साप हा निसर्ग साखळीमधील एक महत्त्वाचा घटक आहे, सापांमुळे उंदरांची संख्या नियंत्रणात राहून धान्याची नासाडी मोठ्या प्रमाणात कमी होते, सापाला शेतकऱ्यांचा मित्र देखील म्हटलं जातं. जर निसर्गात सापांची संख्या कमी झाली तर दुसरीकडे उंदरांची संख्या वाढते, त्यामुळे निसर्गात असमतोल तयार होतो. त्यामुळे साप न मारण्याचा सल्ला दिला जातो. भारतामध्ये सापांच्या हजारो प्रकारच्या प्रजाती आढळून येतात, मात्र त्यातील केवळ हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच विषारी आहेत, त्यामध्ये घोणस, फुरसे, मण्यार, आणि ज्याला आपण नाग म्हणतो तो कोबरा या चार प्रमुख जातींचा समावेश होतो. सापांच्या अनेक प्रजाती या विषारी नसल्यामुळे त्या मानवास फार घातक नसतात. मात्र साप कोणताही असो त्याला पूर्ण माहितीशिवाय थेट पकडू नये, किंवा त्याला मारू नये, त्याची माहिती सर्पमित्रांना द्यावी, सर्पमित्र या सापांना निसर्गात मुक्त करतात.
भारतामध्ये आढळणारे अनेक साप हे विषारी नाहीत ही गोष्ट जरी खरी असली तर देखील साप घरात दिसताच भीती वाटते. एवढंच नाही तर अनेकदा विषारी साप देखील घरात शिरू शकतो. घोणस प्रजातीचा जो साप आहे, हा साप अत्यंत विषारी आहे, आणि याची प्रजनन क्षमता चांगली असल्यामुळे सध्या या जातीच्या सापांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हा साप अनेकदा घरांमध्ये आढळून येते, हा साप प्रचंड विषारी असल्यामुळे या सापाच्या दंशामुळे व्यक्ती दगावण्याची देखील शक्यता असते, हा साप प्रचंड आक्रमक असतो. त्याच प्रमाणे अनेकदा घोणस सोबतच नाग आणि मण्यार जातीचे विषारी साप देखील घराच्या आसपास किंवा घरात आढळून येतात. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये योग्य काळजी घेणं हाच एकमेव त्यावर उपाय आहे.
मात्र अशी देखील काही झाडं असतात ज्याचा वास हा सापांना सहन होत नाही, ज्या घरात किंवा घराच्या परिसरात ही झाडं असतात त्या घरात साप कधीही प्रवेश करत नाही, अशाच एका झाडाबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत, ज्याच्या वासामुळे साप घरातच काय त्या परिसरात सुद्धा प्रवेश करत नाही. झारखंडमध्ये दुर्गम भागात राहणारे आदिवासी हे झाड कायम आपल्या घराच्या समोर किंवा आजूबाजूला लावतात. घोडबंच असं या झाडाचं नाव आहे. हा जंगलाचा भाग आहे, इथे साप दिसणं ही सर्वसामान्य बाब आहे. मात्र जर तुमच्या घरासमोर घोडबंच लावलेलं असेल तर साप घरात प्रवेश करत नाही, असा दावा येथील लोकांनी एका वेबसाईटशी बोलताना केला आहे, त्यामुळे सापांना घरापासून दूर ठेवण्यास या झाडाची तुम्हाला मदत होऊ शकते.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




