काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका

शिवसेनेचे नेते श्रीकांत शिंदे यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. ते म्हणाले की, सपकाळ यांच्या वक्तव्याचा जेवढा निषेध करू तेवढा कमीच आहे. शिंदे यांनी काँग्रेसच्या धोरणांवरही टीका केली. त्यांच्या मते, काँग्रेस पक्ष मतांच्या राजकारणासाठी नेहमीच विशिष्ट समुदाय किंवा धर्माला लक्ष्य करून अशी वक्तव्ये करत आला आहे. याच कारणामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात काँग्रेसची राजकीय अधोगती झाली आहे, असे श्रीकांत शिंदे यांनी नमूद केले.

गेले अनेक वर्षांपासून काँग्रेसने विशिष्ट जाती, समुदाय आणि धर्माच्या मतपेढीसाठी जी धोरणे आणि धारणा ठेवली आहे, तीच त्यांची संस्कृती बनली आहे. काँग्रेसच्या याच पद्धतीमुळे त्यांची विश्वासार्हता कमी झाली असून, पक्षाला मोठा फटका बसला आहे, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *