अगदी लहानपणापासून काही मोजक्या जागा अशा आहेत, ज्या मला नेहमीच भारी वाटतात. तिथं जाणं येणं आनंदाचा भाग असतो. मग ते मामाच्या गावाला जायचो तिथलं महादेवाचं खूप जुनं मंदिर आणि तिथल्या चिंचेच्या झाडाला बांधलेला झोका असो किंवा अगदी घराजवळची भाजी मंडई. घरापासून अगदी चालत चालत जावं इतक्या जवळ! अगदी सुरुवातीलाच भरपूर फळांचे गाडे, थोडं पुढे मोठं पिंपळाच झाड आणि त्याच्याभोवती पार. त्या पारावर छोटंसं हनुमानाचं मंदिर. तिथून थोडं पुढे विड्याची पानं, सुपारी, फुलं असं पूजेचं साहित्य घेऊन बसलेली मंडळी. तिथून पुढे कुठे फळभाज्यांचे गाडे लावत असलेले काका, कुठे ओट्यावर हिरव्यागार भाज्यांवर पाणी शिंपडणार्या आजी. कुणी वजनाकरता वाद करतंय, कुणी हिशेब करतंय, कुणी घासाघीस करतंय, असे कितीतरी वेगवेगळे संवाद एकाच वेळी सुरू असायचे. शिवाय ग्राहकांना बोलवण्यासाठी एक सारखा ऐकू येणारा तारसप्तकामधला आवाज. तिथं फिरताना जाणवत राहणारा, मातीत मिसळलेला पाण्याचा, भाज्यांचा तो एक वेगळाच गंध! आठवतं तेव्हापासून कधी आईसोबत, आजीसोबत तर कधी बाबांसोबत भाजी आणायला गेले आहे, पण प्रत्येकासोबतचा अनुभव मात्र वेगळा असायचा. आजीसोबत गेले की, मला तिची पैसे ठेवायची छोटी पर्स देऊन टाकायची. मग जिथे भाजी घ्यायचो, तिथे मी बरोबर मोजून नोटा द्यायचे. सॉलिड वाटायचं. शिवाय येताना हमखास समोरच्या विष्णू मंदिरात किंवा थोडं पुढे दत्त मंदिरात घेऊन जायचे. मला हे रुटीन मोडलेलं अजिबात आवडायचं नाही. आजीसोबतची मंडईची भटकंती, ही मंदिरात न जाता पूर्ण व्हायचीच नाही! आईसोबत भाजी आणायला गेले की आधी तिच्या ठरलेल्या एका भाजीवाल्या मावशींकडे जायचो. त्या छान ओळखीचं हसायच्या. भाज्यांचे दर आईला पक्के माहीत असायचे, त्यामुळे थोडीफार घासाघीस व्हायचीच. तरीही, आई दरवेळी त्याच मावशींकडे भाजी घ्यायची आणि त्याही दरवेळी तेवढं आणि तसंच हसायच्या, बोलायच्या. मला आपलं छोट्या पिशव्या घेऊन मागे फिरायचं, इतकंच काम! थोडी मोठी झाले तशी आई मला बाबांसोबत भाजी आणायला पाठवायला लागली, पिशवीत यादी देऊन. बाबांना सगळं मार्केट फिरून यायला आवडायचं त्यामुळे त्यांच्यासोबत पार दुसऱ्या टोकापर्यंत चक्कर व्हायची. ते अगदी एखादा रुपयाही कमी न करता भाज्या घेऊन टाकायचे! संध्याकाळ होताना कधी गेलोच मार्केटला तर दिवसभर भाज्या न विकला गेलेला कुणी असेल तिथूनच भाजी घ्यायचे. माझं काम फक्त सगळी यादी घेतली आहे, हे पाहणे इतकंच असायचं. आता हे सगळं एकदम आठवलं, ते आज भाजी आणायला गेले तेव्हा. लग्नानंतर या भाजी मंडईत जाण्याच्या अनुभवात नवऱ्यासोबत भाजी घेण्याचा नवा अनुभव जोडला गेला. नजीकच्या दिवसातले काही विशेष प्रसंग, फ्रिजमधल्या उरलेल्या गोष्टी, खावेसे वाटणारे पदार्थ आणि दोघांच्या आवडीनिवडी या सगळ्याचा लसावी काढून मग भाजी घ्यायची! सुरुवातीला ही कसरत आम्ही ऑनलाइन करत असू, पण त्यामध्ये काही गंमतच नव्हती. अशातच आता घरापाशी शेतकऱ्यांकडूनच एक मंडई सुरू झाली असं कळलं आणि तिथे जाणं झालं. पालक, मुळा, लाल माठ, शेवगा, घेवडा किती नि काय काय! सगळी भाजी खरेदी करता करता उद्या काय करूया, ही भाजी लिंबू पिळून कशी लागते इथंपासून ते कवळी भेंडी कशी ओळखावी, किडका टोमॅटो, किडलेलं वांग कसं ओळखावं, अशा किती तरी गप्पा सुरू होत्या. त्या सगळ्यात भरलेल्या पिशव्या घेऊन आम्ही घराकडे निघालो. माझ्या मनात सोलापूरच्या मार्केटच्या या सगळ्या आठवणी भरून आलेल्या असतानाच हातातली भाजीची पिशवी स्वतःकडे घेत नवरा कानात कुजबुजला, "काय छान वाटलं हे. असं तुझ्यासोबत भाजी खरेदी करायला मला फार आवडतंय!" आणि एकदम हेही मार्केट मला तेवढंच आवडून गेलं!
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: भोंदू बाबाचे किळसवाणे कृत्य! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; 'गुरुवर्य' स्वप्नील लांडेवर गुन्हा दाखल
- मुंबई: कंपन्या बंद झाल्याचा केवळ आभास, त्यातील ७६ टक्के कंपन्या.. शरद पवारांच्या दाव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आकडेवारीसह जोरदार प्रत्युत्तर
- पुणे: १ हजार ३१७ बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव; वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई, वाहनमालकांना १५ दिवसांची मुदत
- मुंबई: मेट्रो-२बच्या कामादरम्यान क्रेन बिघडल्याने जुहू आणि अंधेरीत वाहतूक कोलमडली; दिवसभर वाहनचालक त्रस्त
महाराष्ट्र
- जालना: रेशीम धागा जगाला जोडणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते राज्यातील पहिल्या रेशीम कोष बाजारपेठेचे लोकार्पण, पहिल्याच लिलावात ९६१ रुपयांचा विक्रमी दर
- पुणे: भोंदू बाबाचे किळसवाणे कृत्य! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; 'गुरुवर्य' स्वप्नील लांडेवर गुन्हा दाखल
- मुंबई: कंपन्या बंद झाल्याचा केवळ आभास, त्यातील ७६ टक्के कंपन्या.. शरद पवारांच्या दाव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आकडेवारीसह जोरदार प्रत्युत्तर
- पुणे: १ हजार ३१७ बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव; वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई, वाहनमालकांना १५ दिवसांची मुदत
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पेट्रोल भरलं अन् पैसे न देता कारसह पसार? तरुणीचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
रस्ता बंद झाला तर निरीक्षकांनीच उचलली कुऱ्हाड! उत्तराखंड पोलिसांचा व्हिडिओ चर्चेत
पुण्यातील लोणीकंद पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप
देश विदेश
- नांदेड: पतीचा जीव वाचवण्यासाठी मानवी ढाल बनणाऱ्या शूर पोलिसासमोर खासदार हरसिमरत कौर बादल नतमस्तक; हल्ल्यात पोलिसाच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक
- नवी दिल्ली: स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान मोदींचे देशाला आवाहन; फाळणीच्या वेदनांची आठवण करत 'विकसित भारत'चे लक्ष्य
- नवी दिल्ली: लोकशाही जिवंत ठेवण्याची आपली जबाबदारी आहे; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादावर सरन्यायाधीशांचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
- बांगलादेश: आता फक्त भारतच वाचवू शकतो का? रात्री ८ वाजताच दिवे बंद करण्याची वेळ का आली? नेमकं काय घडलं


























Subscribe to my channel



