सर्वच प्राणीमात्रांच्या काही प्रवृत्ती असतात. त्यात मूळ प्रवृत्ती म्हणून काही उल्लेख आहेत. जसे की आहार, निद्रा, भय आणि कामसेवन. या मूळ प्रवृत्ती आहेत, त्या सर्वच प्राण्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात विद्यमान असतात. एकइंद्रिय ते पंचेंद्रीय प्राण्यांमध्ये या प्रवृत्तींमध्ये अनुक्रमे अत्याधिकता दिसून येते. सर्वच प्राण्यांच्या बाल्य आणि संगोपन अवस्थेमध्ये आहार, निद्रा आणि भय या प्रवृत्ती सर्वसाधारण असतात. वयात आल्यानंतर काही प्रवृत्ती बदलतात त्यामध्ये कामसेवन आणि वासना निर्माण होते. मनुष्य आणि प्राण्यांच्या जीवनामध्ये ही वासनाच संपूर्ण आयुष्यावर राज्य करते. ही वासना अनेक प्रकारची असते, सर्व इंद्रियांच्या बाबतीत अत्याधिक विषयसेवन यामध्ये अंतर्भूत होतात. ऑस्ट्रियन डॉक्टर आणि मानसशास्त्राचे उद्घाटक डॉ. सिग्मंड फ्रॉइड यांनी तर मनुष्य आणि प्राण्याच्या प्रत्येक हालचाल आणि कृती, उद्देशाच्या मागे वासना हेच मूळ असल्याचे सांगितले. ( प्रत्येक साधारण प्रवृत्तीला देखील त्यांनी वासना असेच संबोधन दिले) प्रत्येक इंद्रियाच्या विषयातील अधिकता म्हणजेच वासनेच्या आहारी जात मनुष्य अनेक व्यावहारिक, नैतिक, सामाजिक इत्यादी मर्यादा ओलांडतो. यामुळेच प्रत्येक प्रवृत्ती मध्ये अधिकता वाढत जाते. अनिवार्यता काय आहे? आवश्यकता काय आहे ? आणि अत्याधिकता म्हणजेच विलासिता, वासना ही अधिक उत्पन्न होत आहे या बाबी तो विसरून जातो. जसे गहू किंवा धान्य ही अनिवार्यता आहे, त्याची पोळी, चपाती ही आवश्यकता आहे. परंतु त्याचे पदार्थ, व्यंजन, पराठे वगैरे इत्यादी या विलासिता आहेत. वासनेच्या अधिक वृद्धीच्या परिणामस्वरूप हे घटित होते. प्राण्यांचे जीवन हे निसर्गाच्या नियमस्वरूप असावे, मनुष्येतर प्राण्यांमध्ये ते निसर्गाच्या नियमानुसार असते. परंतु मनुष्यामध्ये बुद्धी आणि इंद्रियांची अत्यधिक विकसितता झाल्यामुळे त्यामध्ये " भौतिकता " ही वृत्ती काळानुसार निर्माण होत गेली. आज ही प्रवृत्ती मनुष्यात परम सीमेवर दिसून येते आहे. आपल्या कामाची एक वस्तू असते परंतु त्या प्रकारच्या आपण खूप वस्तू घरामध्ये ठेवतो. एकावेळी एक ड्रेस घालतो परंतु कपाटामध्ये शंभरहून अधिक ड्रेसची थप्पी लागलेली असते. शास्त्रांमध्ये मनुष्य आणि काही प्राण्यांमध्ये संग्रह वृत्ती सांगितलेली आहे. जसे की मुंगी पावसाळ्याच्या सुरुवातीला पुढे लागणाऱ्या खाद्य वस्तूंचा जमिनीखाली संग्रह करून ठेवते. परंतु हे अनिवार्य आहे. सर्वच प्राणी आहाराची खाद्य वस्तू मिळण्याची चिंता करतात परंतु ते पोटाची भूक भागेल इतकीच. मनुष्यामध्ये हे असे दिसून येत नाही. एकावेळी एक वस्तू वापरायची मग बाकीच्या वस्तू कशासाठी?
ठीक आहे एक खराब झाली तर दुसरी असावी तिसऱ्या-चौथ्या पासून शंभराव्या पर्यंत कशासाठी? संग्रह वृत्ती ही इच्छेला मर्यादा नसल्यामुळे निर्माण होते. म्हणून कमीत कमी संग्रह, परिग्रहाचा संकल्प करावा. मी दहा,पंधरा कपड्यांपेक्षा जास्त ठेवणार नाही. संकल्प यासाठी की तुम्ही ठरवलेल्या नियमापेक्षा जगभर अधिक निर्माण होणाऱ्या वस्तू उत्पादनासाठी जी हिंसा घडते त्याचे भागीदार तुम्ही नसता. म्हणून इच्छा परिमाण व संग्रह सीमा हे गृहस्थासाठी व्रत आहेत. या व्रतांचा अंगीकार करणे अथवा त्यांचे मानसिक, कौटुंबिक सामाजिक स्वास्थ्य आणि संतुलनाच्या बाबतीत महत्त्व जाणून घेणे आवश्यक आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) (संपर्क- 9420015108)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणेकरांचा रोजचा त्रास: शिवाजीनगर ते औंध मार्गावर भीषण वाहतूक कोंडी; मेट्रोचे काम, अतिक्रमणे आणि खड्ड्यांमुळे वाहनचालक हैराण"
- शेतकऱ्यांच्या हितासाठी महायुती सरकार कटिबद्ध: देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयांचे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले कौतुक
- जळगावच्या वाहतूक कोंडीवर उपाय: शहराला मिळणार दोन नवे रेल्वे उड्डाणपूल; रेल्वे विभागाकडून प्राथमिक पाहणी सुरू
- सोलापूर: सासऱ्याच्या कथित छळाला कंटाळून १५ वर्षीय नववधूचा मृत्यू; तपासाला वेग
महाराष्ट्र
- पुणेकरांचा रोजचा त्रास: शिवाजीनगर ते औंध मार्गावर भीषण वाहतूक कोंडी; मेट्रोचे काम, अतिक्रमणे आणि खड्ड्यांमुळे वाहनचालक हैराण"
- शेतकऱ्यांच्या हितासाठी महायुती सरकार कटिबद्ध: देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयांचे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले कौतुक
- जळगावच्या वाहतूक कोंडीवर उपाय: शहराला मिळणार दोन नवे रेल्वे उड्डाणपूल; रेल्वे विभागाकडून प्राथमिक पाहणी सुरू
- सोलापूर: सासऱ्याच्या कथित छळाला कंटाळून १५ वर्षीय नववधूचा मृत्यू; तपासाला वेग
गुन्हा
- "छत्रपती संभाजीनगर हादरले: विवाहित शिक्षिकेवर पोलीस उपनिरीक्षकाकडून लैंगिक अत्याचार; प्रेमाचे जाळे विणून केली मारहाण"
- नागपूरच्या खापरखेड्यात भीषण अपघात: दोन कारची समोरासमोर धडक; कारचालकाचा जागीच मृत्यू, अनेक जखमी"
- छत्रपती संभाजीनगर: शिक्षिकेवर अत्याचार आणि मारहाण केल्याप्रकरणी पीएसआय हरीश खटावकरवर गुन्हा दाखल
- छत्रपती संभाजीनगर: पैशांच्या वादातून आईची कारमध्ये गळा आवळून हत्या, १४ महिन्यांच्या बालकाला नदीत फेकले
राजकीय
- मुंबई/नाशिक: मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी नाशिकच्या नगरसेवकांचे वाढवले मनोबल; दिली एकनिष्ठतेची ग्वाही.
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
विडियो गॅलेरी

15 July 2026
15 July 2026
इंदौर : रोड रेजचा थरार! कारच्या बोनटवर चढून तरुणाचा धिंगाणा #इंदौर #रोडरेज #व्हायरलव्हिडिओ #ब्रेकिंग
देश विदेश
- नवी दिल्ली: संसदेचे पावसाळी अधिवेशन मोदी सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसची रणनीती तयार, 'हे' मुद्दे गाजणार!
- हैदराबाद: आंध्र प्रदेशात मंदिराच्या दर्शनाला जाण्याचा बहाणा, पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या
- "सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर काँग्रेसचा अखेर पाठिंबा; प्रकृती खालावल्याने उपोषण मागे घेण्याचे आवाहन"
- पश्चिम बंगाल: भरधाव ट्रेनची शाळेच्या वाहनाला भीषण धडक; विद्यार्थ्यांसह तिघांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती गंभीर

























Subscribe to my channel



