टी20 वर्ल्डकप वादाचा बीसीसीआयला बसणार फटका! या स्पर्धेचं यजमानपद आयसीसी काढणार?Image Credit source: PTI
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. पाकिस्तानचे सर्व सामने तटस्थ ठिकाणी होणार हे आधीच ठरलं होतं. पण ऐनवेळी बांगलादेशने भारतात खेळण्यास नकार दिला आणि आयसीसीची धावाधाव झाली. बांगलादेशला वगळून स्कॉटलँडची स्पर्धेत एन्ट्री झाली. दुसरीकडे, पाकिस्तानने बांगलादेशवर अन्याय झाल्याचं सांगत भारताविरुद्ध खेळणार नाही असा पवित्रा घेतला. त्यामुळे जवळपास दोन आठवडे डोकेदुखी सुरू होती. पाकिस्तानची मनधरणी करण्यासाठी खलबतं सुरू होती. पाकिस्तानची मनधरणी करण्यासाठी आयसीसीला टोकाचे प्रयत्न करावे लागले. अखेर हा सामना 15 फेब्रुवारीला झाला आणि भारताने विजय मिळवत सुपर 8 फेरी गाठली. पण हा निकाल येण्यापूर्वी आयसीसीची धाकधूक वाढली होती. कारण हा सामना रद्द झाला असता तर स्पर्धेवर परिणाम दिसून आला होता. इतकंच काय तर आर्थिक नुकसान झालं असतं ते वेगळंच. आता ऑस्ट्रेलियातून आलेल्या एका रिपोर्टनुसार आणि त्यात केलेल्या दाव्यानुसार आयसीसी भारताकडून येत्या काही स्पर्धेचं यजमानपद काढू शकते.
ऑस्ट्रेलियातील वृत्तपत्र सिडनी मॉर्निंग हेरल्डच्या वृत्तानुसार, भारत बांग्लादेश यांच्यातील राजकीय वाद पाहता आयसीसी मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. 2029 मध्ये होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2031 वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं यजमानपद भारताकडून हिसकावून घेऊ शकते. भारताचे पाकिस्तान आणि बांगलादेशसोबत असंच नातं राहिलं तर दोन्ही देश भारतात जाण्यास नकार देतील. त्यामुळे स्पर्धेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या स्पर्धेचं यजमानपद ऑस्ट्रेलियाला मिळू शकते. पण चॅम्पियन्स ट्रॉफी 2029 स्पर्धेतील 8 संघात पाकिस्तान आणि बांग्लादेश नसेल तर ही स्पर्धा भारतातच होईल. दुसरीकडे, 2031 वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं यजमानपद भारत आणि बांगलादेशला संयुक्तपणे मिळालं तर प्रश्नच येणार नाही.
वर्ल्डकप स्पर्धेचं यजमानपद भारतासाठी भविष्यात डोकेदुखीचं कारण ठरणार आहे. कारण या स्पर्धेत दोन देशांनी असाच पवित्रा ठेवला तर आयसीसी ठोस पावलं उचलू शकते. ऑस्ट्रेलियाला एक बॅकअप यजमानपद म्हणून तयारीत राहावं लागणार आहे. क्रिकेटचे तीन वेगवेगळे फॉर्मेट आहेत आणि तिन्ही फॉर्मेटसाठी आयसीसी स्पर्धांचं आयोजन करतं. इतकंच काय तर वुमन्स आयसीसी स्पर्धांवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पुढच्या काळात राजकीय समीकरण कशी बदलतात यावर सर्वकाही अवलंबून असणार आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




