मुंबईतील पवई तलावाच्या काठावरच्या काही संध्याकाळी सहसा शांत असतात. पण त्या संध्याकाळी ती जागा निष्ठेच्या एका खोल उदाहरणाची साक्षीदार बनली. 70 ते 80 वयोगटातील काही निवृत्त व्यक्ती आपल्या रोजच्या गप्पांसाठी तिथे बसल्या होत्या. जसे घड्याळात पाच वाजले तसे त्यातील सर्वात टापटीप कपडे घातलेली एक व्यक्ती उठून उभी राहिली. “अरे मित्रा, थांब ना!’ एकाने आग्रह केला. “आइस्क्रीम पाच मिनिटांत येईल. थोडा वेळ बस, मग जा.’ त्यांनी नकार दिला आणि घरी जाण्यावर ठाम राहिले. पत्नीसोबत संध्याकाळचा चहा घेण्यासाठी. तेव्हाच एका तिसऱ्या मित्राने ज्याच्या आवाजात थोडी कडवट उदासी होती म्हटले, “एवढी घाई काय आहे? त्या तर आता स्मृतिभ्रंशाच्या (डिमेन्शिया) धुक्यात हरवल्या आहेत. त्यांना काहीच आठवत नाही. तू आला आहेस की नाही हे त्यांना कसं कळणार?’ त्या व्यक्तीने मागे वळून पाहिले. त्यांची नजर तीक्ष्ण होती आणि आवाजात संध्याकाळच्या हवेलाही थांबवणारी स्थिरता होती. ते म्हणाले, “त्यांना आठवत नाही, पण मला तर डिमेन्शिया झालेला नाही. मला आठवतंय त्या कोण आहेत आणि म्हणूनच त्यांच्यासोबत तिथे असणं ही माझी जबाबदारी आहे.’ त्या शब्दांत इतका जडपणा होता की सर्वजण काही क्षणांसाठी शांत झाले. ही प्रेमाची सर्वोच्च व्याख्या आहे. अशी बांधिलकी, जी समोरच्याला समजण्यापलीकडेही टिकून राहते. काही वर्षांपूर्वीच्या या अनुभवाची आठवण मला तेव्हा झाली, जेव्हा शुक्रवारी रात्री एका पार्टी अँकरने मला विचारले की, लग्नाच्या चाळीस वर्षांनंतरही अशी कोणती गोष्ट आहे, जी रोमान्स जिवंत ठेवते? माझे उत्तर साधे होते : लहान, न दिसणारे प्रयत्न तिने मला उदाहरण मागितले. कदाचित तिला एखाद्या भव्य कथेची अपेक्षा होती. पण मी सार्वजनिक स्वच्छतागृहांबद्दल बोललो. मी श्रोत्यांना सांगितले की, माझ्या पत्नीची स्वच्छतेबद्दलची संवेदनशीलता ओळखून मी सार्वजनिक ठिकाणी नेहमी लक्ष ठेवतो. जसे मी एखाद्या हाउसकीपिंग टीमला काम संपवताना पाहतो, मी तिला लगेच सांगतो वॉशरूम आता स्वच्छ आहे, तुला वापरायचे असेल तर हीच योग्य वेळ आहे. ती अँकर भावुक झाली. तिने पाहुण्यांना सांगितले की, “बघा, हे किती योग्य बोलत आहेत. रोमान्स म्हणजे जगाला दाखवण्यासाठी हार्ट डिझाइनचा चॉकलेट बॉक्स नाही, तर कोणासाठी तरी केलेलं एखादं विचारपूर्वक ‘अदृश्य’ काम आहे.”माझ्यासाठी खरे प्रेम म्हणजे कोणतेही प्रदर्शन नाही. ते तितकेच साधे असू शकते, जितके माझे वडील ऑफिसमधून परतताना एक आण्यात विकत घेतलेला मोगऱ्याचा गजरा आईसाठी आणायचे किंवा रोज ठरावीक वेळी न चुकता चहासाठी हजर राहण्याचा तो शांत निर्णय. कारण हृदय आपले कर्तव्य कधीच विसरत नाही. रोमान्स ही अशी गोष्ट नाही, जिला एखाद्या साच्यात बसवता येईल. मी अशा पतींना ओळखतो, जे स्वयंपाकघरात स्टूलवर बसून कोथिंबीर साफ करतात किंवा भाजी चिरून देतात, जेव्हा त्यांची पत्नी स्वयंपाक करत असते. ते भाजी चिरण्याला साधे घरगुती काम मानत नाहीत; त्या बहाण्याने ते हे समजून घेण्याचा प्रयत्न करतात की आपल्या जोडीदाराला भावनिक आणि शारीरिक सुखासाठी काय हवे आहे. ते आयुष्य एकत्र अनुभवतात. दररोज पत्नीसाठी भाजी चिरणे हे खरं तर रोज एकमेकांना ‘डेट’ करण्यासारखेच आहे, जो रोमान्स जिवंत ठेवण्याचा एक मार्ग आहे. संयुक्त कुटुंबात जिथे आई-वडील किंवा ज्येष्ठांच्या देखभालीची जबाबदारी असते अशी जोडपी सकाळी लवकर उठतात आणि स्वयंपाकघरात थोडा वेळ एकत्र घालवतात. कारण नंतर दोघांनाही अनेक भूमिका पार पाडायच्या असतात. मला नाही वाटत की अशी जोडपी आपले प्रेम सिद्ध करण्यासाठी कधी महागड्या भेटवस्तूंची देवाणघेवाण करत असतील. ते सामाजिक दबाव, चित्रपट किंवा कादंबऱ्यांमधून निर्माण झालेल्या काल्पनिक रोमान्सचे ओझेही वाहत नाहीत. एक गजरा कदाचित किरकोळ वाटू शकतो, पण विश्वास ठेवा, त्याचा प्रभाव खोल असतो. तो महाग नसतो, पण त्याचा सुगंध बराच काळ टिकतो. ते एकमेकांना हे सांगण्याचे एक साधे माध्यम आहे की ‘मी तुझा विचार करतोय.’ प्रेम कदाचित ‘परफेक्ट’ नसेल, पण ते ‘सुंदर’ नक्कीच असू शकते. फंडा असा की - स्वतःला विचारा अशा कोणत्या लहान-लहान गोष्टी आहेत, ज्या तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी अशा प्रकारे करू शकता, ज्याची त्यांना खरोखर गरज होती.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: सुरक्षेचा मोठा प्रश्न! केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अधिकृत ताफ्याला दुचाकीस्वाराने मारला 'कट'; ३२ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: "ओम नमस्ते गणपतये...!" पुण्यात स्त्रीशक्तीचा अभूतपूर्व जागर; श्रीमंत दगडूशेठ बाप्पासमोर तब्बल ३५ हजार महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण!
- मुंबई: कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते...राज ठाकरेंच्या एकाच वाक्यातील सूचक आणि रहस्यमय पोस्टमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ!
- छत्रपती संभाजीनगर: गणरायाच्या स्वागतावेळी मृत्यूने साधला डाव; कंटेनर थेट मिरवणुकीच्या गर्दीत घुसल्याने २ ठार, पाच वर्षांच्या बालकासह १२ जण जखमी!
महाराष्ट्र
- उल्हासनगर: महापालिकेचा अजब कारभार! पावसाळा संपल्यावर विद्यार्थ्यांना मिळणार रेनकोट आणि शालेय साहित्य; पालकांमध्ये संताप!
- पुणे: फर्ग्युसन रोडवर २१ हजार पाणीपुरीच्या पुऱ्यांपासून साकारला तब्बल १३ फूट उंच देखणा गणपती बाप्पा!
- कोल्हापूर: पोलिसांची भन्नाट क्लिष्ट कामगिरी! एका छोट्या 'फोन पे' ट्रान्झॅक्शन आणि कपड्याच्या तुकड्यामुळे लागला तब्बल ५ लाखांच्या चोरीचा छडा!
- सोलापूर: अचानक प्रकृती बिघडून रक्ताची उलटी झाल्याने २५ वर्षीय महिला पोलीस प्रतीक्षा पाटील यांची मृत्यूशी झुंज अपयशी; पांगरीत शोककळा!
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही





























Subscribe to my channel




