ग्रामीण भारतातील ‘ते’ सर्वकालीन चित्र आठवा. मुले अनवाणी पायांनी चिखलाने भरलेल्या रस्त्यांवर नाचत आहेत. पाण्याने भरलेल्या खड्ड्यांत उड्या मारत आहेत. पहिल्या पावसात भिजताना दोन्ही हात पसरून शाहरुख खानसारखी पोज करत आहेत. शहरी लोकांना हा पावसाचा उत्साही जल्लोष वाटतो. पण त्या मुलांसाठी हा खेळापेक्षा खूप काही जास्त आहे. त्यांना माहीत आहे की पावसाच्या प्रत्येक थेंबाचा अर्थ आहे जीवन- कौटुंबिक शेतांसाठी पाणी, जनावरांसाठी चारा, ताटातील अन्न आणि भविष्याची आशा. पण या वेळी मान्सूनमध्ये अशा दृश्यांची उणीव आहे. एल-निनोमुळे अनियमित आणि विलंबाने झालेल्या पावसाने केवळ शेतीची लयच बिघडवली नाही तर हा निरागस आनंदही हिरावून घेतला आहे. सहसा मुलांच्या किलबिलाटाने गुंजणारे गावांचे रस्ते जास्त वेळ धुळीने भरलेले राहिले. जेव्हा मान्सून थांबतो तेव्हा केवळ पिकेच नाही तर संपूर्ण ग्रामीण बालपणही त्याची वाट पाहते. त्यामुळेच महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या एका प्रयोगाकडे संपूर्ण देशाचे लक्ष गेले पाहिजे. सुमारे १६ लाख एकर शेतजमिनीत पसरलेला हा जिल्हा शेतीबद्दलच्या विचारात उल्लेखनीय बदल करण्याचा प्रयत्न करत आहे. हजारो शेतकऱ्यांनी एकसारखेच पीक पेरावे आणि एकसारखीच जोखीम पत्करावी याऐवजी जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल एक मोहीम सुरू करून ७७८ ग्रामपंचायतींच्या ९७० गावांना आवाहन करत आहेत की, त्यांनी प्रत्येक गावात कमीत कमी २० एकर जमीन कमी पाण्यात येणाऱ्या आणि अधिक किंमत असलेल्या पिकांसाठी वेगळी ठेवावी. यामध्ये चिया सीड्स, तुती (मलबेरी), जवस, पांढरी मुसळी, शतावरी आणि रेशीम उत्पादन यांसारख्या पिकांचा समावेश आहे. हा पिकांमधील नियोजित वैविध्य आणण्याचा प्रयत्न आहे. अशा काळात जेव्हा हवामान-अनिश्चितता न्यू नॉर्मल बनली आहे तेव्हा अनपेक्षित मान्सूनच्या आव्हानांविरुद्ध ही भारतातील सर्वात महत्त्वाची जमिनीवरील चळवळीपैकी एक ठरू शकते. केवळ जालनाच नाही, पंजाबही अनेक दशकांपासून एक धडा देत आहे. भूजल पातळीत घट होऊनही तिथे शेतीमध्ये भात शेतीचे वर्चस्व राहिले आहे. पण आज अनेक प्रगतिशील शेतकरी जमिनीच्या एका भागात मका, भाज्या आणि फळांच्या बागा लावत आहेत. सिक्कीम वेगळ्या विचारांचे सर्वात मजबूत उदाहरण सादर करते. तिथल्या शेतकऱ्यांनी संपूर्ण राज्यात सेंद्रिय शेती अवलंबून उत्पादनाच्या प्रमाणावर स्पर्धा करण्याऐवजी प्रीमियम बाजारपेठांपर्यंत पोहोच मिळवली आहे. या बदलासाठी संयम लागला, पण आज राज्याची एक खास ओळख आहे, जी अधिक किंमत मोजणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करते. ओडिशाचे आदिवासी जिल्हे पूर्णपणे वेगळे मॉडेल दर्शवतात. हळद, आले आणि औषधी वनस्पतींची शेती करणारे शेतकरी, शेती उत्पादक संघटनांच्या माध्यमातून कौटुंबिक उत्पन्नात उल्लेखनीय सुधारणा करत आहेत. या संघटना धान्य गोळा करतात, गुणवत्ता सुधारतात आणि चांगल्या किमतींसाठी घासाघीस करतात. कमी पाऊस आणि अति तापमान असलेल्या गुजरातमधील कच्छमध्ये शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाने नापीक जमीन डाळिंब, खजूर आणि ड्रॅगन फ्रूटच्या फायदेशीर बागांमध्ये बदलली आहे. कधी काळी अशक्य वाटणारी गोष्ट आज फुल-फळणाऱ्या बागायतीवर आधारित अर्थव्यवस्था बनली आहे. जालन्याचे ‘२० एकर मॉडेल’ म्हणूनच इतके प्रभावी आहे. कारण ते शेतकऱ्यांना जमिनीच्या केवळ छोट्याशा भागावर प्रयोग करण्यास सांगते. पाच एकर जमीन असलेल्या शेतकऱ्याला पूर्ण शेत पणाला लावण्याची गरज नाही. विस्तार करण्यापूर्वी तो नवीन पिकाला केवळ अर्धा एकर जमीन देऊनही उत्पन्न, खर्च आणि जोखमीची तुलना करू शकतो. या सर्व उदाहरणांमध्ये एक समान धडा आहे. या सर्वांनी आपली जमीन हवामान अनुकूलतेची जिवंत प्रयोगशाळा बनवली. यश नेहमी अधिक जमिनीवर शेती केल्याने मिळत नाही. बऱ्याचदा ते या गोष्टीने मिळते की जमिनीतून समजदारीने उत्पादन कसे घ्यावे. या वर्षी जूनमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस आणि कमकुवत मान्सूनने आधीच ही चिंता वाढवली आहे की, पावसावर आधारित शेतकऱ्यांना पुन्हा एकदा उत्पादनाचे नुकसान सोसावे लागू शकते. अशा वेळी पिकांची विविधता आणि हवामान-अनुकूल शेती अधिक महत्त्वाची झाली आहे. फंडा हा आहे की आज शेतीमध्येही वित्तीय सल्लागारांसारखा विचार हवा, जे बऱ्याचदा गुंतवणूकदारांना सांगतात की सर्व पैसे कोणत्याही एका शेअर किंवा मालमत्तेत लावू नका. जेव्हा एखादी गुंतवणूक अपेक्षेनुसार कामगिरी करत नाही तेव्हा विविधता तुमच्या व्यवसायाला आणि मालमत्तेला सुरक्षित ठेवते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




