बांगलादेशमध्ये नुकतीच निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीमध्ये तारिक रहमान यांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने मोठं यश मिळवलं आहे. निवडणुकीत मोठा विजय मिळवल्यानंतर बीएनपी पक्षाचे प्रमुख तारिक रहमान यांनी बांगलादेशमधील जनतेचे आभार मानले आहेत. बीएनपीचा विजय हा देशातील लोकशाही आणि जनतेचा विजय असल्याचं तारिक रहमान यांनी म्हटलं आहे. दरम्यान आता बांगलादेशमध्ये सत्तापालट झाला आहे. तारीक रहमान हे पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. तर अशा स्थितीमध्ये आता बांगलादेशचे भारत, पाकिस्तान आणि चीनसोबत कसे संबंध असणार? याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. यावर आता तारीक रहमान यांची शपथग्रहण सोहळ्यापूर्वीच पहिली प्रतिक्रिया आली आहे.
तारीक रहमान यांनी नेमकं काय म्हटलं?
येत्या काळात भारत, पाकिस्तान आणि चीनसोबत बांगलादेशचे संबंध कसे असणार? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला, यावर बोलताना तारीक रहमान यांनी म्हटलं की आमचं सरकार हे चीन, भारत आणि पाकिस्तानसोबत बांगलादेशच्या हिताचं संरक्षण करणाऱ्या नीतींचं पालन करेल. दरम्यान यावेळी त्यांनी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या प्रत्यर्पणावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. आमचं परराष्ट्र धोरण हे येथील जनतेला अनुकूल असं असेल. शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाची बाब ही कायदेशी प्रक्रियेवर अवलंबू असेल असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, सध्या आमच्यासमोर अनेक आव्हान आहेत, आमची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे. देशात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती चिंताजनक आहे. मागच्या सरकारने येथील प्रत्येक संस्थेचं राजकीयकरण केलं होतं, त्यामुळे सर्वात आधी देशात सुशासन स्थापन करणे हेच आमचं उद्दिष्ट असणार आहे, आम्ही बांगलादेशमध्ये इतर देशांमधून गुंतवणूक आणू, देशात रोजगार वाढवू असं तारीक रहमान यांनी म्हटलं आहे. मात्र दुसरीकडे बांगलादेशमध्ये तारीक रहमान यांची सत्ता येताच शेख हसीना यांच्यासंदर्भात बीएनपीच्या एका ज्येष्ठ नेत्यानं मोठं विधान केलं होतं. आम्ही शेख हसीना यांना बांगलादेशकडे सोपवण्यासाठी भारतावर दाबव टाकू असं विधान केलं होतं.
शहर
- पुणे: "ओम नमस्ते गणपतये...!" पुण्यात स्त्रीशक्तीचा अभूतपूर्व जागर; श्रीमंत दगडूशेठ बाप्पासमोर तब्बल ३५ हजार महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण!
- मुंबई: कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते...राज ठाकरेंच्या एकाच वाक्यातील सूचक आणि रहस्यमय पोस्टमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ!
- छत्रपती संभाजीनगर: गणरायाच्या स्वागतावेळी मृत्यूने साधला डाव; कंटेनर थेट मिरवणुकीच्या गर्दीत घुसल्याने २ ठार, पाच वर्षांच्या बालकासह १२ जण जखमी!
- मुंबई: आंदोलनाचा फेरविचार करा; मुख्यमंत्र्यांचे जरांगेंना आवाहन; एकटाच मुंबईला जाणार, मनोज जरांगे भूमिकेवर ठाम!
महाराष्ट्र
- पुणे: सुरक्षेचा मोठा प्रश्न! केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अधिकृत ताफ्याला दुचाकीस्वाराने मारला 'कट'; ३२ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: "ओम नमस्ते गणपतये...!" पुण्यात स्त्रीशक्तीचा अभूतपूर्व जागर; श्रीमंत दगडूशेठ बाप्पासमोर तब्बल ३५ हजार महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण!
- जालना: मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना होताच कुटुंबाचा संताप अनावर; पत्नी आणि मुलींनी सरकारला सुनावले खडे बोल, दिला कडक इशारा
- अमरावती: गणेशोत्सवानंतर काळाचा घाला! अमरावतीच्या नांदगाव पेठ रिंगरोडवर भरधाव वाहनाच्या धडकेत अचलपूरच्या दोन तरुण बँड वादकांचा जागीच मृत्यू!
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही




























Subscribe to my channel




