रयत्न करत असतो तोच तर गुरू असतो. साधारणपणे आपण सुरुवातीला आई-वडिलांकडून, घरातील मोठ्या व्यक्तींकडून, समाजातील वयस्कर व्यक्तींकडून आणि शाळेतील शिक्षकांकडून काही तरी सतत शिकत असतो. तर काही व्यक्ती मात्र विशिष्ट विषयांची शिकवण देत असतात. शिक्षण उद्देशाच्या दृष्टीने गुरु दोन प्रकारचे म्हणावे लागतील. लौकिक गुरु : आई-वडील, शिक्षक आणि इतर. जगण्याचे नैतिक नियम शिकवणारे, आपल्यात सतत काही ना काही सुधारणा करणारे. भौतिकतेच्या विषयात व संसारासंबंधी जगण्याशी निगडित गोष्टी शिकवणारे त्यांनाही पर्यायाने गुरु म्हणावे लागेल. लोकोत्तर गुरु : आध्यात्मिक शिक्षण देणारे, स्वतः साधनेमध्ये असून इतरांना साधना आदर्श, प्रशिक्षण देणारे, धर्माचे अनुकरण करत धर्माचा प्रसार करणारे, मुक्ती मार्गाचा स्वतः उद्देश धारण करून इतरांना त्या मार्गावर प्रवृत्त करणारे. अशा सर्व साधू संत प्रवर्तक महात्म्यांना गुरु म्हणतात. आपल्याला सर्व काही समजतं असे नव्हे. ते जसं आहे तसं किंवा असेल तसं आणि त्याचे सत्य स्वरूप समजण्यासाठी गुरुची आवश्यकता असते. आपल्यामध्ये ज्ञान असतं परंतु ते निमित्ताने प्रगट होण्यास स्पष्ट होण्यास गुरुचे मोलाचे योगदान असते. दिवा असतो, वात असते, तेल असते परंतु त्याला प्रज्वलित करणारा कोणीतरी असावा लागतो. तोच तो गुरु. मराठीत म्हटलं आहे ज्याच्या जीवनात गुरु त्याचे जीवन खऱ्या अर्थाने सुरू. आपल्या जीवनाच्या उद्देशानुसार आपण गुरुची निवड केली पाहिजे. गुरु मध्येही उत्कृष्ट गुरु असतात. हिंदीमध्ये म्हणतात; पानी पीजे छान के गुरु कीजे जान के अर्थात् : यांच्याकडून आयुष्याचे जगण्याचे आणि मुक्तीचे तत्वज्ञान घ्यायचे आहे, ज्यांच्या मार्गाचे अनुसरण करायचे आहे, ज्यांच्या मागे मागे चालायचे आहे; तो गुरु देखील आपण योग्य असा निवडला पाहिजे. तर या ठिकाणी उत्कृष्ट गुरु कोणास म्हणावे मूळ शास्त्रात याचा उल्लेख आढळतो: सर्वश्रेष्ठ सर्वोत्तम गुरु : जो १ वितराग : राग द्वेषाने रहित
२ सर्वज्ञ : ज्ञानी [ संपूर्ण ]
३ हितोपदेशी शास्त्राचा कर्ता [ सर्व जीवांना कल्याणकारी मार्ग दर्शवणारा असा आहे. आपल्या जीवनाचा सर्वांगीण सुधार करत मुख्य उद्देशाकडे नेऊन पोहोचवणाऱ्या गुरुबद्दल आपल्याला सतत आदर व भक्ती भाव असला पाहिजे. गुरुच्या वचनावर इतकी श्रद्धा असायला हवी की " गुरुचा शब्द आदेश आणि वाक्य प्रमाण " असेच मानावे. एकदा का गुरु जाणला, मानला की त्या आदरणीय गुरूंचे आपल्याकडे सतत लक्ष असते. ते आपल्यासमोर असोत अथवा नसोत, ते जवळ असोत अथवा दूर असोत, ते विद्यमान असोत अथवा निर्वाण स्थानी पोहोचलेले असोत. असतील तेथून गुरूंचे आपल्यावर सतत लक्ष असते. म्हणून वेळ संकटाची असो नसो, वेळ आनंदाची दुःखाची कुठलीही असेल ; वेळोवेळी आठवेल तेव्हा, शक्य होईल तेव्हा गुरुचे नामस्मरण करावे. एक अद्भुत शक्ती आपल्या सोबत असल्याचा अनुभव होईल. म्हणून जीवनामध्ये गुरुचे स्थान ईश्वराहून देखील महत्त्वाचे आहे असेच मला वाटते. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) (संपर्क- 9420015108)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पाण्याची तीव्र टंचाई! सर्व धरणसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित; विभागीय आयुक्तांचे वीजपंप जप्त करण्याचे कठोर आदेश
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
महाराष्ट्र
- नागपूर: ऑपरेशन टायगर' ते डीजे बंदी; राजकीय घडामोडींवर सचिन अहिर यांचे विविध मुद्द्यांवर स्पष्ट भाष्य!
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- नंदुरबार: गावोगावी उभे राहिलेत दोन गट, पक्षात गटबाजीचा आजार..; शिंदेंच्या आमदारानेच उघड केली स्वतःच्या पक्षाची पोलखोल!
गुन्हा
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला


























Subscribe to my channel




