पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:अनुभव शरीराशी जोडलेला‎ तर अनुभूती हृदय -आत्म्याशी

आदि शंकराचार्यांनी आपल्या अत्यंत उपयोगाच्या दोन गोष्टी‎सांगितल्या. पहिली गोष्ट म्हणजे मंदिरात कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी‎जाणाराच खऱ्या अर्थाने मंदिरात पोहोचतो. दुसरी गोष्ट म्हणजे, खरा‎आनंद आनंदाच्या शोधात नसलेल्यांनाच मिळतो. पहिली गोष्टीनुसार ‎मंदिरात जाल ईश्वराचे आभार मानावेत. त्याचीही एक पद्धत आहे.‎ आपल्या मंदिरांमध्ये देवतांची प्राणप्रतिष्ठा यासाठी केली जाते की त्या‎मूर्ती चैतन्यमय होतात. तेथे एकाग्रतेने दर्शन करण्याची व्यवस्था असते.‎ डोळ्यांचा सर्वांत उत्तम उपयोग म्हणजे ईश्वराच्या मूर्तीला एकटक‎पाहणे व दुसरा म्हणजे आरशात स्वतःच्या डोळ्यांकडे पाहणे.‎दुसरीकडे, शंकराचार्य सांगतात की खरा आनंद म्हणजे काय? आपण ‎एखाद्या गोष्टीचा अनुभव घेतो, तेव्हा सुख मिळते. पण तो अनुभूतीत‎ रूपांतरित होतो, तेव्हा खरा आनंद मिळतो. सांसारिक कार्यात‎ अध्यात्माची थोडीशी जोड हवी. त्यातून सांसारिक कार्यांचा अनुभव ‎मिळेलच, पण कार्यात ईश्वरी उपस्थिती आहे, याची अनुभूतीही‎ मिळेल.‎‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *