गेल्या आठवड्यात माझ्या एका मित्राने मला व्हिडिओ कॉल केला. तो हिरव्यागार डोंगरदऱ्यात उभा असावा असे वाटत होते. पण प्रत्यक्षात तो एका मठातील वर्गात होता. विद्यार्थी डोळे मिटून जमिनीवर मांडी घालून बसले होते. लांब कुठेतरी घंटा वाजत होत्या, खोलीत पूर्ण शांतता होती आणि एक बौद्ध भिक्खू ध्यानासह दिवसाचा पहिला तास सुरू करत होते. ते तिबेटी भाषेत बोलत होते आणि प्रत्येक काही वाक्यांनंतर थांबत होते, जेणेकरून अनुवादक त्यांची शिकवण समजून सांगू शकेल. त्यांनी ध्यान पूर्ण केल्यानंतर एका कॅनेडियन मानववंशशास्त्रज्ञाने इतिहासाचा तास सुरू केला. मित्राने वर्गातून बाहेर येऊन मला विचारले, “सांग, मी कुठे होतो?” मला पहिल्या प्रयत्नात उत्तर देता आले नाही. जेव्हा मी विचारले की, “इतक्या वेगवेगळ्या देशांचे विद्यार्थी तिथे कसे काय बसले आहेत?” तेव्हा त्याने सांगितले की, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासह 40 देशांतील शेकडो विद्यार्थी बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी का-निंग शेद्रुब लिंग मठात येतात. हा मठ प्रसिद्ध बोधनाथ स्तुपाच्या उत्तरेला काही मिनिटांच्या अंतरावर आहे. त्यानंतर आमची चर्चा या विषयावर सुरू झाली की, दरवर्षी हजारो नेपाळी विद्यार्थी पदवी आणि चांगल्या संधींच्या शोधात ऑस्ट्रेलिया, भारत, ब्रिटन, अमेरिका आणि इतर देशांतील विद्यापीठांत जातात, ज्या सुविधा नेपाळमध्ये उपलब्ध नाहीत. पण, एक छोटासा शैक्षणिक प्रवास विरुद्ध दिशेनेही होत आहे, ज्याची आपल्याला माहिती नाही. हे विद्यार्थी बौद्ध धर्माच्या अभ्यासासाठी काठमांडूमध्ये येत आहेत. काही जण अल्पकालीन उन्हाळी विशेष अभ्यासक्रमात प्रवेश घेतात आणि नंतर ते क्रेडिट्स परदेशी विद्यापीठांमध्ये हस्तांतरित करतात. काही विद्यार्थी काठमांडू विद्यापीठ बौद्ध अध्ययन केंद्राद्वारे चालवल्या जाणाऱ्या सत्र विनिमय कार्यक्रमांतर्गत अभ्यास करण्यासाठी तिथेच राहतात. 30 वर्षांपूर्वी स्थापन झालेली ही संस्था सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या एका छोट्या गटाने सुरू केली होती, ज्यांना तिबेटी बौद्ध शिक्षक चोक्यी न्यिमा रिनपोछे यांच्याकडून शिकायचे होते. लवकरच संस्थापकांना जाणीव झाली की, जर बौद्ध शिक्षणाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून द्यायची असेल, तर ते विद्यापीठाच्या चौकटीत आणले पाहिजे. 2002 मध्ये संस्थेने औपचारिकपणे काठमांडू विद्यापीठाशी भागीदारी करून बौद्ध अध्ययन केंद्राची स्थापना केली. त्या वेळी तिथे केवळ 36 विद्यार्थी होते. आज त्यांच्या पदवी अभ्यासक्रमांमध्ये 169 विद्यार्थी नोंदणीकृत आहेत आणि दरवर्षी सुमारे 100 विद्यार्थी उन्हाळी विशेष अभ्यासक्रम पूर्ण करतात. माझा मित्र वेगवेगळ्या धर्मांच्या विद्यार्थ्यांनी बौद्ध धर्माचा अभ्यास करण्याच्या पद्धतीचे खूप कौतुक करत होता. विद्यार्थ्यांचे हे कार्य पाहून मला 1968 मधील ‘अनोखी रात’ चित्रपटातील मुकेश यांनी गायलेले एक गीत आठवले - ‘ओह रे, ताल मिले नदी के जल में, नदी मिले सागर में, सागर मिले कौन से जल में, कोई जाने ना।’ मला वाटले की, या गाण्याचे बोल आजच्या बदलत्या शिक्षण पद्धतीवर किती चपखल बसतात. आयआयटी जम्मूचेच उदाहरण घ्या. त्यांनी या शैक्षणिक वर्षात ‘युनिफाइड इंजिनिअरिंग’ नावाचा नवीन बीटेक कार्यक्रम सुरू केला आहे. हा कार्यक्रम अशा विद्यार्थ्यांसाठी तयार केला आहे, ज्यांना पारंपरिक एकाच विषयाच्या अभियांत्रिकीच्या पुढे जायचे आहे. हा कार्यक्रम जेईई ॲडव्हान्स्डच्या उमेदवारांसाठी खुला असून, त्याचा अभ्यासक्रम पूर्णपणे नवीन आणि व्यावहारिक आहे. यात अभियांत्रिकीच्या अनेक क्षेत्रांना एकत्र जोडले आहे. सिस्टीम इंजिनिअर, उत्पादन विकास अभियंता, ऑटोमेशन तज्ज्ञ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ यांसारख्या विविध जबाबदाऱ्या सांभाळू शकणारे पदवीधर तयार करणे हा याचा उद्देश आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की, अशी बहुआयामी कामे का आवश्यक आहेत? आज लोकप्रिय होत असलेल्या इलेक्ट्रिक वाहनांचेच उदाहरण घ्या. ही वाहने बाजारात चांगली कामगिरी करतील हे सुनिश्चित करण्यासाठी तुम्हाला मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांतील तज्ज्ञांची गरज लागते. तसेच स्मार्ट सिटीजसाठी सिव्हिल इंजिनिअर्स, डेटा विश्लेषक आणि शाश्वत विकासाचा अभ्यास करणाऱ्यांची गरज असते. थोडक्यात सांगायचे तर, अभियांत्रिकी शिक्षणाच्या वाटा आता पूर्वीपेक्षा खूप व्यापक होत आहेत. फंडा असा की... जर तुम्हाला खरोखर ज्ञानवंत बनायचे असेल, तर तुम्हाला एका छोट्या ‘तळ्या’तून बाहेर पडून ‘नदी’ची मदत घ्यावी लागेल, जेणेकरून तुम्ही ‘ज्ञानाच्या सागरा’पर्यंत पोहोचू शकाल.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




