एन. रघुरामन यांचा कॉलम:जोपर्यंत तुमचे कौशल्य फिके पडत नाही, तोपर्यंत स्टेज सोडू नका

दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन हे माझे आवडते अभिनेते आहेत. मला त्यांच्यात जी गोष्ट आवडायची, ती म्हणजे त्यांच्या संवादफेकीची अगदी वेगळी पद्धत. दिलीप कुमार प्रत्येक शब्दानंतर थांबायचे, पण प्रत्येक शब्द एका वेगळ्या जोर आणि भावनेसह यायचा. तो थेट तुमच्या मेंदूत उतरायचा आणि आयुष्यभरासाठी तिथे घर करायचा. दुसरीकडे, अमिताभ बच्चन तोच संवाद न थांबता बोलत. ऐकणाऱ्यालाही क्वचितच कळायचे की त्याच्यावर काय परिणाम झाला, पण एक क्षणानंतर त्याला जाणीव व्हायची की त्याचा परिणाम खूप खोल होता. जोपर्यंत मी छोट्या शहरांमध्ये राहायचो आणि त्यांना फक्त पडद्यावर बघायचो, तोपर्यंत हे दोघे माझी पसंती राहिले. पण जेव्हा मी मुंबईत आलो आणि बॉलिवूड बीट कव्हर करू लागलो, तेव्हा अल्पावधीतच शत्रुघ्न सिन्हाप्रती माझे आकर्षण या दोघांपेक्षाही पुढे गेले. शत्रुघ्न सिन्हाने पडद्यावर केवळ संस्मरणीय भूमिकाच साकारल्या नाहीत, तर वेळेच्या नियोजनाचा विषय येतो तेव्हा ते एक वेगळे खलनायक बनू शकले. फिल्म सेटवर वेळेवर न पोहोचण्यासाठी ते बदनाम होते. पण एकदा पोहोचले की तो याची पूर्ण भरपाई करायचे. ते जास्तीत जास्त एक-दोन टेकमध्येच आपला शॉट द्यायचे. न थांबता, पुन्हा विचार न करता आणि एकही शब्द न विसरता ते संवाद फेकायचे. त्यांची स्मरणशक्ती गजब होती. ते एका बैठकीत स्क्रिप्टची अनेक पाने वाचून पूर्णपणे लक्षात ठेवायचे. इंडस्ट्रीमध्ये प्रत्येकजण त्यांच्या स्मरणशक्तीमुळे थक्क व्हायचा. तेव्हाच मला 1933 मध्ये जन्मलेली 93 वर्षांच्या वेल्सच्या अत्यंत प्रसिद्ध अभिनेत्री डेम सियान फिलिप्सबद्दल माहिती मिळाली, ज्या बीबीसी आणि अन्य चॅनेल्सच्या टीव्ही मालिकांत भूमिका साकारायच्या. त्या 11 वर्षांच्या असल्यापासूनच वेल्श भाषेतील रेडिओ कार्यक्रमांमध्ये परफॉर्म करत होत्या. यानंतर त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ वेल्समध्ये शिक्षण घेतले आणि नंतर रॉयल अ‍ॅकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्टमध्ये स्कॉलरशिप मिळवली. तुमचा विश्वास बसेल का की स्टेज, टीव्ही आणि चित्रपटांमधील त्यांचे करिअर 80 वर्षांहून अधिक काळ राहिले. मी ज्या स्टेज कलाकारांना ओळखतो, त्यापैकी त्या सर्वात चांगल्या होत्या. केवळ अभिनयातच नाही, तर संवाद लक्षात ठेवण्यातही त्या शत्रुघ्न सिन्हांपेक्षा सरस होत्या. एकाच रीडिंगमध्ये त्या संवाद लक्षात ठेवून कोणत्याही चुकीशिवाय बोलायच्या, तेही दिग्दर्शकाला पाहिजे असलेल्या अंदाजात. त्या कोणत्याही प्रॉम्प्ट आणि चुकीशिवाय सलग 15 मिनिटांपर्यंत संवाद बोलू शकायच्या. हीच त्यांची खासियत होती. जवळपास 70 वर्षे थिएटर केल्यानंतर गेल्या आठवड्यात एका रिहर्सलमध्ये जेव्हा त्या मुख्य पात्राची भूमिका साकारत होत्या, तेव्हा त्यांना वाटले की त्यांना संवाद आठवत नाहीयेत. फिलिप्स म्हणतात की, ‘हे अचानक झाले. मला वाटले की हे विचित्र आहे आणि तसे होत नाहीये, जसे सहसा होते.’ दिग्दर्शक अ‍ॅडम पेनफोर्ड हसू लागले, कारण मिस फिलिप्ससोबत असे कधीच झाले नव्हते. यानंतर फिलिप्सने कानात बड लावण्याचा प्रयत्न केला, पण तो काही कारणास्तव बाहेर आला. त्यांनी प्रॉम्प्ट करणाऱ्या मुलीकडे पाहिले, पण फिलिप्स तिचा आवाज ऐकू शकत नव्हत्या. तेव्हा दिग्दर्शक म्हणाला की, ‘आता हे जमणार नाही.’ रिहर्सलमध्ये स्मरणशक्तीसंबंधी समस्या आल्यानंतर तीन दिवसांनंतरच फिलिप्स यांनी स्टेज अ‍ॅक्टिंग करिअरमधून निरोप घेण्याचा निर्णय घेतला. यामुळे मला शिखरावर पोहोचणाऱ्या लोकांबद्दल एक जाणीव झाली की त्यांच्यात अनेक कमकुवतपणा असू शकतात, पण त्यांच्याकडे एक सुपर-स्किलही असते, जी त्यांना इतरांपेक्षा वेगळे बनवते. आणि जेव्हा ते स्किल आपल्या सर्वोच्च शिखरावर असते तेव्हा त्यांना रिप्लेस करणे कठीण असते. म्हणूनच माझे असे मानणे आहे की जोपर्यंत आपली ती सुपर-स्किल फिकी पडू लागत नाही, तोपर्यंत आपण स्टेज सोडायला नको. जर प्रेक्षक आजही हे बघण्याची वाट पाहत असतील की असे काय आहे, जे फक्त आपणच करू शकतो, तर आपण का मागे हटावे? फंडा हा आहे की, जेव्हा तुम्हाला स्टेज सोडायचे आहे तेव्हा नक्की सोडा, पण फक्त यासाठी नाही की तुमचे एक वय झाले आहे. तो तेव्हाच सोडा, जेव्हा तुम्हाला वाटेल की तुमचे कौशल्य आता स्पॉटलाइट योग्य राहिले नाही.

This post was originally published on this site.



महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *