एक राजनैतिक अधिकारी म्हणून मी परदेशात कार्यरत होतो आणि जगभ्रमंती केली आहे. माझ्या पासपोर्टवर मला भारत-गणराज्याचा नागरिक, एक उदयोन्मुख शक्ती आणि महान संस्कृतीचा प्रतिनिधी म्हणून संबोधले गेले आहे. ही माझ्यासाठी अभिमानाची बाब होती. म्हणूनच, परराष्ट्र मंत्रालयाने नुकतेच जेव्हा असे म्हटले की, पासपोर्ट हा नागरिकत्वाचा पुरावा नाही, तेव्हा मी गोंधळून गेलो. सरकारची स्वतःची काही कारणे असू शकतात, पण अनेक दशकांपासून भारतीयांची अशी समज आहे की पासपोर्ट ही त्यांच्या नागरिकत्वाची अधिकृत पुष्टी आहे. पासपोर्ट मिळवण्याच्या प्रक्रियेआधी सखोल चौकशी केली जाते. अर्जदाराला कागदपत्रे सादर करावी लागतात, ओळख पटवावी लागते, निवासाचा पुरावा द्यावा लागतो आणि पोलिस पडताळणीतून जावे लागते. पासपोर्ट केवळ एखादी व्यक्ती परदेशात जाऊ इच्छिते म्हणून दिला जात नाही, तर राज्यसंस्थेचे समाधान होते की अर्जदार भारतीय नागरिक आहे, म्हणून तो दिला जातो. पासपोर्ट कायद्याच्या कलम 6(2)(ए) मध्ये स्पष्ट म्हटले आहे की, पासपोर्ट केवळ भारताच्या नागरिकालाच दिला जाऊ शकतो. या दस्तऐवजाचे भावनिक महत्त्व त्याच्या प्रशासकीय उपयुक्ततेपेक्षाही मोठे होते. ते व्यक्ती आणि देश यांच्यातील नात्याचे प्रतीक होते. परदेशात जाणाऱ्या भारतीयांसाठी ही केवळ एक पुस्तिका नव्हती, तर ती ओळख व आपलेपणाची घोषणा होती. हे खरे आहे की, माहिती लपवून, कागदपत्रांमध्ये फेरफार करून किंवा खोटी माहिती देऊन काही लोक चुकीच्या मार्गाने पासपोर्ट मिळवू शकतात. अशा स्थितीत राज्यसंस्थेला पासपोर्ट रद्द करण्याचा आणि दोषीवर कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण, कायदेशीर प्रक्रियेद्वारे मिळालेला वैध पासपोर्ट हा नागरिकत्वाचा पुरावा आहे, ही धारणा या कारणास्तव नाकारता कामा नये. मतदार ओळखपत्रही चुकीच्या पद्धतीने मिळवता येऊ शकते. रेशन कार्डातही फेरफार होऊ शकतो. आधार कार्डाचाही दुरुपयोग होऊ शकतो. मालमत्तेच्या कागदपत्रांतही घोटाळे करता येतात. भारतातील सध्याची कागदपत्रांची स्थिती पाहता हा प्रश्न अधिक चिंतेचा ठरतो. आधार नागरिकत्वाचा पुरावा नाही. मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाही. रेशन कार्ड नागरिकत्वाचा पुरावा नाही. जन्मदाखल्यांनाही अनेकदा प्रक्रियात्मक कारणांवरून आव्हान दिले जाते. आता जर पासपोर्टही नागरिकत्वाचा पुरावा नसेल, तर नागरिकत्वाचा खरा पुरावा काय, हा प्रश्न निर्माण होतो. कोणतेही आधुनिक राष्ट्र गोंधळाच्या आधारावर चालू शकत नाही. नागरिकत्व ही काही हवेतली गोष्ट नाही. याच गोष्टीवर शेवटी सर्व घटनात्मक अधिकार अवलंबून असतात. मतदानाचा अधिकार वापरणे, कायदेशीर संरक्षणाची मागणी करणे, सरकारी लाभ मिळवणे किंवा संविधानाने दिलेले अधिकार उपभोगण्यापूर्वी, व्यक्तीने नागरिक म्हणून मान्यता मिळवणे आवश्यक आहे. जर कोणतीही कागदपत्रे ही स्थिती ठामपणे सिद्ध करत नसतील, तर सर्व भार व्यक्तीवर येऊन पडतो. प्रत्यक्षात राज्यसंस्थेने स्वतःच्या संस्था आणि कागदपत्रांच्या माध्यमातून नागरिकाचे नागरिकत्व सिद्ध करायला हवे होते; परंतु त्याऐवजी, नागरिक स्वतः या देशाचा आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याला वारंवार भाग पाडले जाते. जेव्हा राज्यसंस्था स्वतः कागदपत्रे जारी करूनही नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करते, तेव्हा नागरिक संभ्रमावस्थेत जातो. त्याच्याकडे कागदपत्रे असूनही ती अपुरी ठरतात. तो नियमांचे पालन करतो, पण त्याला कोणतीही शाश्वती मिळत नाही. नागरिकत्व जर सतत वादाचा विषय बनून राहिले, तर अधिकाऱ्यांना अतिरिक्त पुरावे मागण्याचे जास्तीचे अधिकार मिळतात. नागरिक मनमानी अर्थ आणि नोकरशाहीच्या समाधानावर अवलंबून राहतात. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या अनेक देशांत पासपोर्टला नागरिकत्वाचा भक्कम पुरावा मानले जाते, कारण ते देण्यापूर्वी नागरिकत्वाची पडताळणी केली जाते. यावरचा खरा उपाय म्हणजे दस्तऐवज देण्यापूर्वीची तपासणी प्रक्रिया अधिक कडक करणे, पडताळणी यंत्रणेत सुधारणा करणे, विविध डेटाबेस एकमेकांना जोडणे आणि फसवणूक करणाऱ्यांसाठी कडक शिक्षेची तरतूद करणे हा आहे. या वादाच्या केंद्रस्थानी एक महत्त्वाचा प्रश्न आहे: लोकशाहीमध्ये नागरिकाने वैधतेच्या गृहीतकावर जगावे की संशयाच्या? (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) नागरिकत्व जर सतत वादाचा विषय बनून राहिले, तर अधिकांऱ्यांना अतिरिक्त पुरावे मागण्याचे जास्तीचे अधिकार मिळतात. मग नागरिक मनमानी अर्थ आणि नोकरशाहीच्या समाधानावर अवलंबून राहतात.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नाशिक: 'महासिंहस्था' ची जय्यत तयारी; ३४ हजार कोटींच्या निधीतून कुंभमेळा होणार 'न भूतो न भविष्यती
- पुणे: मोशी दुर्घटनेने उद्ध्वस्त झाले कुटुंब, कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली पतीचा मृत्यू, काही आठवड्यांतच पत्नीनेही संपवले जीवन; २ चिमुकल्या मुली पूर्णपणे पोरक्या!
- पुणे: दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्ताराचा मार्ग मोकळा फरासखाना-विश्रामबाग पोलीस ठाण्याची जागा ट्रस्टला देण्याबाबत पोलिसांकडून प्रस्ताव सादर
- मुंबई: प्रवाशांच्या जिवाशी खेळ वांद्रे पश्चिम स्टेशनबाहेर साचलेल्या पाण्यामुळे खड्ड्यांची खोली कळेना, अपघाताचा धोका वाढला
महाराष्ट्र
- अमरावती: विद्यापीठात १३ असोसिएट प्रोफेसर पदांसाठी तब्बल १८७ अर्ज; राज्यासह देशभरातील उच्चशिक्षित उमेदवार तीव्र स्पर्धेत!
- नाशिक: 'महासिंहस्था' ची जय्यत तयारी; ३४ हजार कोटींच्या निधीतून कुंभमेळा होणार 'न भूतो न भविष्यती
- सिंधुदुर्ग: मित्रासोबत मासेमारीसाठी गेलेल्या बेपत्ता तरुणाचा मृतदेह मळगाव घाटीतील धबधब्यात आढळला
- नांदेड: पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर माता साहेब गुरुद्वारा परिसरात प्राणघातक हल्ला; खासगी रुग्णालयात दाखल
गुन्हा
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
- नागपूर: "इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली काळ; १६ वर्षीय मुलीला ओलीस ठेवून अमानवीय अत्याचार; नराधम अटकेत."
- पुणे: १० वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधम झुंबर खोमणे याला जेजुरी पोलिसांकडून बेड्या
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

पेट्रोल भरलं अन् पैसे न देता कारसह पसार? तरुणीचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
रस्ता बंद झाला तर निरीक्षकांनीच उचलली कुऱ्हाड! उत्तराखंड पोलिसांचा व्हिडिओ चर्चेत
पुण्यातील लोणीकंद पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप
देश विदेश
- बांगलादेश: आता फक्त भारतच वाचवू शकतो का? रात्री ८ वाजताच दिवे बंद करण्याची वेळ का आली? नेमकं काय घडलं
- उत्तर प्रदेश: केस गळतीच्या गंभीर समस्येमुळे आणि उपचारांनंतरही फरक न पडल्याने १५ वर्षीय मुलीचे टोकाचे पाऊल; गळफास घेऊन संपवले जीवन!
- नवी दिल्ली: राज्यसभेत मोठा गदारोळ रामलिला मैदानावर झालेल्या 'शुद्धीकरण' हवन प्रकरणावरून मल्लिकार्जुन खर्गे यांचे भाजपवर जोरदार प्रहार!
- नवी दिल्ली: "शिंदेंची निवडच लोकशाही विरोधी; ठाकरेंच्या वकिलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद, संजय राऊतांना न्यायाची खात्री."




























Subscribe to my channel




