टी20 वर्ल्डकप वादाचा बीसीसीआयला बसणार फटका! या स्पर्धेचं यजमानपद आयसीसी काढणार?Image Credit source: PTI
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. पाकिस्तानचे सर्व सामने तटस्थ ठिकाणी होणार हे आधीच ठरलं होतं. पण ऐनवेळी बांगलादेशने भारतात खेळण्यास नकार दिला आणि आयसीसीची धावाधाव झाली. बांगलादेशला वगळून स्कॉटलँडची स्पर्धेत एन्ट्री झाली. दुसरीकडे, पाकिस्तानने बांगलादेशवर अन्याय झाल्याचं सांगत भारताविरुद्ध खेळणार नाही असा पवित्रा घेतला. त्यामुळे जवळपास दोन आठवडे डोकेदुखी सुरू होती. पाकिस्तानची मनधरणी करण्यासाठी खलबतं सुरू होती. पाकिस्तानची मनधरणी करण्यासाठी आयसीसीला टोकाचे प्रयत्न करावे लागले. अखेर हा सामना 15 फेब्रुवारीला झाला आणि भारताने विजय मिळवत सुपर 8 फेरी गाठली. पण हा निकाल येण्यापूर्वी आयसीसीची धाकधूक वाढली होती. कारण हा सामना रद्द झाला असता तर स्पर्धेवर परिणाम दिसून आला होता. इतकंच काय तर आर्थिक नुकसान झालं असतं ते वेगळंच. आता ऑस्ट्रेलियातून आलेल्या एका रिपोर्टनुसार आणि त्यात केलेल्या दाव्यानुसार आयसीसी भारताकडून येत्या काही स्पर्धेचं यजमानपद काढू शकते.
ऑस्ट्रेलियातील वृत्तपत्र सिडनी मॉर्निंग हेरल्डच्या वृत्तानुसार, भारत बांग्लादेश यांच्यातील राजकीय वाद पाहता आयसीसी मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. 2029 मध्ये होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2031 वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं यजमानपद भारताकडून हिसकावून घेऊ शकते. भारताचे पाकिस्तान आणि बांगलादेशसोबत असंच नातं राहिलं तर दोन्ही देश भारतात जाण्यास नकार देतील. त्यामुळे स्पर्धेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या स्पर्धेचं यजमानपद ऑस्ट्रेलियाला मिळू शकते. पण चॅम्पियन्स ट्रॉफी 2029 स्पर्धेतील 8 संघात पाकिस्तान आणि बांग्लादेश नसेल तर ही स्पर्धा भारतातच होईल. दुसरीकडे, 2031 वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं यजमानपद भारत आणि बांगलादेशला संयुक्तपणे मिळालं तर प्रश्नच येणार नाही.
वर्ल्डकप स्पर्धेचं यजमानपद भारतासाठी भविष्यात डोकेदुखीचं कारण ठरणार आहे. कारण या स्पर्धेत दोन देशांनी असाच पवित्रा ठेवला तर आयसीसी ठोस पावलं उचलू शकते. ऑस्ट्रेलियाला एक बॅकअप यजमानपद म्हणून तयारीत राहावं लागणार आहे. क्रिकेटचे तीन वेगवेगळे फॉर्मेट आहेत आणि तिन्ही फॉर्मेटसाठी आयसीसी स्पर्धांचं आयोजन करतं. इतकंच काय तर वुमन्स आयसीसी स्पर्धांवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पुढच्या काळात राजकीय समीकरण कशी बदलतात यावर सर्वकाही अवलंबून असणार आहे.
शहर
- ठाणे स्मार्ट मीटर वाद: वारलीपाड्यात जबरदस्तीने बसवलेल्या स्मार्ट मीटरमुळे ५०० रुपयांचे वीज बिल थेट २००० रुपयांवर; संतप्त नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
- महावितरण भरतीचा तिढा: उपकेंद्र सहाय्यक पदासाठी ७५७ उमेदवार ५ वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत; प्रशासकीय दिरंगाईवर प्रश्नचिन्ह
- पुणे शहरात १४ दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू: २१ जुलै ते ३ ऑगस्टपर्यंत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा मोठा निर्णय
- पुणे: भगवान जगन्नाथ रथयात्रेनिमित्त रविवारी मध्यवस्तीत मोठे वाहतूक बदल; 'हे' मार्ग टाळा
महाराष्ट्र
- ठाणे स्मार्ट मीटर वाद: वारलीपाड्यात जबरदस्तीने बसवलेल्या स्मार्ट मीटरमुळे ५०० रुपयांचे वीज बिल थेट २००० रुपयांवर; संतप्त नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
- कोल्हापूर: माधुरी हत्तीणीच्या परतीचा मार्ग मोकळा; नांदणी येथील सोयीसुविधांची पाहणी करण्यासाठी समितीला ५ ऑगस्टपर्यंत मुदत
- महावितरण भरतीचा तिढा: उपकेंद्र सहाय्यक पदासाठी ७५७ उमेदवार ५ वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत; प्रशासकीय दिरंगाईवर प्रश्नचिन्ह
- कोल्हापुर: भरदिवसा राडा: अतिक्रमण हटवल्याच्या रागातून पाच जणांवर तलवारीने हल्ला, दगडफेकीने परिसरात खळबळ
गुन्हा
- पुणे हादरले! शिरूरमध्ये तरुणावर ८ जणांचा जीवघेणा गोळीबार; जीव वाचवण्यासाठी पाण्यात मारली उडी"
- नाशिक: प्रेमसंबंधाचा रक्तरंजित शेवट, पेईंग गेस्टमध्ये तरुणीची हत्या; प्रियकराला अटक
- मध्य प्रदेश: लग्नाला वर्षही पूर्ण नव्हते; चहाच्या वादातून पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा
- मुंबईत घर खरेदी महागणार! मालमत्ता नोंदणी शुल्कात ३० हजारांवरून ५० हजारांपर्यंत वाढ करण्याच्या विचारात महायुती सरकार
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: 'रोजचा त्रास सहन होईना!'; २३ वर्षीय सुनेने ब्लेडने कापला सासऱ्याचा प्रायव्हेट पार्ट; छेडछाडीला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल
- बळ्ळारीत थरार: प्रेमविवाहानंतर अवघ्या काही तासांतच नवरदेवाची निर्घृण हत्या; लग्नाच्या दिवशीच नवरीचा झाला वैधव्य
- आंध्र प्रदेश: देवाच्या दर्शनाला नेले अन् संपवले, प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केला पतीचा निर्घृण खून; आंध्र प्रदेशात खळबळ
- मध्य प्रदेश: नात्याला काळीमा, पोटच्या मुलांनी आणि सुनांनी वृद्ध आईला २ महिने कोंडले घरात; शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे जीव वाचला



























Subscribe to my channel




