पूर्वी भारतीय बाजारपेठ स्वतःमध्येच बंदिस्त आणिएकाकी असायची, पण आता ती जागतिक व्यापाराचीप्रणेती बनत चालली आहे. भारतीय बाजारपेठेचे हेपरिवर्तन कदाचित 21 व्या शतकातील जागतिकअर्थव्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचा संरचनात्मक बदलआहे. देशाने बंदिस्त, बचावात्मक आर्थिक भूमिका सोडूनबाह्य जगाकडे लक्ष ठेवणारा, जागतिक स्तरावर आक्रमकदृष्टिकोन स्वीकारला आहे. जो देश कधीकाळीजागतिकीकरणात संकोचाने सहभागी होत असे, तो आताजागतिक पुरवठा साखळीला आकार देणारी एकआत्मविश्वासपूर्ण शक्ती बनला आहे. अनेक दशके भारतीय बाजारपेठ‘लायसन्स-परमिट-कोटा राज’ म्हणून ओळखली जातहोती. ही नोकरशाहीची पकड आणि प्रचंड करांचीगुदमरून टाकणारी व्यवस्था होती, जी देशांतर्गत उद्योगांना परदेशी भांडवलाच्या कथित शोषणापासून वाचवण्यासाठी तयार केली गेली होती. स्वातंत्र्योत्तर काळातील बहुतांशकाळ भारताची आर्थिक रणनीती आत्मनिर्भरता, आयातपर्याय आणि जागतिक बाजारपेठेबद्दलची तीव्र शंका यावर आधारित होती. या दृष्टिकोनामुळे तांत्रिक साचलेपणा आणि भारताचीआर्थिक क्षमता व तिची कामगिरी यातील सातत्यानेवाढणारी दरी निर्माण झाली. अर्थतज्ज्ञ राज कृष्ण यांनी तरयाला ‘हिंदू विकास दर’ असे नाव दिले होते. आपलीअर्थव्यवस्था लोकसंख्या वाढ आणि वाढत्या गरजांशीजुळवून घेण्यासाठी सतत संघर्ष करत राहिली. 1991 च्या उदारीकरणाने या परिवर्तनाची सुरुवात केली.भारताने जागतिक अर्थव्यवस्थेपासून स्वतःचा बचावकरण्याऐवजी त्यात हिरिरीने भाग घेण्यापर्यंत आणि त्यातस्पर्धा करण्यापर्यंत मजल मारली. हा बदल आर्थिकदृष्ट्याजेवढा महत्त्वाचा होता, तेवढेच त्याचे मानसिक महत्त्वहीहोते. खुलेपणाच्या शक्यतांचा स्वीकार करण्यासाठीभारताला आपली चिंता, असुरक्षिततेची भावना सोडूनद्यावी लागली. काळानुसार, जागतिक व्यापार,भांडवलाचा ओघ, तंत्रज्ञान नेटवर्कमधीलएकत्रीकरणामुळे विकासाचा वेग, शहरीकरणाचाआकृतीबंध, उद्योजकीय संस्कृतीला नवा आकारमिळाला. पण ही कथा इथेच संपत नाही. 2026 च्या भारतानेआपल्या बेड्या तोडून जगातील सर्वात खुली आणिउदारीकृत उदयोन्मुख अर्थव्यवस्था बनण्याचा मानमिळवला आहे. हे परिवर्तन एका मूलभूत अंतर्दृष्टीतूननिर्माण झाले आहे आणि ती म्हणजे, एका डिजिटलीकृतजगात खरे आर्थिक सार्वभौमत्व एकाकी राहण्यातून नाही,तर जोडले जाण्यातून मिळते. 1991 च्या सुरुवातीच्यासुधारणांनी दरवाजे उघडण्यास सुरुवात केली होती, तरभारताने गेल्या काही वर्षांत हे अडथळे दूर केले आहेत. आता भारत केवळ एक किरकोळ खेळाडू राहिलानसून, जागतिक आर्थिक प्रवाहात तो केंद्रस्थानी आहे.सेवांची निर्यात, डिजिटल क्षमता आणि उत्पादनातीलमहत्त्वाकांक्षा यामुळे आपण स्वतःला अशा देशाच्या रूपातप्रस्थापित केले आहे, ज्याचे आर्थिक निर्णय आपल्यासीमेपलीकडेही दूरवर परिणाम करतात. बहुपक्षीय मंचांवरभारताने यूएई, ओमान, ऑस्ट्रेलिया, यूके आणि ईयू(युरोपियन युनियन) यांच्यासोबत ऐतिहासिक व्यापकआर्थिक भागीदारी करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.याशिवाय, न्यूझीलंड आणि अमेरिका या दोन्ही देशांनीतत्त्वतः करारांची घोषणा केली आहे. या बदलाच्यामुळाशी भारत सरकारच्या ‘आत्मनिर्भरता’ या मंत्राची एकसूक्ष्म फेरव्याख्या देखील आहे. भारताच्या नेत्यांना आतासमजले आहे की, आत्मनिर्भरता इतरांपासून वेगळे राहूननव्हे, तर जागतिक स्तरावर जोडले जाऊनही साध्य करतायेऊ शकते. भारत आता परदेशी भांडवलाला घाबरत नाहीआणि पूर्व आशियातील पारंपरिक उत्पादन केंद्रांना प्रमुखपर्याय म्हणून तो अत्यंत उत्सुकतेने स्पर्धा करत आहे. अशाप्रकारे, भारताच्या या खुलेपणाला आताधोरणात्मक महत्त्व प्राप्त झाले आहे. जे कधीकाळीदेशांतर्गत सुधारणांचे उद्दिष्ट वाटत होते, ती आता एकजागतिक संधी बनली आहे. उदयोन्मुख डिजिटलसार्वजनिक पायाभूत सुविधा आणि नवीन व्यापार करारयातील समन्वय अशा भविष्याकडे निर्देश करतो, जिथेभारत केवळ वस्तूंचीच नव्हे, तर जगाच्या डिजिटलआर्किटेक्चरचीही निर्यात करेल. एक मोठी, स्थिरलोकशाही, तरुण मनुष्यबळ, सुधारत असलेल्या पायाभूतसुविधा आणि अधिक पारदर्शकतेकडे वाटचाल करणारेनियामक वातावरण यांचा संगम- भारताला केवळ चीनलापर्याय बनवत नाही, तर बहुध्रुवीय पुरवठा-साखळीच्यासंरचनेत एक महत्त्वाचे केंद्रही बनवतो.
(@प्रोजेक्ट सिंडिकेट) विदेशी भांडवलाला विरोध व ते आकर्षितकरण्यापर्यंत; देशांतर्गत अक्षमतेपासून तेजागतिक स्पर्धात्मकतेपर्यंत- आपलाप्रवास स्पष्ट आहे. भारत आता जागतिकव्यवस्थेत मूकदर्शक राहिला नाही, तरआपल्या भविष्याचा निर्माता बनला आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: पासपोर्ट अर्जदारांसाठी सुवर्णसंधी ८ जुलैला प्रादेशिक कार्यालयात विशेष जनसंवाद सत्र
- रत्नागिरी: रत्नागिरी विमानतळावरून तीन महिन्यांत पहिले उड्डाण होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा
- नागपूर: संशयाच्या जाळ्यात उद्ध्वस्त झाली दोन कुटुंबे! दोन्ही प्रकरणांतील आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात
- पुणे: मंचरमध्ये बनावट दुधाचा गोरखधंदा उघड; १३ जणांना अटक, २६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- पुणे: पासपोर्ट अर्जदारांसाठी सुवर्णसंधी ८ जुलैला प्रादेशिक कार्यालयात विशेष जनसंवाद सत्र
- रत्नागिरी: रत्नागिरी विमानतळावरून तीन महिन्यांत पहिले उड्डाण होणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा
- नागपूर: संशयाच्या जाळ्यात उद्ध्वस्त झाली दोन कुटुंबे! दोन्ही प्रकरणांतील आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात
- एलपीजी गॅस सिलिंडरची चिंता मिटणार! ऊर्जा सुरक्षेसाठी भारताचा मोठा निर्णय; आखाती देशांवरील अवलंबित्व घटणार!
गुन्हा
- पुणे: शिक्रापूरमध्ये माजी महिला सरपंचाच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोरट्यांनी हिसकावले
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून पत्नीने पतीला जिवंत जाळले; पोलीस तपासात धक्कादायक कबुली!
- थरारक! कर्जात बुडालेल्या कॉलेज विद्यार्थ्याने लुटून विहिरीत ढकलले; दोरीला धरून ५५ वर्षीय महिलेचा विहिरीत २१ तासांचा मृत्यूशी संघर्ष! अखेर चमत्कारीक बचाव
- सरपंचपदासाठी काय पण! मराठा असूनही मिळवले 'पारधी' जातीचे बोगस प्रमाणपत्र; बीड जिल्हा जात पडताळणी समितीने दाखला ठरवला रद्द!
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- दैनिक राशिभविष्य: आज या राशींचे नशीब फळफळणार; आर्थिक प्रगती आणि नोकरीत बढतीचे योग!
- मराठवाड्यात जुलैच्या सुरुवातीलाही पावसाची ओढ! पहिल्या आठवड्यात केवळ २३.२ मिमी पाऊस; धरणे कोरडी, पेरण्या रखडल्याने बळीराजा हवालदिल!
- धाराशिवच्या जमिनीचा पोत खालावला! मृद आरोग्य पत्रिकेच्या अहवालात 'नत्र' कमतरतेची गंभीर नोंद; खरिपासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याचे आवाहन.
- शनीच्या दृष्टीचा राशींवर होणार परिणाम, जाणून घ्या ४ जुलै २०२६ चा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
देश विदेश
- एलपीजी गॅस सिलिंडरची चिंता मिटणार! ऊर्जा सुरक्षेसाठी भारताचा मोठा निर्णय; आखाती देशांवरील अवलंबित्व घटणार!
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून पत्नीने पतीला जिवंत जाळले; पोलीस तपासात धक्कादायक कबुली!
- फिफा विश्वचषक २०२६ मध्ये थरार! बेलिंगहॅम चमकला, १० खेळाडूंसह खेळणाऱ्या इंग्लंडने मेक्सिकोला नमवून गाठली उपांत्यपूर्व फेरी
- पाशवी कृत्य! दारुड्या पतीने पत्नीला जिवंत जाळले, अपघाताचा बनाव रचला; फतेहपूर पोलिसांच्या तपासात अखेर सत्य उघड!


























Subscribe to my channel

