गेल्या आठवड्यात ट्रम्प यांनी दावा केला होता की, युद्ध समाप्त करण्यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यातील करार जवळपास निश्चित झाला आहे. मात्र अमेरिकेत इस्रायलसमर्थक गटांकडून टीका झाल्यानंतर ते आता कराराची घाई नसल्याचे सांगू लागले आहेत. आता त्यांनी सर्व मुस्लिम देश व इस्रायल यांच्यात व्यापक शांतता कराराचा प्रस्ताव पुढे आणला आहे. मात्र युद्ध लांबल्यास त्याचा भारतावर मोठा परिणाम होणार आहे. सौदी अरेबिया, यूएई, कतार, पाकिस्तान, तुर्किये, इजिप्त, जॉर्डन आणि बहरीनच्या नेत्यांसोबतच्या कॉन्फरन्स कॉलमध्ये ट्रम्प यांनी नवा सूर लावला. त्यांनी या सर्व देशांना ‘अनिवार्यपणे’ अब्राहम करारांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. अब्राहम करार म्हणजे अमेरिकेच्या मध्यस्थीत झालेले विशिष्ट करार होय. त्यांचा उद्देश इस्रायल आणि मध्य-पूर्वेतील मुस्लिमबहुल देशांत राजनैतिक, आर्थिक आणि सुरक्षा संबंध औपचारिक करणे हा आहे. ट्रम्प यांनी हा कॉल युद्ध समाप्तीसाठी प्रस्तावित एमओयू आणि अंतरिम करारावर चर्चा करण्यासाठी आयोजित केला होता. पण त्यांनी अचानक चर्चेची दिशा बदलली. पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांनी हा प्रस्ताव सर्वप्रथम फेटाळला. त्यामुळे मध्यस्थ म्हणून पाकिस्तानची भूमिका कमकुवत होईल, असे त्यांनी म्हटले. तसेच हा प्रस्ताव पॅलेस्टाईन प्रश्नावर ‘दोन राष्ट्र’ तोडग्याच्या पाकिस्तानी दीर्घकालीन भूमिकेविरोधात असल्याचेही त्यांनी सांगितले. इराणनेही ट्रम्प यांचा प्रस्ताव नाकारला. सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी सुरुवातीला मौन बाळगले. पण नंतर त्यांनीही हा प्रस्ताव मान्य नसल्याचे स्पष्ट केले. आधीपासून इस्रायलला मान्यता देणारे तुर्किये, इजिप्त आणि जॉर्डनसारखे देशही त्यामुळे अस्वस्थ झाले. शांततेसाठी प्रस्तावित एमओयू दोन्ही बाजूंनी तत्त्वतः मान्य करण्यात आला आहे. त्यात तात्पुरती युद्धबंदी, टप्प्याटप्प्याने होर्मुज खाडी खुली करणे, इराणी बंदरांवरील अमेरिकी नाकेबंदी हटवणे आणि लेबनॉनमधील संघर्ष संपवणे या मुद्द्यांचा समावेश आहे. मात्र, काही मोठे प्रश्न अद्याप अनिर्णित आहेत. उदाहरणार्थ, परिष्कृत युरेनियम सुपूर्द करण्याची मुदत, कतारमधील बँकांमध्ये जमा असलेली इराणची 20 अब्ज डॉलरची मालमत्ता मुक्त करणे आणि अब्राहम करारांचा विस्तार. इराणचे म्हणणे आहे की, अणु प्रश्न हा एमओयूचा भाग नाही आणि त्यावर चर्चा फक्त एमओयूवर सहमती झाल्यानंतरच्या 60 दिवसांच्या चर्चाकाळातच होईल. प्रस्तावित एमओयूमधील प्रमुख लष्करी अटींमध्ये दोन्ही बाजूंनी नौदल नाकेबंदी कमी करणे, जागतिक सागरी मार्ग पुन्हा सुरू करणे आणि सीमापार लष्करी संघर्ष थांबवणे यांचा समावेश आहे. इराणने होर्मुजवरील निर्बंध हटवण्यास सहमती दर्शवली आहे. त्यांची नौदल दलाने पेरलेल्या सागरी स्फोटक सुरंगाही हटवल्या जातील आणि जहाजांची वाहतूक कोणतेही अनिवार्य शुल्क न आकारता युद्धपूर्व स्थितीत आणली जाईल. मात्र, इराणी लष्करी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेकी, ते आपली भौगोलिक सार्वभौमत्व किंवा भू-राजकीय स्थिती सोडणार नाहीत. होर्मुजवरील नियंत्रण इराणी लष्कराकडेच राहील. अमेरिकी लष्करानेही इराणी बंदरांवरील नौदल नाकेबंदी पूर्णपणे हटवण्यास सहमती दर्शवली. त्यामुळे इराणला पुन्हा सागरी व्यापार आणि कच्च्या तेलाची निर्यात पूर्ववत करता येणार आहे. अमेरिका इराणी किनाऱ्याजवळून आपली आक्रमक नौदल तुकडी हटवणार आहे. या करारात इस्रायल आणि हिज्बुल्ला यांच्यात युद्धबंदी लागू करण्याचाही उल्लेख आहे. मात्र, अमेरिका आणि इस्रायल यांनी लेबनॉनचा मुद्दा वेगळा असल्याचे सातत्याने म्हटले आहे. शांततेच्या प्रयत्नांत प्रगती होत असली तरी विशेषतः होर्मुज भागात लष्करी तणाव कायम आहे. जवळपास रोज चकमकी होत आहेत. सर्वांत मोठा प्रश्न इराणच्या अणु क्षमतेचा आहे. इराण सातत्याने सांगत आहे की, त्यांनी अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर स्वाक्षरी केली आहे आणि ते अण्वस्त्र तयार करत नाहीत. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचेही मत आहे की, इराणकडे कोणताही अण्वस्त्र कार्यक्रम नाही. तरीदेखील अमेरिका इराणने 60% पर्यंत परिष्कृत केलेले 440.9 किलो युरेनियम अमेरिका किंवा तिसऱ्या देशाकडे सुपूर्द करावे, अशी मागणी करत आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) अमेरिका आणि इराण यांच्यात अजूनही अनेक मुद्द्यांवर एकमत नाही. देशात इंधनाच्या किमती चार वेळा वाढल्या आहेत. आतापर्यंत आपण परिस्थिती नियंत्रणात ठेवली, पण संघर्ष अधिक लांबला तर गंभीर परिणाम होऊ शकतात.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर


























Subscribe to my channel




