खरंच तसं आहे का? टी20 वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान भारतीय खेळाडूंची बॅट संशयाच्या भोवऱ्यातImage Credit source: Asian Cricket Council
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताने अमेरिकेला पराभूत करून विजयाचा नारळ फोडला. पहिल्याच सामन्यात भारताच्या फलंदाजीची घसरगुंडी पाहायला मिळाली. पण एका बाजूने कर्णधार सूर्यकुमार यादवने किल्ला लढवला आणि विजयाची पाया भक्कम केला. टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदासाठी टीम इंडियाला प्रबळ दावेदारांपैकी एक मानली जात आहे. कारण गेल्या दोन वर्षात टीम इंडियाने सातत्यपूर्ण चांगली कामगिरी केली आहे. फलंदाजांची निर्धास्त खेळीमुळे प्रतिस्पर्धी संघ अडचणीत येत आहे. अभिषेक शर्मा, इशान किशन, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे फटकेबाजीत तरबेज आहे. समोर गोलंदाज कोणीही असला तरी मोठे फटके मारण्यात मागे पुढे पाहात नाही. त्यामुळे भारताची फलंदाजी वेगळी आहे. असं असताना श्रीलंकेचा फलंदाज भानुका राजपक्षे याने एक आश्चर्यकारक विधान केलं आहे. राजपक्षेच्या मते भारतीय फलंदाजांच्या बॅटमुळे त्यांची फलंदाजी अधिक सक्षम झाली आहे.
भानुका राजपक्षे याने एका मुलाखतीत भारतीय फलंदाजाच्या बॅटवर संशय व्यक्त केला आहे. भानुका राजपक्षेने सांगितलं की, भारतीय फलंदाज एका खास पद्धतीच्या बॅट वापरत आहे. या बॅट इतर संघाच्या खेळाडूंना मिळत नाहीत. या बॅट इतर बॅटच्या तुलनेत अधिक बळकट आहेत. या बॅट इतक्या प्रगत आहेत की त्या बॅटवर रबराचा थर लावला असावा. ‘भारतीय फलंदाजांकडे ज्या बॅट आहेत, त्या आमच्याकडे मिळणाऱ्या बेस्ट बॅटपेक्षा कितीतरी पटीने चांगल्या आहेत. असं वाटतं की त्यावर रबराचा एक थर चढवला असावा. मला समजत नाही की हे कसं काय शक्य आहे. या बॅट दुसरं कोणीही खरेदी करू शकत नाही. ही बाब सर्व खेळाडूंना माहिती आहे.’ दरम्यान, आयसीसी नियमानुसार, बॅटवर कोणत्याही पद्धतीचा थर लावू शकत नाही.
भारताने टी20 वर्ल्डकप 2024 पासून आक्रमक पवित्रा घेतला आहे. फलंदाजीला आल्यापासून पहिल्या चेंडूपासून आक्रमण करण्याची रणनिती आहे. मागच्या दोन वर्षात भारताने अनेकदा 250 हून अधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. इतकंच काय तर 200हून अधिक धावा करण्याचा यादीतही आघाडीवर आहे. आतापर्यंत भारताने सर्वाधिक सामने जिंकले आहे. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतही जेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




