टी20 वर्ल्डकप वादाचा बीसीसीआयला बसणार फटका! या स्पर्धेचं यजमानपद आयसीसी काढणार?Image Credit source: PTI
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं यजमानपद भारत आणि श्रीलंकेकडे आहे. पाकिस्तानचे सर्व सामने तटस्थ ठिकाणी होणार हे आधीच ठरलं होतं. पण ऐनवेळी बांगलादेशने भारतात खेळण्यास नकार दिला आणि आयसीसीची धावाधाव झाली. बांगलादेशला वगळून स्कॉटलँडची स्पर्धेत एन्ट्री झाली. दुसरीकडे, पाकिस्तानने बांगलादेशवर अन्याय झाल्याचं सांगत भारताविरुद्ध खेळणार नाही असा पवित्रा घेतला. त्यामुळे जवळपास दोन आठवडे डोकेदुखी सुरू होती. पाकिस्तानची मनधरणी करण्यासाठी खलबतं सुरू होती. पाकिस्तानची मनधरणी करण्यासाठी आयसीसीला टोकाचे प्रयत्न करावे लागले. अखेर हा सामना 15 फेब्रुवारीला झाला आणि भारताने विजय मिळवत सुपर 8 फेरी गाठली. पण हा निकाल येण्यापूर्वी आयसीसीची धाकधूक वाढली होती. कारण हा सामना रद्द झाला असता तर स्पर्धेवर परिणाम दिसून आला होता. इतकंच काय तर आर्थिक नुकसान झालं असतं ते वेगळंच. आता ऑस्ट्रेलियातून आलेल्या एका रिपोर्टनुसार आणि त्यात केलेल्या दाव्यानुसार आयसीसी भारताकडून येत्या काही स्पर्धेचं यजमानपद काढू शकते.
ऑस्ट्रेलियातील वृत्तपत्र सिडनी मॉर्निंग हेरल्डच्या वृत्तानुसार, भारत बांग्लादेश यांच्यातील राजकीय वाद पाहता आयसीसी मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. 2029 मध्ये होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2031 वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं यजमानपद भारताकडून हिसकावून घेऊ शकते. भारताचे पाकिस्तान आणि बांगलादेशसोबत असंच नातं राहिलं तर दोन्ही देश भारतात जाण्यास नकार देतील. त्यामुळे स्पर्धेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या स्पर्धेचं यजमानपद ऑस्ट्रेलियाला मिळू शकते. पण चॅम्पियन्स ट्रॉफी 2029 स्पर्धेतील 8 संघात पाकिस्तान आणि बांग्लादेश नसेल तर ही स्पर्धा भारतातच होईल. दुसरीकडे, 2031 वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं यजमानपद भारत आणि बांगलादेशला संयुक्तपणे मिळालं तर प्रश्नच येणार नाही.
वर्ल्डकप स्पर्धेचं यजमानपद भारतासाठी भविष्यात डोकेदुखीचं कारण ठरणार आहे. कारण या स्पर्धेत दोन देशांनी असाच पवित्रा ठेवला तर आयसीसी ठोस पावलं उचलू शकते. ऑस्ट्रेलियाला एक बॅकअप यजमानपद म्हणून तयारीत राहावं लागणार आहे. क्रिकेटचे तीन वेगवेगळे फॉर्मेट आहेत आणि तिन्ही फॉर्मेटसाठी आयसीसी स्पर्धांचं आयोजन करतं. इतकंच काय तर वुमन्स आयसीसी स्पर्धांवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पुढच्या काळात राजकीय समीकरण कशी बदलतात यावर सर्वकाही अवलंबून असणार आहे.
शहर
- मुंबई: रात्री जेवणानंतर शतपावली करताना मंत्री अदिती तटकरे यांचे पीआरओ आशिष मेटे यांचे आकस्मिक निधन
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- मुंबई: महायुतीत अंतर्गत वाद पेटला; मुंबई बँकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे सेना थेट आमनेसामने येण्याची दाट शक्यता
- नाशिक: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी; ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे मांडणार बाजू
महाराष्ट्र
- मुंबई: रात्री जेवणानंतर शतपावली करताना मंत्री अदिती तटकरे यांचे पीआरओ आशिष मेटे यांचे आकस्मिक निधन
- मुंबई: महायुतीत अंतर्गत वाद पेटला; मुंबई बँकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिंदे सेना थेट आमनेसामने येण्याची दाट शक्यता
- नाशिक: भोंदू अशोक खरातच्या जामीन अर्जावर आज महत्त्वाची सुनावणी; ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम सरकार पक्षातर्फे मांडणार बाजू
- मुंबई: एक देश, एक निवडणूक'मुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल आणि विकासकामांना वेग मिळेल; नेत्यांचे स्पष्ट प्रतिपादन
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- चेन्नई: २०२९ला राहुल गांधीच पंतप्रधान, विजय यांनी समर्थन न दिल्यास मंत्रिपदाचे राजीनामे देऊ ;काँग्रेसचा तामिळनाडू सरकारला थेट इशारा
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!


























Subscribe to my channel


