2018 मधील टॉयलेट क्लीनरची प्रसिद्ध जाहिरात आठवा. बॉलीवूड स्टार अक्षय कुमार आपल्या टीव्ही स्क्रीनवर यायचा. टॉयलेट स्वच्छ कसे ठेवावे हे तो सांगायचा. एका चाहत्याच्या घरी जाऊन स्वतःची जाहिरात असलेले उत्पादन घ्यायला लावल्यानंतर ते एक आश्वासन द्यायचा- ‘यांना तर पटले. पुढचे घर तुमचे!’ आपल्यापैकी कित्येकांना वाटले असेल की याच बहाण्याने का होईना अक्षयने आपल्या घरी यावे. पण तो कधीच आला नाही. असो, गंमत बाजूला ठेवूया. भारतात टॉयलेट साफ करणाऱ्या उत्पादनांची जाहिरात करणे ही नेहमीच विचित्र बाब राहिली. त्यांना एक उपयुक्त उत्पादन विकायचे असते, त्याचा प्रत्यक्ष पुरावा दाखवायचा असतो आणि तो संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून पाहावा याची काळजीही घ्यायची असते. टॉयलेट क्लीनर ‘हार्पिक’ बनवणारी कंपनी ‘रेकिट’ने प्रेक्षकांना न दुखावता, बाथरूमला मुख्य प्रवाहातील पडद्यावर आणण्यात यश मिळवले. 2018 मध्ये हार्पिकने स्वच्छतेच्या मोहिमेसाठी अक्षय कुमारला ब्रँड ॲम्बेसेडर केले. कंपनीने त्याला आपले ‘हर घर स्वच्छ’ मिशनशी आणि स्वच्छतेच्या सवयी बदलण्याच्या संदेशाशी जोडले. याच 2018 मध्ये सर्बियाचा मॉडेल लाझार जानकोव्हिच मॉडेलिंग आणि कमर्शियल करारासाठी भारतात आला. लोकांच्या स्वच्छतेच्या सवयी बदलतील म्हणून त्याने तब्बल सहा वर्षे वाट पाहिली. पण तसे काही झाले नाही. 20 राज्यांच्या प्रवासात त्याने एक मोठी समस्या पाहिली. त्याकडे दुर्लक्ष करणे कठीण होते- रस्त्यावर पसरलेला कचरा. 2024 मध्ये वयाच्या 31 व्या वर्षी लाझारने ‘4CleanIndia’ मोहीम सुरू केली. तो स्वतःसोबत कचऱ्याच्या पिशव्या ठेवायचा. ऋषिकेशपासून ते तामिळनाडू व सिक्कीमपर्यंत प्रत्येक ठिकाणी छोटी-छोटी सफाई करायचा. एखाद्या जागेची सफाई करून त्याचा व्हिडिओ पोस्ट करणे पुरेसे नाही हे त्याला लवकरच समजले. त्याने आपल्या प्रयत्नांना सोशल मीडिया चॅलेंजमध्ये बदलले आणि लोकांना आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यासाठी प्रोत्साहन देऊ लागला. आता त्याच्या पेजशी सुमारे 1.5 लाख लोक जोडले गेले आहेत आणि ते स्वतःच्या सफाई मोहिमांचे फोटो शेअर करत आहेत. बेंगळुरूमध्ये त्याने जयनगर, जेपीनगर, चर्च स्ट्रीट आणि कब्बन पार्कच्या आसपासच्या अशा 10 ठिकाणांची सफाई केली. गुरुग्रामच्या सेक्टर 55 मध्ये लाझारला रस्ते साफ करताना पाहून तेथील रहिवाशांनी परिसराच्या देखभालीसाठी व्हॉट्सॲप ग्रुप बनवले. ते म्हणतात, ‘एका परदेशी व्यक्तीला आपले रस्ते साफ करताना पाहून आम्हाला लाज वाटली.’ लाझारची पद्धत काही नवीन नाही. राजस्थानमधील एका सरकारी कर्मचारी प्रमिला यांनी हातात झाडू घेऊन गावकऱ्यांना मदतीला घेतले आणि आपल्या गावात टॉयलेटची सुविधा 25% वरून 100% वर नेली. राजस्थानच्या अलवरमध्ये राजेंद्र सिंह यांनी गावकऱ्यांच्या मदतीने पारंपरिक जलसंधारण संस्थांना नवसंजीवनी दिली. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागात नद्या आणि भूजल परत आणण्यास मदत झाली. चंद्रपूर जिल्ह्यातील सातारा तुकूमचे रहिवासी तर पालिकेच्या कर्मचाऱ्यांशिवाय आपले गाव स्वच्छ ठेवतात. ते आपल्या गल्लीची सामूहिक जबाबदारी घेतात. हा परिसर स्वतःची अभूतपूर्व स्वच्छता, समुदाय शिस्त आणि जंगल संवर्धनाच्या प्रयत्नांसाठी प्रसिद्ध आहे. लाझारबद्दल मला आवडलेली गोष्ट म्हणजे स्वच्छता मोहिमांमध्ये ‘ज्ञानापेक्षा’ भावनेची जास्त गरज असते असे त्याला वाटते. सफाईला एखादे भाषण बनवण्याऐवजी, एक आनंददायी उपक्रम बनवावे, कदाचित एखाद्या ‘डांस’सारखे; जेणेकरून लोकांना त्यात सहभागी व्हावेसे वाटेल, असा त्याचा सल्ला आहे. या विचारासह तो फक्त रस्ते साफ करत नाहीये, तर लोकांचा सार्वजनिक ठिकाणांकडे बघण्याचा दृष्टिकोनच तो बदलत आहे.आपण भारतीय स्वच्छतेचे महत्त्व चांगल्या प्रकारे समजतो. आपण आपली घरे नक्कीच स्वच्छ ठेवतो. आपल्याला फक्त याच मानसिकतेने घराच्या थोडे बाहेर पाऊल टाकायचे आहे, जेणेकरून आपले शहरही स्वच्छ राहील. फंडा हा आहे की, एखादी ‘दुसरी’ व्यक्ती बदल घडवण्याचा निर्णय घेते तेव्हा आपल्या आसपासचा परिसर बदलत नाही. पण आपण हा परिसर ‘आपला’ मानतो तेव्हाच तो सुंदर बनतो.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: एसटीचा मोठा निर्णय! महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून NCMC कार्ड अनिवार्य
- नाशिक: महागाईचं विघ्न! आंतरराष्ट्रीय युद्ध अन् एफडीएच्या कारवाईमुळे गणेशमूर्तींच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ
- पुणे: मी केवळ एक आमदार, सरकारचा भाग नाही मराठा आरक्षण आणि संवादावर सुधीर मुनगंटीवार यांचे स्पष्टीकरण
- पुणे: राहुल गांधींच्या पुण्यातील 'छात्रों की गूंज' कार्यक्रमावर मुख्यमंत्र्यांचा कडाडून प्रहार; पूर्वनियोजित वाद आणि इन्फ्लुएन्सर्सना पैसे दिल्याचा गंभीर आरोप
महाराष्ट्र
- मुंबई: एसटीचा मोठा निर्णय! महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून NCMC कार्ड अनिवार्य
- नाशिक: महागाईचं विघ्न! आंतरराष्ट्रीय युद्ध अन् एफडीएच्या कारवाईमुळे गणेशमूर्तींच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ
- पुणे: मी केवळ एक आमदार, सरकारचा भाग नाही मराठा आरक्षण आणि संवादावर सुधीर मुनगंटीवार यांचे स्पष्टीकरण
- पुणे: राहुल गांधींच्या पुण्यातील 'छात्रों की गूंज' कार्यक्रमावर मुख्यमंत्र्यांचा कडाडून प्रहार; पूर्वनियोजित वाद आणि इन्फ्लुएन्सर्सना पैसे दिल्याचा गंभीर आरोप
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तर प्रदेश: कौशांबीत पटाखा कारखान्यात भीषण स्फोट; महिला व बालकांसह ७ ते ८ जणांचा मृत्यू, परिसर हादरला
- नवी दिल्ली: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या रॅलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार; सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे निरीक्षण
- चेन्नई: २०२९ला राहुल गांधीच पंतप्रधान, विजय यांनी समर्थन न दिल्यास मंत्रिपदाचे राजीनामे देऊ ;काँग्रेसचा तामिळनाडू सरकारला थेट इशारा
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल

























Subscribe to my channel




