मैत्रीच्या नावाला काळीमा फासणारी एक भयानक घटना घडली आहे. आपल्या मित्राच्या नावावर 2 कोटी रुपयांच्या विमा पॉलिसीची रक्कम हडपण्यासाठी दोन तरुणांनी त्याच्या हत्येचा कट आखला. या प्रकरणात पोलिसांनी कट्टा साई दीपक आणि कोंडा भानु प्रकाश या दोघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे, आरोपींपैकी एक खासगी बँकेत सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतो.
मावशीच्या शंकेमुळे उघडकीस आला खरा प्रकार
१४ फेब्रुवारी २०२६ च्या रात्री तेलंगणातील भद्रादी कोठागुडेम जिल्ह्यात मोठे गावाजवळ कट्टा यशवंत नावाचा तरुण रस्त्याच्या कडेला गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात सापडला. सुरुवातीला हा रस्ता अपघात असल्याचे वाटले होते. यशवंतला तात्काळ भद्राचलमच्या शासकीय रुग्णालयात आणि नंतर प्रकृती अधिक बिकट झाल्याने खम्मम येथील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, यशवंतच्या मावशीने हा अपघात नसून घातपात असल्याची शंका व्यक्त करून पोलिसांत तक्रार दाखल केली. यामुळे तपासाला वेगळे वळण मिळाले.
दारू पाजून केला हल्ला
अपघाताचा बनावट कट रचला पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासा झाला. आरोपींनी नोव्हेंबर २०२५ मध्ये यशवंतच्या नावाने २ कोटी रुपयांची विमा पॉलिसी काढली होती. या पॉलिसीमध्ये साई दीपकला नॉमिनी (वारसदार) करण्यात आले होते. नॉमिनी होण्यासाठी दीपकने स्वतःला यशवंतचा नातेवाईक असल्याचे बनावट दाखवले होते.
14 फेब्रुवारीच्या रात्री दोघांनी कटानुसार यशवंतला मोठे गावाजवळ नेले. तेथे त्याला भरपूर दारू पाजली आणि स्कूटरवर बसण्याचा प्रयत्न करत असताना मागून लोखंडी रॉडने डोक्यावर जोरदार वार केला. हा खून नसून अपघात वाटावा म्हणून आरोपींनी यशवंतची दुचाकी रस्त्याखाली फेकली आणि त्याला तेथेच सोडून पळ काढला.
सुदैवाने जीव वाचला; आरोपींनी कबूल केला गुन्हा
सुदैवाने यशवंतचा जीव वाचला आणि तो सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. मंगळवारी (१७ फेब्रुवारी २०२६) सायंकाळी पोलिसांनी दोन्ही आरोपींना कारसह ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्हा कबूल केला असून, विम्याची रक्कम मिळवण्यासाठीच हा कट रचल्याचे सांगितले. सध्या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून, पोलिस अधिक पुरावे गोळा करत आहेत. ही घटना मैत्रीच्या नावाने केलेल्या विश्वासघाताची आणि लोभापोटी केलेल्या क्रूरतेची थेट आठवण करून देते. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



