नवीन कामगार कायदा सुधारणांनी महिलांना रात्रीच्याशिफ्टमध्ये काम करण्याची परवानगी दिली आहे. पण खराप्रश्न हा नाही की महिला रात्री काम करू शकतात कीनाही. खरा प्रश्न हा आहे की, आता आपण त्यांना कामकरताना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी घेण्यास तयारआहोत का? कारण सुरक्षा जर केवळ महिलांच्या धैर्यावरसोडली, तर या सुधारणा अपयशी ठरतील. सुरक्षेचे उपाय म्हणजे केवळ घोषणा किंवा कार्यालयीनपरिपत्रके असू शकत नाहीत. ते व्यावहारिक, अमलातआणण्यायोग्य आणि तडजोड न करणारे असावेत. खऱ्यासुरक्षेचा अर्थ म्हणजे अनिवार्य एस्कॉर्ट धोरणे- जी पर्यायीनसतील किंवा मागणी केल्यावर दिली जाणारी नसतील,तर ती अनिवार्य असावीत. याचा अर्थ असाही आहे की, घराच्या दरवाजापर्यंत सुरक्षित वाहतूक व्यवस्था. यामध्ये पडताळणी केलेले चालक, जीपीएसद्वारे मागोवा घेतायेणारी वाहने, बदलणारे मार्ग, प्रकाशमान पार्किंग क्षेत्रआणि बाहेर पडण्याचा मार्ग यांचा समावेश असावा. पॅनिक-बटण हे केवळ शोभेचे नसावेत. तर ते थेट पोलिस आणि अंतर्गत प्रतिसाद पथकांशी जोडलेले असावेत. आपत्कालीन ॲप्स केवळ महानगरांच्या सादरीकरणापुरते मर्यादित राहू नयेत; ते सर्वत्र काम करतील याची काळजीघेतली पाहिजे. तक्रार निवारण अधिकारी २४x७ उपलब्धअसावेत, सुरक्षा समित्यांत महिलांना स्थान असावे. सर्वात महत्त्वाची गोष्ट- जबाबदारी स्पष्ट असावी. जरएखाद्या महिला कर्मचाऱ्याला काही इजा झाली, तर कंपनीकिंवा संस्था केवळ ‘चिंता’ व्यक्त करून मोकळा होऊशकत नाही. त्याची जबाबदारी निश्चित केली पाहिजे.कारण वास्तव हेच आहे की, रात्रीच्या शिफ्टमध्ये कामकरणाऱ्या महिलेला एक्सेल शीटची भीती वाटत नाही,तिला भीती वाटते ती प्रवासाची. वाहनांच्या प्रतीक्षेची.मदतीसाठी साद घातल्यानंतर पसरणाऱ्या शांततेची. परंतु सुरक्षा हा चित्राचा फक्त एक भाग आहे. नोकरीकरणाऱ्या महिलांना परवडणाऱ्या बालसंगोपन केंद्रांचीहीगरज आहे, जेणेकरून मातृत्व ही त्यांच्या करिअरचा अंतकरणारी घटना ठरणार नाही. लवचिक कार्य-नमुने(वर्क-मॉडेल) हे अपराधीपणाने भरलेले अपवाद नसून,ती एक सामान्य व्यवस्था असायला हवी. महिलांसाठीनोकऱ्या हे केवळ उदरनिर्वाहाचे नाही, तर ते आर्थिकसुरक्षेचेही साधन आहे. निर्णय प्रक्रियेत महिलांचीउपस्थिती अनिवार्य आहे, कारण ज्या शहरांची, वाहतूकव्यवस्थांची आणि कार्यालयांची रचना महिलांशिवायकेली जाते, ती कधीही त्यांना सुरक्षित वाटू शकत नाहीत.हा महिलांना रात्री कामासाठी भाग पाडण्याचा प्रश्न नाही,तर महिलांना वास्तविक पर्याय देण्याचा प्रश्न आहे. असेपर्याय, ज्यांना चांगल्या पायाभूत सुविधा, कायद्यांची कडकअंमलबजावणी आणि मानवी प्रतिष्ठेचे पाठबळ असेल. महिलांची सुरक्षा हा एक आर्थिक मुद्दादेखील आहे.जेव्हा महिलांना असुरक्षित वाटते, तेव्हा त्या काम करणेथांबवतात किंवा त्यातून बाहेर पडतात. परिणामी कुटुंबाचेउत्पन्न घटते आणि जेव्हा कुटुंबाचे उत्पन्न घटते, तेव्हाअर्थव्यवस्थेचे नुकसान होते. कार्यशक्तीचा अर्धा भागविकासात सहभागी करून घेतल्याशिवाय भारत ५ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनू शकत नाही. हे २०२६ साल आहे आणि आजही भारतीय महिलांपैकीकेवळ एक तृतीयांश महिला श्रमशक्तीमध्ये सहभागीहोतात, पुरुषांचे प्रमाण सुमारे तीन चतुर्थांश आहे. या एकतृतीयांश नोकरी करणाऱ्या महिलांचा मोठा भागदेखीलअनौपचारिक आणि असुरक्षित नोकऱ्यांमध्ये आहे आणिआर्थिक संकटाच्या वेळी सर्वात आधी त्यांनाच फटकाबसतो. पदवीधरांमध्ये महिलांचा वाटा ५१% असूनही- एकाअभ्यासानुसार- भारतात सुरुवातीच्या स्तरावरीलभूमिकांमध्ये त्यांचे प्रमाण केवळ २९% आहे. वरिष्ठव्यवस्थापनात ही संख्या घसरून ९% वर येते आणिसीईओ स्तरावर तर हे प्रमाण १% पेक्षाही कमी आहे. वर्ल्डइकॉनॉमिक फोरमने लिंग समानतेच्या बाबतीत १५३देशांमध्ये भारताला ११२ वे स्थान दिले आहे. ही परिस्थितीबदलली पाहिजे. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) दीर्घकाळापासून आपण महिलांच्यारोजगाराचा प्रश्न निर्बंधांद्वारे सोडवतआलो आहोत- जसे की, उशिरापर्यंत कामकरू नका, लांब कामाला जाऊ नका,जोखीम घेऊ नका. नवीन कामगार कायदासुधारणा ही स्थिती बदलतात.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- कोल्हापुरात संतापजनक प्रकार! लॉजवर बोलावून सुरू होते बेकायदेशीर गर्भलिंग निदान; पोलिसांचा छापा पडताच तोतया डॉक्टर मशीन घेऊन पसार, महिला व एजंट ताब्यात"
- राष्टकुल खेळ २०२६: महाराष्ट्राच्या तेजस शिर्सेची ऐतिहासिक कामगिरी; पुरुष 110 मीटर हर्डल्सच्या अंतिम फेरीत धडक, भारताला पदकाची मोठी आशा"
- हुडकेश्वर पोलिस ठाण्यातून कुख्यात चोर फरार; शौचालयाच्या बहाण्याने पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून आरोपी पसार, खात्यात एकच खळबळ"
- महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य! महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात राबवणार १० कलमी राष्ट्रीय कृती आराखडा; राष्ट्रीय महिला आयोगाची मोठी घोषणा"
महाराष्ट्र
- नांदेड शहरात तासभर कोसळला मुसळधार पाऊस; मराठवाड्यातील इतर भागांत हलक्या सरी आणि रिमझिम"
- लातूर: स्मार्ट मीटर काढा आणि जुने मीटर पूर्ववत बसवा; महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात आणि स्मार्ट वीज मीटरच्या सक्तीविरुद्ध नागरिकांचा संताप व तीव्र आंदोलन
- कोल्हापुरात संतापजनक प्रकार! लॉजवर बोलावून सुरू होते बेकायदेशीर गर्भलिंग निदान; पोलिसांचा छापा पडताच तोतया डॉक्टर मशीन घेऊन पसार, महिला व एजंट ताब्यात"
- कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाचा अजब कारभार; विद्यार्थ्यांच्या कष्टाच्या पैशातून भरला कर्मचाऱ्यांचा आयकर दंड, शैक्षणिक वर्तुळात तीव्र संताप
गुन्हा
- बीड: आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथे १९ वर्षीय युवकाने संपवले जीवन, सकाळी गायरानात आढळला मृतदेह
- बंगळुरू: पतीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून बाळंतीणीने संपवले जीवन, मृतदेहाशेजारीच शांत झोपलेला होता ७ महिन्यांचा चिमुकला
- मुंबईत सायबर गुन्हेगारीचा मोठा धक्का! दिल्ली पोलिसांच्या नावे आभासी अटकेत ठेवून वृद्ध व्यावसायिकाची तब्बल आठ कोटी रुपयांची फसवणूक"
- चंद्रपुर: हॉटेलमध्ये घुसून एमआयएमच्या एकमेव नगरसेवकावर १५ ते १६ जणांकडून प्राणघातक हल्ला, राजकीय वर्तुळात चिंता
राजकीय
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
इतर
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- चंदीगड: ट्यूशन घेणाऱ्या पत्नीचे २० वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत अफेअर, पतीने रंगेहाथ पकडल्यानंतर उचलले टोकाचे पाऊल
- नवी दिल्ली: झारखंड हायकोर्टाचा मोठा निर्णय: रात्री २ वाजता बायकोने काजळ-लिपस्टिक लावले म्हणजे ती मानसिक रोगी ठरत नाही
- नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- 'हा लोकशाहीचा विजय'
- नवी दिल्ली: 'आताची पिढी प्रश्न विचारतेय, ऐकून घ्यायला हवं'; CJP आंदोलनावर सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य



























Subscribe to my channel



