राजदीप सरदेसाई यांचा कॉलम:कटाच्या सिद्धांतांना सत्यावर‎ कधीही वर्चस्व गाजवू देऊ नका‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎दिल्लीच्या सत्ताकेंद्रांमध्ये कटकारस्थानांचे सिद्धांत‎(कॉन्स्पिरसी थिअरीज) नेहमीच फोफावत आले‎आहेत. मात्र, आजच्या तीव्र ध्रुवीकरणातील भारतात ते‎केवळ चर्चेपुरते राहिलेले नाहीत. आता ते राजकीय‎शस्त्र बनले असून विरोधकांची विश्वासार्हता डागाळणे,‎आंदोलने बदनाम करणे व अस्वस्थ करणाऱ्या‎प्रश्नांपासून लक्ष हटवण्यासाठी त्यांचा वापर केला जात ‎‎आहे. सध्या या आरोपांचे लक्ष्य आहेत सोनम वांगचुक ‎‎आणि वकॉकरोच जनता पार्टी (सीजेपी). राष्ट्रीय ‎‎राजधानीत झालेल्या विद्यार्थी आंदोलनांच्या‎पार्श्वभूमीवर त्यांच्यावर आरोप होत आहेत. पेपरफुटी, ‎‎परीक्षांतील विलंब आणि बेरोजगारीमुळे तरुणांमध्ये ‎‎असंतोष का आहे, हा प्रश्न विचारण्याऐवजी आंदोलनाचे ‎‎नेतृत्व करणाऱ्यांच्या उद्देशांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले ‎‎जात आहे.‎ काँग्रेसशी संबंधित काही गटांमध्ये असा दावा केला जात ‎‎आहे की वांगचुक आणि सीजेपी हे सरकारच्या‎तथाकथित "डीप स्टेट’ चा भाग आहेत. नीट वादाचे‎राजकीय श्रेय काँग्रेसला मिळू नये, म्हणून त्यांना पुढे‎करण्यात आले, असा आरोप केला जात आहे. मात्र, या‎दाव्याला कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही. तरीही,‎संशयाचे वातावरण तथ्यांपेक्षा वेगाने पसरत असल्याने‎असे कटकारस्थानांचे सिद्धांत सहज रुजतात.‎ सोनम वांगचुक यांच्या प्रकरणाकडे पाहिले तर‎लडाखला अधिक स्वायत्ततेची मागणी करणारे‎आंदोलन तीव्र झाल्यानंतर त्यांना राष्ट्रीय सुरक्षा‎कायद्याअंतर्गत (एनएसए) ताब्यात घेण्यात आले होते.‎त्यांनी सहा महिने तुरुंगात घालवले. नंतर त्यांची सुटका‎झाली; मात्र त्यांना का अटक करण्यात आली, याचे‎स्पष्ट कारण कधीच सांगण्यात आले नाही. त्यांच्यावर‎चीनसमर्थक एजंट असल्याचेही आरोप करण्यात आले.‎ दुर्देव असे की पूर्वी चीनसमर्थक म्हणून बदनाम करण्यात‎आले. त्याच व्यक्तीला आता काही नेते गुप्तचर यंत्रणेची‎कठपुतळी म्हणत आहेत. काँग्रेसच्या आंदोलनाकडून‎लक्ष विचलित करण्यासाठी सरकारने त्यांना पुढे केले,‎असा आरोप केला जात आहे. एखाद्या व्यक्तीवर आधी‎चीनसमर्थक असल्याचा आणि नंतर भारतीय‎सत्तासंस्थेसाठी काम करत असल्याचा आरोप एकाच‎वेळी कसा खरा ठरू शकतो, हा प्रश्न उपस्थित होतो. मी‎सोनम वांगचुक यांना जवळपास दोन दशकांपासून‎ओळखतो. 2008 मध्ये शिक्षण आणि पर्यावरण‎क्षेत्रातील कार्यासाठी त्यांना ‘रिअल हिरो'' पुरस्कार‎मिळाला, तेव्हा माझी त्यांच्याशी पहिली भेट झाली होती.‎ ‘थ्री इडियट्स'' हा चित्रपट त्यांच्या आयुष्यापासून प्रेरित‎असल्याचे अनेकांचे मत आहे. त्यांच्या प्रत्येक मताशी‎सहमत असणे आवश्यक नाही. मात्र, लोकशाहीचा‎मूलभूत सिद्धांत असा आहे की सत्तेशी मतभेद असणे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎म्हणजे देशद्रोह नव्हे. केंद्र सरकारनेही अनेक प्रसंगी‎जाहीररित्या वांगचुक यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.‎मार्च 2023 मध्ये केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी‎वांगचुक आणि त्यांच्या पत्नीची भेट घेतल्यानंतर‎‘एक्स''वर छायाचित्र शेअर करत शिक्षणव्यवस्थेत बदल‎घडवून आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले होते.‎आता नीट प्रकरणी उत्तरदायित्वाची मागणी करणाऱ्या‎प्रमुख चेहऱ्यांपैकी झाल्यानंतर प्रशंसा दिसेनाशी झाली.‎ सरकारने सीजेपीकडे इंटरनेटपुरत्या छोट्या गटाप्रमाणे‎पाहिले. मात्र विद्यार्थी रस्त्यावर उतरल्यावरच त्यांच्या‎अस्तित्वाची दखल घेतली गेली.‎ काँग्रेसलाही सीजेपी हा आम आदमी पक्षाचाच मुखवटा‎असल्याचे वाटत होतेय कारण त्याच्या संस्थापकाचा‎पूर्वी आपशी संबंध होता. कदाचित 2011 मधील अण्णा‎हजारे यांच्या आंदोलनामुळे काँग्रेस सरकारच्या पतनाची‎प्रक्रिया वेगाने सुरू झाल्याची आठवण काँग्रेसला‎आजही असावी.‎ (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)‎ काँग्रेसशी संबंधित काही गटांत एक‎सिद्धांत मोठ्या प्रमाणावर मांडला जात‎आहे की, वांगचुक आणि सीजेपी हे‎सरकारच्या कथित "डीप स्टेट"चा भाग‎आहेत. नीट वादाचा मुद्दा मांडण्याचे श्रेय‎काँग्रेसला मिळू नये, म्हणूनच त्यांना पुढे‎करण्यात आले आहे.‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *