Farmers Queue for Hours; Brutal Brawls at Petrol Pumps in Nandurbar and Parbhani!

इंधन टंचाईचे भीषण वास्तव! महाराष्ट्रात डिझेलसाठी बळीराजा रडकुंडीला; नंदुरबारमध्ये शेतकऱ्याला मारहाण, तर परभणीत तुंबळ हाणामारी

Farmers Queue for Hours; Brutal Brawls at Petrol Pumps in Nandurbar and Parbhani!
मुंबई / नंदुरबार / परभणी: अस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे आधीच संकटात सापडलेला महाराष्ट्रातील बळीराजा आता नवीनच उभ्या राहिलेल्या इंधन टंचाईच्या (Fuel Shortage) संकटामुळे पुरता रडकुंडीला आला आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर मशागतीची कामे वेगात सुरू असताना, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे.
या इंधन टंचाईचा पुढचा अध्याय आता थेट हिंसक वळणावर येऊन ठेपला असून, डिझेल भरण्याच्या कारणावरून नंदुरबार आणि परभणी जिल्ह्यात पेट्रोल पंपांवर हाणामारीच्या गंभीर घटना घडल्या आहेत.नंदुरबारच्या शहाद्यात शेतकऱ्याला मारहाणखरीप हंगामातील मशागतीची कामे पूर्णपणे खोळंबल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी डिझेल मिळवण्यासाठी तासनतास पंपांवर रांगा लावून उभे आहेत. प्रशासनाने ड्रम, कॅन किंवा बाटल्यांमध्ये इंधन देण्यास बंदी घातल्यामुळे शेतकऱ्यांना आपले ट्रॅक्टर घेऊन थेट पंपांवर यावे लागत आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात डिझेल मिळवण्याच्या गडबडीत आणि रांगेत पुढे जाण्याच्या वादातून एका शेतकऱ्याला अत्यंत अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. परिस्थिती इतकी गंभीर बनली आहे की, महाराष्ट्रात डिझेल मिळेनासे झाल्याने सीमाभागातील अनेक शेतकरी इंधनासाठी शेजारच्या गुजरात राज्यात धाव घेत आहेत. परभणीच्या मानवतमध्ये तुंबळ हाणामारीअशीच एक भीषण आणि हिंसक घटना परभणी जिल्ह्यातील मानवत येथील एका पेट्रोल पंपावर घडली आहे.

येथे डिझेलचा साठा मर्यादित असल्यामुळे आणि वाहनांची गर्दी वाढल्यामुळे नागरिकांचा आणि शेतकऱ्यांचा संयम सुटला. डिझेल भरण्याच्या कारणावरून ग्राहकांमध्ये आणि पंप कर्मचाऱ्यांमध्ये आधी जोरदार वाद झाला आणि त्याचे रूपांतर पुढे तुंबळ हाणामारीत झाले. या हाणामारीत काही जण किरकोळ जखमी झाले असून पंपावर काही काळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मशागतीची कामे खोळंबली; बळीराजा हतबलबुलढाणा, परभणी, नंदुरबार आणि भंडाऱ्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्याभरापासून इंधनाचा ठणठणाट पाहायला मिळत आहे. डिझेलअभावी शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर शेतातच बंद पडले आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे डिझेल इंजिनद्वारे पाणी उपसा करण्याची सोय आहे, त्यांना पिकांना पाणी देता येत नसल्याने उभी पिके करपू लागली आहेत. तसेच शेतमाल बाजारात नेण्यासाठी गाड्यांना इंधन मिळत नसल्याने मोठी फरफट सुरू आहे. एकीकडे तेल कंपन्या आणि प्रशासन इंधनाचा पुरवठा सुरळीत असल्याचा दावा करत असले, तरी जमिनीवरील वास्तव अत्यंत विदारक आहे. सरकारच्या नियोजनाच्या अभावाचा सर्वात मोठा फटका पुन्हा एकदा बळीराजालाच बसत असून शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

मनोरंजन

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *