अमेरिकेत 4 ते 8 वर्षे वयोगटातील मुलांवर वर्षभर चाललेल्या एका प्रदीर्घ अभ्यासात असे आढळून आले आहे की, जेव्हा श्वेतवर्णीय मुले टीव्ही कार्यक्रमांमध्ये वेगवेगळ्या वंशाच्या लोकांना एकत्र पाहतात, तेव्हा त्यांच्या मनात कुणाबद्दलही भेदभाव निर्माण होत नाही. या सोमवारी जर्नल ऑफ अमेरिकन सायकॉलॉजिस्ट्समध्ये प्रकाशित झालेल्या एका न्यूज रिपोर्टनुसार, ज्या टीव्ही कार्यक्रमांमध्ये वर्गभेद दिसून येतो, म्हणजेच मुख्य पात्रे शाही घराण्यातील असतात आणि सहायक पात्रांना त्यांच्यापेक्षा कमी श्रीमंत किंवा कमी समजदार दाखवले जाते, त्यामुळे मुलांमध्ये भेदभाव विकसित होऊ शकतो. या बातमीने मला बालपणाची आठवण करून दिली, जेव्हा आमचे पालक वेगवेगळ्या क्षेत्रांच्या आणि परंपरांच्या अशाच गोष्टी सांगायचे. या कथांमध्ये तीच कालातीत शिकवण असायची, जी आजच्या आधुनिक संशोधनातही सांगितली जाते. भेदभाव मिटवणाऱ्या अशाच काही कथा येथे सादर केल्या आहेत. मोठे झाल्यावर श्रीकृष्ण द्वारकेचे राजे झाले, तर सांदीपनी ऋषींच्या आश्रमात त्यांच्यासोबत शिकणारे सुदामा गरिबीत जीवन जगत होते. एक दिवस अतिशय संकोचाने सुदामा कृष्णाला भेटायला पोहोचले आणि त्यांच्याकडे फक्त पोह्यांची पुरचुंडी होती. कृष्णाने अत्यंत प्रेमाने त्यांचे स्वागत केले, गळाभेट घेतली आणि त्यांना अति-सन्मानित अतिथीचा दर्जा दिला. सुदाम्याला लाज न वाटू देता कृष्णाने शांतपणे आपल्या मित्राचे आयुष्य बदलून टाकले. आपण शिकलो : मैत्री संपत्तीपेक्षा मोठी असते. वृद्ध आदिवासी महिला शबरीने वर्षानुवर्षे प्रभू रामांची प्रतीक्षा केली. राम येतील या आशेने ती दररोज जंगलातील रस्ता साफ करत असे. जेव्हा राम आले, तेव्हा तिने प्रेमाने प्रत्येक बोर आधी चाखून पाहिले, जेणेकरून ती त्यांना सर्वात गोड फळे देऊ शकेल. रामानेही ती आनंदाने स्वीकारली, कारण त्यांच्यासाठी ते प्रेम कोणत्याही शाही भोजनापेक्षा अधिक मौल्यवान होते. आपण शिकलो : प्रेमाला कोणतीही मर्यादा नसते. आठवून पाहा, हस्तिनापूरमध्ये दुर्योधनाच्या भव्य भोजनाच्या निमंत्रणानंतरही कृष्ण विदुराच्या साध्या घरी गेले. तिथे विदुराची पत्नी इतकी भावविभोर झाली की तिने फळांऐवजी केळीची सालेच वाढली. कृष्ण हसले आणि त्यांनी तीही स्वीकारली, कारण ती खऱ्या प्रेमाने वाढली होती. आपण शिकलो : प्रेमाने भरलेले घर महालापेक्षा अधिक समृद्ध असते. सत्यकामला ऋषी गौतम यांच्या गुरुकुलात शिकायचे होते. जेव्हा सत्यकामला त्याच्या कुटुंबाबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्याने प्रामाणिकपणे सांगितले की त्याच्या वडिलांबद्दल त्याच्या आईला काहीही माहिती नाही. त्याच्या सत्यवचनाने प्रभावित होऊन ऋषींनी म्हटले की, इतके प्रामाणिक शब्द एखादी श्रेष्ठ व्यक्तीच बोलू शकते आणि त्यांनी त्याला आपला शिष्य बनवले. आपण शिकलो : प्रामाणिकपणा हीच तुमची सर्वात मोठी ओळख आहे. संत रविदास बूट बनवून आपली उपजीविका चालवत असत, ज्याला अनेक लोक छोटे काम मानायचे. परंतु त्यांची बुद्धिमत्ता, विनम्रता आणि भक्तीने त्यांना भारतातील महान संतांपैकी एक बनवले. राजा, राणी आणि विद्वान त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत असत, कारण ते संतांच्या चारित्र्याचा सन्मान करत होते, त्यांच्या व्यवसायाचा नाही. आपण शिकलो : प्रत्येक व्यवसाय सन्मानास पात्र आहे. गुजरातचे लाडके संत-कवी नरसी मेहता यांनी देव आणि मानवतेप्रति समर्पित असे साधे जीवन व्यतीत केले. त्यांचे प्रसिद्ध भजन ‘वैष्णव जन तो’ शिकवते की श्रेष्ठ तोच आहे, जो दुसऱ्याचे दु:ख समजतो आणि कोणत्याही स्तुतीची किंवा पुरस्काराची अपेक्षा न करता त्याची मदत करतो. त्यांच्या जीवनाने अनेक पिढ्यांना प्रत्येक माणसाप्रति करुणा बाळगायला शिकवले. आपण शिकलो : दुसऱ्याच्या वेदना समजून घ्या. भगवान विठ्ठलाचे निस्सीम भक्त असूनही संत चोखामेळा यांना भेदभाव सहन करावा लागला आणि सामाजिक परंपरांमुळे त्यांना अनेकदा मंदिरात प्रवेश दिला जात नसे. तरीही त्यांनी आपली श्रद्धा सोडली नाही. त्यांची भक्तिगीते इतकी प्रभावशाली ठरली की आजही पंढरपूर वारीचे लाखो भाविक ती गातात. आपण शिकलो : भक्तीला कोणतीही जात नसते. राजा रंतिदेव यांची कथा सांगते की, अनेक दिवस उपाशी राहिल्यानंतरही त्यांनी आपले अन्न इतरांना दिले. त्यांचे असे मानणे होते की, गरजवंतांची सेवा हीच सर्वात मोठी पूजा आहे. आपण शिकलो : तुमच्याकडे थोडे असले तरी ते वाटा आणि दयेला कोणताही दर्जा नसतो. फंडा असा की, जर आपण मुलांना झोपण्यापूर्वी या कथा पुन्हा ऐकवू लागलो, तर खात्रीने आपण नेहमी जगातील सर्वात चांगले पालक बनून राहू.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: ई-चलन भरल्याशिवाय आरटीओची कोणतीही कामे होणार नाहीत; राज्य सरकारच्या नव्या निर्णयाविरोधात वाहतूकदारांचा तीव्र संताप व आंदोलनाचा इशारा
- चेन्नई: थलपती विजय भारताचे पंतप्रधानच काय, अमेरिकेचे अध्यक्षही होऊ शकतात; ई. पलानीस्वामींचा उपरोधिक टोला
- पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाइन फ्लूचा विळखा! एका महिन्यात २३ रुग्ण पॉझिटिव्ह; आरोग्य विभागाकडून तातडीने वैद्यकीय तपासणी करण्याचे आवाहन
- पुणे: मेसमधील निकृष्ट जेवण अन् पंतप्रधान मोदींच्या फोटोवरून पुण्याचे शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज आले चर्चेत
महाराष्ट्र
- पुणे: ई-चलन भरल्याशिवाय आरटीओची कोणतीही कामे होणार नाहीत; राज्य सरकारच्या नव्या निर्णयाविरोधात वाहतूकदारांचा तीव्र संताप व आंदोलनाचा इशारा
- मुंबई: मनसेच्या त्या गुंडांना त्वरित अटक झालीच पाहिजे; भाजप युवा मोर्चाचे नेते कृष्णराज महाडिक आक्रमक, पोलीस कारवाईची मागणी
- कोल्हापुर: बिबट्याचा थरारक हल्ला! भुदरगड तालुक्यात गुरे चरण्यासाठी गेलेल्या दोन शेतकऱ्यांवर झडप, एक जण गंभीर जखमी
- सांगली: चालकाला अचानक चक्कर आल्याने एसटी बस थेट चहाच्या टपरीवर धडकली; टळला मोठा अनर्थ, सर्व प्रवासी सुखरूप
गुन्हा
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- चेन्नई: थलपती विजय भारताचे पंतप्रधानच काय, अमेरिकेचे अध्यक्षही होऊ शकतात; ई. पलानीस्वामींचा उपरोधिक टोला
- पश्चिम बंगाल: ममता बॅनर्जींच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर! भाचीचा राहत्या घरी संशयास्पद मृत्यू; नोकरी गेल्यामुळे आणि घटस्फोटाच्या प्रकरणामुळे होती तणावात
- उत्तर प्रदेश: आग्रा येथे संतापजनक प्रकार! माजी राष्ट्रीय पॉवरलिफ्टर खेळाडूवर पतीकडून हॉटेलमध्ये चाकूने प्राणघातक हल्ला
- नवी दिल्ली: जग चौफेर संकटात, पण भारताची वेगाने प्रगती पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला 'झूठ की गुंज' म्हणत टोला




























Subscribe to my channel


